शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबू नायडूंना २१ सप्टेंबरपर्यंत स्वत:हून धर्माबाद न्यायालयात हजर होण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:57 IST

तब्बल ३० वेळेस नोटीस बजावूनही नायडू यांच्यासह १६ कार्यकर्ते हजर न झाल्याने त्यांना न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे.

ठळक मुद्देबाभळी बंधारा आंदोलन प्रकरणावेळी कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व किरकोळ जखमी केले होते यात आंध्र  प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह १६ जणांवर २०१० मध्ये गुन्हा दाखल आहे.तब्बल ३० वेळेस नोटीस बजावूनही नायडू यांच्यासह १६ कार्यकर्ते न्यायालयात हजर झाले नाहीत

धर्माबाद (नांदेड) : बाभळी बंधारा आंदोलन प्रकरणावेळी कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व किरकोळ जखमी केल्याप्रकरणी आंध्र  प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह १६ जणांवर २०१० मध्ये गुन्हा दाखल  आहे. सदरप्रकरणी तब्बल ३० वेळेस नोटीस बजावूनही नायडू यांच्यासह सदर १६ कार्यकर्ते न्यायालयात हजर न झाल्याने त्यांना न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. दरम्यान, येत्या २१ सप्टेंबरपर्यंत त्यांनी स्वत:हून न्यायालयात उपस्थित व्हावे, अन्यथा पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर करावे, अशी नोटीसही आंध्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बजावली आहे.

काय आहे प्रकरण

महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्र प्रदेशच्या हद्दीवर असलेल्या गोदावरी नदी पाणीवाटपावरून दोन्ही राज्य सरकारमध्ये २०१० मध्ये मोठा वाद निर्माण झाला होता़  यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांसह धर्माबादनजीकच्या बाभळी बंधाऱ्याकडे येण्यासाठी निघाले होते़ तणावाची परिस्थिती पाहून पोलीस प्रशासनाने बंधारा परिसरात जमावबंदी आदेश लागू केला होता़ मात्र आदेशाला धाब्यावर बसवित नायडू हे महाराष्ट्र सीमेकडे निघाले़ सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही कायद्याचे उल्लंघन करीत ते महाराष्ट्र सीमेच्या आत घुसले़ यावेळी प्रशासनाने ६३ जणांना ताब्यात घेऊन धर्माबाद येथील आयटीआयमध्ये चार दिवस ठेवले होते. 

पोलिसांना केली होती धक्काबुक्की या आयटीआयलाच तात्पुरत्या कारागृहाचे स्वरूप देण्यात आले होते त्यानंतर २० जुलै २०१० रोजी त्यांना औरंगाबाद कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले़ या आदेशानुसार कारागृहात हलविण्याची प्रक्रिया सुरू असताना चंद्राबाबू नायडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाण्यास नकार देत कारागृहातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली़ तसेच तेलगू आणि इंग्रजी भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली़ या प्रकाराबाबत तत्कालीन वरिष्ठ तुरूंग अधिकारी किशन गोपीनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ३२४, ३३२, ३३६, ३३७, ३५३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. 

न्यायालयाने हजर राहण्याचे दिले आदेश २०१० मधील हे प्र्रकरण आता धर्माबाद कनिष्ठ न्यायालयात सुनावणीला आले आहे़ दोषारोप पाहून न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना तब्बल ३० वेळेस नोटीस बजावली़ मात्र त्यानंतरही नायडूसह त्यांचे साथीदार न्यायालयात हजर झालेले नाहीत़ त्यामुळे चंद्राबाबू नायडू, मीक़मलाकर, के़एस़एऩएस़ राजू, सी़एच़ प्रभाकर, एऩनागेश्वर मल्लेशम, जी़राम नायडू, जी़उमा महेश्वरराव, सी़एच़विजय रामराव, मुजफरोद्दीन अमीरोद्दीन, हणमंत शिंदे, पी़माधप्पा, पी़अब्दुलखान सुलखान, एस़सोमजोजू, ए़एस़रत्नम (सायन्ना), पी़सत्यनारायण शिंदू, टी़प्रकाश, गौडगोडीया, एऩआनंदबाबू, पी़नागेंद्रम या १६ जणांना न्यायालयाने आता अटक वॉरंट बजावले आहे़ याबरोबरच २१ सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू स्वत:हून हजर न झाल्यास त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर करावे, अशा आशयाच्या नोटिसा महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेशच्या पोलिसांनाही बजावण्यात आल्या आहेत़ 

तब्बल ३० वेळा बजावली नोटीसबाभळी बंधाराप्रकरणी आंदोलनादरम्यान धर्माबाद येथील तात्पुरत्या कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण तसेच शिवीगाळ केल्याची घटना घडली होती़ २०१० मध्ये गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह इतर १५ कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी धर्माबाद न्यायालयाने तब्बल ३० वेळा नोटीस बजावली़ मात्र त्यानंतरही वरील १६ जण न्यायालयात राहिले नाहीत़ त्यानंतर आता न्यायालयाने आक्रमक पवित्रा घेतला आहे़  

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूDamधरणCourtन्यायालय