शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बॅरिकेटिंग,परप्रांतांच्या सीमा तातडीने सील; नांदेड जिल्ह्यात आळंदी पॅटर्नने लोंढे रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:23 IST

तीन राज्याच्या सीमासह विदर्भाची सीमा नांदेडला लागून

ठळक मुद्देलढाई अजून संपली नाही

नांदेड :  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे़ नांदेड जिल्ह्याच्या सर्व सीमाही सील करण्यात आल्या आहेत़ आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा यासह शेजारील विदर्भाच्या सीमा नांदेड जिल्ह्याला लागून आहेत़ त्यामुळे या ठिकाणाहून येणारे नागरिकांचे लोंढे रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते़ पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यासाठी आळंदी पॅटर्न राबविला़ त्यानंतर हा पॅटर्न राज्यातील अनेक जिल्ह्यांत राबविण्यात आला़ त्यामुळे नांदेडात येणाऱ्या लोंढ्यांना रोखण्यास यश मिळाले.

देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना नांदेडात मात्र आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ नांदेड जिल्ह्याला लागूनच तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक यासह विदर्भाच्या सीमा आहेत़ या ठिकाणी नांदेडकरांचा रोटी-बेटीचा व्यवहार चालतो़ त्यामुळे नांदेडात येणाºयांची संख्या मोठी आहे़ लॉकडाऊन झाल्यानंतर या भागातून येणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली़ या लोंढ्यामुळे नांदेडकरांना मात्र धोका होवू शकतो हे वेळीच ओळखून तातडीने सर्व सीमा सील करण्यात आल्या़ त्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचा आळंदी येथील अनुभव कामी आला़ आळंदी पॅटर्ननुसार त्यांनी चाळीस ठिकाणी बॅरिकेटींग लावली़ त्यात प्रामुख्याने सापशिडी बॅरिकेट, फिक्स पॉर्इंट, आंतरराज्य चेकपोस्ट, ड्रोन कॅमे-यांद्वारे लक्ष यांचा समावेश होता़ जनतेला होणारी गैरसोय, राजकीय मंडळींनी केलेली टिप्पणी या सर्व अडचणींवर यशस्वीपणे तोडगा काढून लॉकडाऊनची अमंलबजावणी करण्यात येत आहे़ हे करीत असताना अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही़ याचीही खबरदारी घेण्यात आली़ नांदेड जिल्ह्यात केलेल्या या प्रयोगाचे अनेक जिल्ह्यांनी अनुकरण केले़  

लढाई अजून संपली नाही़़़लॉकडाऊनच्या काळात नांदेडकरांनी खूप सहकार्य केले आहे़ अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत़ जे विनाकारण बाहेर पडत आहेत़ त्यांच्याविरोधात कारवाई सुरु आहे़ नांदेडात आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ ही समाधानाची बाब आहे़ परंतु लढाई अजून संपली नाही़ त्यामुळे गाफील न राहता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे़ पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यासाठी आळंदी पॅटर्न राबविला़ त्यानंतर हा पॅटर्न राज्यातील अनेक जिल्ह्यांत राबविण्यात आला़ त्यामुळे नांदेडात येणाऱ्या लोंढ्यांना रोखण्यास यश मिळाले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड