शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सोयाबीनवर खर्च २०५००, तर उत्पन्न २५५००; शेतकऱ्यांनी पाच हजारांत जगायचं कसं ?

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: May 14, 2024 17:08 IST

एका बाजूने शेतीतील गुंतवणूक प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र, त्या गुंतवणुकीचा परतावा अत्यल्प येत असल्याने शेती परवडत नाही.

नांदेड : मागील काही वर्षांत शेती कसण्यासाठी लागणारे अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशके, शेतमाल वाहतूक, पेट्रोल-डिझेलचे भाव जवळजवळ १५० ते २५० टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, त्या तुलनेत शेतीतून निघणाऱ्या शेतमालाचे भाव अत्यल्प वाढले आहेत. त्यात यंदा तर सोयाबीनचे भाव चार हजारांवर पडल्याने लागवडीसाठी खर्च २०,५०० अन् उत्पन्न २५,५०० निघाल्याने पाच हजारांत जगायचे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

गतवर्षी मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर पडला नसल्याने खरिपाची पेरणीही एक ते सव्वा महिना उशिराने झाली. त्यामुळे सोयाबीन, कापसासह इतर पिकेही उशिरानेच शेतकऱ्यांच्या पदरात पडली. बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर पाच हजारांच्या आतच प्रतिक्विंटल सोयाबीनला भाव असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता तसाच शेतमाल साठवून ठेवला. गेल्या दोन ते तीन वर्षांत सोयाबीनचे भाव वाढले नसल्याने चांगले दर येतील, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही. पण, मागील काही महिन्यांपासून सोयाबीनला चार ते साडेचार हजारांच्या आतच भाव मिळत असल्याने लागवडीसह खत, बियाण्यांसाठी टाकलेला खर्चही निघत नाही. त्यात शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीची तर दमडीही ग्राह्य धरली नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक मेटाकुटीला आला आहे.

एका बाजूने शेतीतील गुंतवणूक प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र, त्या गुंतवणुकीचा परतावा अत्यल्प येत असल्याने शेती परवडत नाही. यास सरकारचे शेतमाल विक्रीच्या संदर्भात जे धोरणे आहेत, त्यास जबाबदार न धरता हवामान बदल, पाऊस, रोगराई, अतिवृष्टी, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीला ग्राह्य धरले जाते. शेतकऱ्यांना तग धरून राहण्यासाठी उपाय म्हणून अनुदान, शेतकरी सन्मान निधी, मदत दिला जातो. मात्र, हे यावरील उपाय नाहीत.

चालू वर्षी शेतकऱ्यांच्या समोर शेती कसण्याचे सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये एक एकर शेतीची नांगरटी करण्यास पुरणार नाहीत. बाकीच्या गुंतवणुकीचे काय? असा प्रश्न आहे. दुष्काळामुळे पीक कर्ज परत केले नसल्याने बँक किंवा इतर संस्था पीककर्ज देत नाहीत. कृषी सेवा केंद्राची गेल्या वर्षाची उधारी दिली नसल्याने तेदेखील चालू वर्षी उधार देणार नाहीत, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत.

सरकारने पामतेल आयात केल्याने भाव पडलेसरकारने इतर देशातून पामतेल आयात केल्याने सोयाबीनचे भाव वाढलेच नाहीत. पामतेल आयातमुळे देशांतर्गत सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सोयाबीनचे भाव साडेचार हजारांवर गेले नाहीत.

एकरी आलेला खर्च, हाती पडलेले उत्पन्न असेसोयाबीन पेरणीपासून काढणीपश्चात शेतकऱ्यांना प्रति एकर आलेला अंदाजित खर्च असा-नांगरणी दोन हजार रुपये, रोटर, वखरणी दोन हजार, पेरणी १२०० रुपये, बियाणे २७०० रुपये, रासायनिक खत १४०० रुपये, निंदणी (किमान दोन वेळेस) तीन हजार रुपये, फवारणी २५०० रुपये, कोळपणी एक हजार रुपये, काढणी, कापणी चार हजार रुपये, मशीनमधून काढण्यासाठी २५० रुपये क्विंटल, वाहतूक खर्च २० ते २५ रुपये क्विंटल याप्रमाणे अंदाजित २० हजार २०० रुपयांचा खर्च लागतो. तर यंदा शेतकऱ्यांना एकरी पाच ते सात क्विंटल, तर सरासरी सहा क्विंटल सोयाबीन झाले आहे. सध्याचा भाव सरासरी ४३०० रुपये प्रतिक्विंटल मिळाल्याने एका एकरात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २५,२०० रुपये उत्पन्न हाती पडले आहे. खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरात एकरी केवळ पाच हजार रुपये मिळत असल्याने जगावे, कसे असा प्रश्नही भेडसावतो आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड