शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राज्यात यंदा कापसाचे उत्पादन घटणार; पांढऱ्या सोन्यास हमीदरापेक्षा अधिकच भाव मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 18:25 IST

एकूणच कापसाची मागणी व बाजारातील स्थिती पाहता कापसाचा दर हमीभावापेक्षा कमी येणार नाही असा अंदाज सीसीआयने वर्तविला आहे.

- राजेश निस्तानेनांदेड : कापसाला बाजारात साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असला तरी राज्यात यावर्षी कापसाचे उत्पादन ३० लाख क्विंटलने घटण्याचा प्राथमिक अंदाज कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘सीसीआय’ने वर्तविला आहे.

सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पाणिग्रही (मुंबई) यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, राज्यात या वर्षी ४ कोटी ५० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यापासून ९० लाख रुई गाठी तयार होतील. ३९ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यावर्षी विविध कारणांनी कापसाचे उत्पादन ३० लाख क्विंटलने घटण्याची चिन्हे आहेत.

कापसाचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरने घटलेसोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याचे पाहून यावर्षी सोयाबीनचा पेरा शेतकऱ्यांनी अधिक केला. मागच्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरने घटले आहे. याशिवाय ओला दुष्काळ, अळीचा प्रादुर्भाव, उत्पादनक्षम नसलेली बियाणे, दुबार-तिबार पेरणीमुळे झालेला विलंब आदी कारणांमुळे कापसाचे उत्पादन घटणार आहे. एक-दोन वेचणीतच कापसाची उलंगवाडी होत असल्याचे अनेक भागांतील चित्र आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघतो की नाही याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. गेल्या वर्षी ४ कोटी ७९ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले होते. त्यातून ९५ लाख ८८ हजार रुई गाठी तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी कापूस उत्पादनात, पर्यायाने रुई गाठींच्या संख्येत घट होणार असल्याचे पाणिग्रही यांनी सांगितले.

दरातील तेजी कायम राहणारकापसाचा बाजार सध्या तेजीत आहे. साडेआठ ते नऊ हजार रुपये दर चांगल्या प्रतीच्या कापसाला मिळत आहे. एकूणच कापसाची मागणी व बाजारातील स्थिती पाहता कापसाचा दर हमीभावापेक्षा कमी येणार नाही असा अंदाज सीसीआयने वर्तविला आहे. त्यामुळे शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची वेळ येणार नाही असे दिसते. मात्र, तरीही सीसीआय हमीभावाने कापूस खरेदीसाठी सज्ज आहे. गरज पडल्यास मराठवाड्यात ४० ते ४२ खरेदी केंद्रे सुरू करण्याची सज्जता सीसीआयने ठेवली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीagricultureशेती