शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सोयाबीनवर खर्च २०५००, तर उत्पन्न २५५००; शेतकऱ्यांनी पाच हजारांत जगायचं कसं ?

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: May 14, 2024 17:08 IST

एका बाजूने शेतीतील गुंतवणूक प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र, त्या गुंतवणुकीचा परतावा अत्यल्प येत असल्याने शेती परवडत नाही.

नांदेड : मागील काही वर्षांत शेती कसण्यासाठी लागणारे अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशके, शेतमाल वाहतूक, पेट्रोल-डिझेलचे भाव जवळजवळ १५० ते २५० टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, त्या तुलनेत शेतीतून निघणाऱ्या शेतमालाचे भाव अत्यल्प वाढले आहेत. त्यात यंदा तर सोयाबीनचे भाव चार हजारांवर पडल्याने लागवडीसाठी खर्च २०,५०० अन् उत्पन्न २५,५०० निघाल्याने पाच हजारांत जगायचे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

गतवर्षी मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर पडला नसल्याने खरिपाची पेरणीही एक ते सव्वा महिना उशिराने झाली. त्यामुळे सोयाबीन, कापसासह इतर पिकेही उशिरानेच शेतकऱ्यांच्या पदरात पडली. बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर पाच हजारांच्या आतच प्रतिक्विंटल सोयाबीनला भाव असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता तसाच शेतमाल साठवून ठेवला. गेल्या दोन ते तीन वर्षांत सोयाबीनचे भाव वाढले नसल्याने चांगले दर येतील, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही. पण, मागील काही महिन्यांपासून सोयाबीनला चार ते साडेचार हजारांच्या आतच भाव मिळत असल्याने लागवडीसह खत, बियाण्यांसाठी टाकलेला खर्चही निघत नाही. त्यात शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीची तर दमडीही ग्राह्य धरली नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक मेटाकुटीला आला आहे.

एका बाजूने शेतीतील गुंतवणूक प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र, त्या गुंतवणुकीचा परतावा अत्यल्प येत असल्याने शेती परवडत नाही. यास सरकारचे शेतमाल विक्रीच्या संदर्भात जे धोरणे आहेत, त्यास जबाबदार न धरता हवामान बदल, पाऊस, रोगराई, अतिवृष्टी, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीला ग्राह्य धरले जाते. शेतकऱ्यांना तग धरून राहण्यासाठी उपाय म्हणून अनुदान, शेतकरी सन्मान निधी, मदत दिला जातो. मात्र, हे यावरील उपाय नाहीत.

चालू वर्षी शेतकऱ्यांच्या समोर शेती कसण्याचे सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये एक एकर शेतीची नांगरटी करण्यास पुरणार नाहीत. बाकीच्या गुंतवणुकीचे काय? असा प्रश्न आहे. दुष्काळामुळे पीक कर्ज परत केले नसल्याने बँक किंवा इतर संस्था पीककर्ज देत नाहीत. कृषी सेवा केंद्राची गेल्या वर्षाची उधारी दिली नसल्याने तेदेखील चालू वर्षी उधार देणार नाहीत, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत.

सरकारने पामतेल आयात केल्याने भाव पडलेसरकारने इतर देशातून पामतेल आयात केल्याने सोयाबीनचे भाव वाढलेच नाहीत. पामतेल आयातमुळे देशांतर्गत सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सोयाबीनचे भाव साडेचार हजारांवर गेले नाहीत.

एकरी आलेला खर्च, हाती पडलेले उत्पन्न असेसोयाबीन पेरणीपासून काढणीपश्चात शेतकऱ्यांना प्रति एकर आलेला अंदाजित खर्च असा-नांगरणी दोन हजार रुपये, रोटर, वखरणी दोन हजार, पेरणी १२०० रुपये, बियाणे २७०० रुपये, रासायनिक खत १४०० रुपये, निंदणी (किमान दोन वेळेस) तीन हजार रुपये, फवारणी २५०० रुपये, कोळपणी एक हजार रुपये, काढणी, कापणी चार हजार रुपये, मशीनमधून काढण्यासाठी २५० रुपये क्विंटल, वाहतूक खर्च २० ते २५ रुपये क्विंटल याप्रमाणे अंदाजित २० हजार २०० रुपयांचा खर्च लागतो. तर यंदा शेतकऱ्यांना एकरी पाच ते सात क्विंटल, तर सरासरी सहा क्विंटल सोयाबीन झाले आहे. सध्याचा भाव सरासरी ४३०० रुपये प्रतिक्विंटल मिळाल्याने एका एकरात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २५,२०० रुपये उत्पन्न हाती पडले आहे. खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरात एकरी केवळ पाच हजार रुपये मिळत असल्याने जगावे, कसे असा प्रश्नही भेडसावतो आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड