शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘लॉकडाऊन’चा फटका; उत्तर भारतातील २५ हजार नागरिक अडकले रेल्वेच्या नांदेड विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:52 IST

3 मे पर्यंत कुठलीही प्रवाशी रेल्वे नाही, प्रशासनाचे स्पष्टीकरण

ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये १० हजारावर प्रवाशीहजारो शीख बांधव अडकले नांदेडमध्ये

- श्रीनिवास भोसलेनांदेड : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला़ या काळात अचानक वाहतूक व्यवस्था बंद करून तालुका, जिल्हा अन् राज्य सीमा सील केल्याने हजारो नागरिक कर्तव्यावर असणा-या ठिकाणी अडकले आहे़. दमरेच्या नांदेड विभागात उत्तर भारतातील २५  हजारावर नागरिक अडकल्याची माहिती समोर येत आहे़

जगावर कोरोना महामारीचे सावट आल्याने सर्वच देशानी कोव्हीड १९ या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विमानसेवा बंद केली़ त्यापाठोपाठ देशातील राज्य  आणि जिल्हा सीमाही सील केल्या़ परिणामी हजारो लोक कर्तव्यावर असणाऱ्या ठिकाणी अथवा उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण घेण्यासाठी असलेल्या शहरांमध्ये अडकले आहेत़ देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याने १४ एप्रिलनंतर परिस्थिती पूर्ववत होईल, अशी आशा होती़ परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी सकाळी पुन्हा देशात ३ मेपर्यंतचा लॉकडाऊन घोषित केला आहे़ त्यामुळे परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील अडकलेल्या नागरिकांना स्वगृही परतण्यासाठी काही उपाय योजना करण्याची गरज आहे़ त्याअनुषंगाने परप्रांतातील किती प्रवाशी राज्यात अडकले आहेत याचा अंदाज घेतला जात आहे़.

औरंगाबादमध्ये १० हजारावर प्रवाशी

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास २५ हजारांवर नागरिक अडकले असून त्यात सर्वाधिक उत्तर भारतातील प्रवाशी आहेत. सर्वाधिक औरंगाबादमध्ये जवळपास १० हजार,  नांदेडमध्ये ४ हजार, हिंगोली अडीच हजार, परभणी दिड हजार, जालना दिड ते दोन हजार, वाशिम दोन हजार,  अदिलाबाद भागात ५०० ते ६००, अकोला जिल्ह्यात जवळपास अडीच हजार नागरिक वाढले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़

परराज्यातील हजारो शिख बांधव नांदेडातचशिखांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्य नांदेडात श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा दर्शन घेण्यासाठी  पंजाब, दिल्ली, हरियाणा राज्यातून आलेले जवळपास तीन हजार शिख भाविक नांदेडात अडकले आहेत़ त्यांची लंगर साहिबकडून राहणे, जेवनाची व्यवस्था केली आहे़ परंतु, त्यांना स्वगृही जाण्याची ओढ लागली आहे़ यातील बहुतांश भाविक खासगी वाहने करून निघून गेले़ परंतु, अडीच हजारावर भाविक आजही  गुरूद्वाºयाच्या निवासस्थानात मुक्कामी आहेत़ तर शहरात इतर राज्यातून शिक्षण, व्यवसायानिमित्त आलेल्यांची संख्याही मोठी आहे़

राज्यस्थानमध्ये अडकले विद्यार्थी अन् पालकनीट, जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यस्थानमधील कोटा शहरात गेलेले महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी आणि पालक लॉकडाऊनने तिकडेच अडकले आहेत़ परीक्षांच्या तारखा लांबविल्याने सदर विद्यार्थी - पालकांना राज्यात घेवून येण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ यामध्ये बहुतांश विद्यार्थी आणि त्यांची आई सोबत राहत आहेत़ त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़

रस्त्यांच्या कामावरील मजूराना लागली ओढराज्यभरात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची आणि रेल्वे दुहेरीकरण करण्याची कामे सुरू आहेत़ या कामांवर राज्यस्थान, बिहार, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील हजारो मजूर असून ते सध्या कामाच्या ठिकाणीच अडकले आहेत़ लॉकडाऊन किती दिवस राहील आणि परराज्यातील असल्याने नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलत असल्याने भीतीपोटी आपल्या राज्यात जाण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे़

3 मे पर्यंत कुठलीही प्रवाशी रेल्वे नाही, प्रशासनाचे स्पष्टीकरणप्रवासी कामगारांसाठी स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय म्हणून काही विभागांमध्ये रेल्वे सेवांच्या मागणीचे आकलन करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत नियोजनाशी संबंधित संवादाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, 3 मेपर्यंत कुठल्याही प्रवासी रेल्वे चालविण्याचे नियोजन नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद