शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

अर्धापूर शिवारातील शेत जमिनीची ५ पासून मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:19 IST

तालुक्यातून जाणा-या नियोजित नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी लागणा-या भूसंपादनाच्या प्रस्तावासाठी एकमेव शिल्लक राहिलेल्या अर्धापूर शिवारातील शेतजमिनीच्या मोजणीला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे़ मराठवाडा-विदर्भाचा समन्वय साधणा-या नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी या रेल्वे मार्गाच्या मंजुरीपासून ते या प्रकल्पाला विशेष दर्जा मिळवून देण्यापर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे़

ठळक मुद्देनांदेड-यवतमाळ-वर्धा नियोजित रेल्वेमार्ग, भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग

उदयकुमार गुंजकर।लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर : तालुक्यातून जाणा-या नियोजित नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी लागणा-या भूसंपादनाच्या प्रस्तावासाठी एकमेव शिल्लक राहिलेल्या अर्धापूर शिवारातील शेतजमिनीच्या मोजणीला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे़मराठवाडा-विदर्भाचा समन्वय साधणा-या नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी या रेल्वे मार्गाच्या मंजुरीपासून ते या प्रकल्पाला विशेष दर्जा मिळवून देण्यापर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे़अर्धापूर तालुक्यातून जाणा-या या नियोजित रेल्वे मार्गासाठी लागणा-या पार्डी, चिंचबन, कारवाडी, रहीमपूर, कलदगाव, दाभड, येळेगाव शिवारातील शेतजमिनीची मोजणी झाली़ देगाव शिवारातील दोन ते चार गटांची व अर्धापूर शिवारातील शेतजमिनीची मोजणी शिल्लक राहिली असून अर्धापूर शिवारातील २४१, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २३४, २३५, २३३, २२८, २२९, २१५, २१४, २१६, २१३, २१८, २१९, २२०, २२१, २२७, २२३, २०५, २०४, २०३, ११९, १९७, १९६, १९५, १९४, १९२, ३८२, ३८०, ३७९, ३९७, ३९८, ३८९, ३६५, ३६४, ३६२, ४००, ४३०, ४४७, ४४६, ४३३, ४४५ या गटनंबरमधील शेतजमिनीची मोजणी ५ फेब्रुवारीपासून होणार आहे़ या नियोजित नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मुल्यांकनाच्या चौपट रक्कम शेतमालकांना मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे़कारवाडी शिव ते पांगरी रस्ता दरम्यान नियोजित रेल्वे मार्गावर अर्धापूरसाठी रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहे़ पण या स्टेशनचे अंतर अर्धापूरपासून पाच ते सहा कि़मी़ असल्याने प्रवाशांच्या गैरसोयीचे ठरणार आहे़ तामसा रोड नजीक अर्धापूरसाठी रेल्वे स्टेशन व्हावे, अशी जनतेची मागणी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.रेल्वेमार्गासाठी विजयबाबूंचा पाठपुरावाकाँग्रेसचे माजी खा. विजयबाबू दर्डा यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला फेब्रुवारी २००८ मध्ये मंजुरी मिळाली़ त्यानंतर ११ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांच्या हस्ते या प्र्रकल्पाचे भूमिपूजन झाले़ त्यानंतर या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून विजयबाबूंनी सातत्याने पाठपुरावा केला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पातील अडथळे दूर करण्याची मागणी केली़ २४ सप्टेंबर २०१५ रोजी केंद्र शासनाने अधिसूचना जारी करून या प्रकल्पाला विशेष प्रकल्प म्हणून घोषित केले़ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विजयबाबू पाठपुरावा करीत आहेत़या नियोजित रेल्वे मार्गासाठी लागणाºया पार्डी, कारवाडी व चिंचबन शिवारातील संपादित शेतजमिनीचा सुमारे ३२ कोटी रुपये मोबदल्याचे वाटप झाले असून अमरापूर, हमरापूर, लतीफपूर शिवारातील शेतजमिनीच्या मोबदल्यासाठी सर्व कागदपत्रांची संबंधितांकडून पूर्तता करवून घेतली असून लवकरच वाटप होईल -प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी, नांदेड़

नियोजित रेल्वे मार्गासाठी तालुक्यातील संबंधित गावच्या शेतजमिनीची मोजणी झाली आहे़ अर्धापूर शिवारातील शेतजमिनीबाबत सीमांकन चुकल्यामुळे रेल्वे बोर्डाकडून दुरुस्त प्रस्ताव प्राप्त झाला आहे़ त्यासाठी अर्धापूर शिवारातील शेतजमिनी मोजून अंदाजे ३७ हेक्टर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव आहे़ ५ फेब्रुवारीपासून होणाºया मोजणीसाठी संबंधित गट मालक शेतक-यांनी आपआपली वहीवाट दाखवून मोजणीस सहकार्य करावे - एम़ए़एच़ आगाई, उपअधीक्षक भूमी अभिलेख, अर्धापूऱ

संपादित शेतजमिनीच्या मोबदल्याबाबत शेतकरी समाधानी आहेत़ पण काही शेतक-यांच्या शेतजमिनीचे या रेल्वे मार्गामुळे दोन भाग झाल्याने शेती व्यवस्थापन गैरसोयीचे ठरणार आहे - पांडुरंग देशमुख, शेतकरी़