शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

coronavirus : नीट परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा धुमाकूळ; परीक्षा वेळेवर होण्याबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 15:38 IST

विद्यार्थी-पालक चिंतेत; परीक्षा पुढे ढकलण्याची होतेय मागणी

ठळक मुद्दे3 मे रोजी नियोजित परीक्षाअभ्यासक्रमसुद्धा अपूर्ण राहिल्याने चिंता

- श्रीनिवास भोसले

नांदेड : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. नीट परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. परीक्षेला महिना शिल्लक असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने सदर परीक्षा वेळेवर होणार की नाही, असा संभ्रम विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नीट परीक्षा ही सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई)अंतर्गत आयोजित करण्यात येते. एनसीआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित नीट परीक्षा आहे. परीक्षांचे आयोजन करणे, निकाल तयार करणे, मेरिट यादी तयार करणे ही कामे सीबीएसईच्या माध्यमातून केली जातात. २०२० ची परीक्षा ३ मे रोजी होणार असल्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले आहेत. परंतु परीक्षेला दीड महिना शिल्लक असताना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना म्हणून राज्यातील जवळपास सर्वच महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्यात आली. त्यातच दहावी बोर्डाचे पेपरची पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र, राज्यातून जवळपास साडेतीन लाख विद्यार्थी ज्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत, त्या नीट परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे लाखो कुटुंबामध्ये कोरोनाबरोबर नीट परीक्षेचीही चर्चा सुरू आहे.

विद्यार्थी-पालकांची मागणीकोरोना पार्श्वभूमीवर सरकारने  १४ मार्च रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या होत्या़ त्या सुट्टयाचे सर्व स्तरावरुन स्वागत झाले असले तरी मे महिन्यात येऊ घातलेल्या नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातून जवळपास साडेतीन  लाख विद्यार्थी बसणार आहेत. देशातील सर्वात मोठी परीक्षा असलेल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रभावित झाले असून संबंधित मंत्रालयाने तथा विभागाने यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सदर परीक्षा पुढे ढकलून हजारो विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी नीट परीक्षार्थी विद्यार्थी, पालक व शिक्षकानी केली आहे.

अभ्यासक्रम अपूर्णच; विद्यार्थी चिंतेतनीट परीक्षेसाठी ११ वी आणि १२ वी या दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम असून विद्यार्थी दोन वर्ष या वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेसाठी तयारी करत असतात. सदर परीक्षेसाठी एनसीइआरटी अभासक्रम असून त्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने खाजगी शिकवणीची मदत घेत तयारी करतात. पण कोरोनामुळे ओढवलेलले संकट त्यात शाळा महाविद्यालयांनासह खाजगी क्लासेसला दिलेल्या सुट्ट्यांमुळे पुरेशी तयारी न झाल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने परीक्षा पूढे ढकलण्याची गरज आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान होईल १४ मार्चपासून १४ एप्रिल या काळात  काही शहरी भागातील विद्यार्थ्यांनी इंटरनेट वा मोबाईलच्या सहाय्याने थोडीफार तयारी केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन सुविधेअभावी तयारी न करता आल्याने त्यांच्यावर अन्याय होणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील निकाल घसरून ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने नीट परीक्षा पूढे ढकलून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी मागणी आयआयबीचे संचालक दशरथ पाटील यांनी केली. आयआयबीने आॅनलाइन सराव परीक्षा व व्हिडिओ लेक्चर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सुट्ट्यांच्या काळात तयारी करून घेतली असली तरी ग्रामीण भागातील ७५ ते ८० टक्के विद्यार्थी यापासून वंचित राहिले असल्याचे सांगितले. तसेच परीक्षा पूढे  ढकलल्यास विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळाल्याने मोठा दिलासा मिळेल, अशी खात्री दशरथ पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडexamपरीक्षा