शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबू नायडूंना २१ सप्टेंबरपर्यंत स्वत:हून धर्माबाद न्यायालयात हजर होण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:57 IST

तब्बल ३० वेळेस नोटीस बजावूनही नायडू यांच्यासह १६ कार्यकर्ते हजर न झाल्याने त्यांना न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे.

ठळक मुद्देबाभळी बंधारा आंदोलन प्रकरणावेळी कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व किरकोळ जखमी केले होते यात आंध्र  प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह १६ जणांवर २०१० मध्ये गुन्हा दाखल आहे.तब्बल ३० वेळेस नोटीस बजावूनही नायडू यांच्यासह १६ कार्यकर्ते न्यायालयात हजर झाले नाहीत

धर्माबाद (नांदेड) : बाभळी बंधारा आंदोलन प्रकरणावेळी कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व किरकोळ जखमी केल्याप्रकरणी आंध्र  प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह १६ जणांवर २०१० मध्ये गुन्हा दाखल  आहे. सदरप्रकरणी तब्बल ३० वेळेस नोटीस बजावूनही नायडू यांच्यासह सदर १६ कार्यकर्ते न्यायालयात हजर न झाल्याने त्यांना न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. दरम्यान, येत्या २१ सप्टेंबरपर्यंत त्यांनी स्वत:हून न्यायालयात उपस्थित व्हावे, अन्यथा पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर करावे, अशी नोटीसही आंध्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बजावली आहे.

काय आहे प्रकरण

महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्र प्रदेशच्या हद्दीवर असलेल्या गोदावरी नदी पाणीवाटपावरून दोन्ही राज्य सरकारमध्ये २०१० मध्ये मोठा वाद निर्माण झाला होता़  यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांसह धर्माबादनजीकच्या बाभळी बंधाऱ्याकडे येण्यासाठी निघाले होते़ तणावाची परिस्थिती पाहून पोलीस प्रशासनाने बंधारा परिसरात जमावबंदी आदेश लागू केला होता़ मात्र आदेशाला धाब्यावर बसवित नायडू हे महाराष्ट्र सीमेकडे निघाले़ सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही कायद्याचे उल्लंघन करीत ते महाराष्ट्र सीमेच्या आत घुसले़ यावेळी प्रशासनाने ६३ जणांना ताब्यात घेऊन धर्माबाद येथील आयटीआयमध्ये चार दिवस ठेवले होते. 

पोलिसांना केली होती धक्काबुक्की या आयटीआयलाच तात्पुरत्या कारागृहाचे स्वरूप देण्यात आले होते त्यानंतर २० जुलै २०१० रोजी त्यांना औरंगाबाद कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले़ या आदेशानुसार कारागृहात हलविण्याची प्रक्रिया सुरू असताना चंद्राबाबू नायडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाण्यास नकार देत कारागृहातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली़ तसेच तेलगू आणि इंग्रजी भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली़ या प्रकाराबाबत तत्कालीन वरिष्ठ तुरूंग अधिकारी किशन गोपीनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ३२४, ३३२, ३३६, ३३७, ३५३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. 

न्यायालयाने हजर राहण्याचे दिले आदेश २०१० मधील हे प्र्रकरण आता धर्माबाद कनिष्ठ न्यायालयात सुनावणीला आले आहे़ दोषारोप पाहून न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना तब्बल ३० वेळेस नोटीस बजावली़ मात्र त्यानंतरही नायडूसह त्यांचे साथीदार न्यायालयात हजर झालेले नाहीत़ त्यामुळे चंद्राबाबू नायडू, मीक़मलाकर, के़एस़एऩएस़ राजू, सी़एच़ प्रभाकर, एऩनागेश्वर मल्लेशम, जी़राम नायडू, जी़उमा महेश्वरराव, सी़एच़विजय रामराव, मुजफरोद्दीन अमीरोद्दीन, हणमंत शिंदे, पी़माधप्पा, पी़अब्दुलखान सुलखान, एस़सोमजोजू, ए़एस़रत्नम (सायन्ना), पी़सत्यनारायण शिंदू, टी़प्रकाश, गौडगोडीया, एऩआनंदबाबू, पी़नागेंद्रम या १६ जणांना न्यायालयाने आता अटक वॉरंट बजावले आहे़ याबरोबरच २१ सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू स्वत:हून हजर न झाल्यास त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर करावे, अशा आशयाच्या नोटिसा महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेशच्या पोलिसांनाही बजावण्यात आल्या आहेत़ 

तब्बल ३० वेळा बजावली नोटीसबाभळी बंधाराप्रकरणी आंदोलनादरम्यान धर्माबाद येथील तात्पुरत्या कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण तसेच शिवीगाळ केल्याची घटना घडली होती़ २०१० मध्ये गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह इतर १५ कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी धर्माबाद न्यायालयाने तब्बल ३० वेळा नोटीस बजावली़ मात्र त्यानंतरही वरील १६ जण न्यायालयात राहिले नाहीत़ त्यानंतर आता न्यायालयाने आक्रमक पवित्रा घेतला आहे़  

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूDamधरणCourtन्यायालय