शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

corona virus : आता प्रवाशांना मागणी केल्यावरच मिळणार रेल्वेत पांघरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:24 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय

ठळक मुद्देवातानुकूलित डब्यात यापूर्वी प्रवाशांना सरसकट पांघरुण देण्यात येतडब्यातील तापमान देखील २३ ते २५ अंशांपर्यंत ठेवण्यात येणार

नांदेड : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात आता प्रवाशांना सरसकट पांघरुण मिळणार नाही़ प्रवाशांनी मागणी केल्यासच त्यांना पांघरुण देण्याचा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे़ 

रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात यापूर्वी प्रवाशांना सरसकट पांघरुण देण्यात येत होते़ परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रवाशांना पांघरुण देण्यात येणार नाही़ प्रवाशांनी मागणी केली तरच पांघरुण देण्यात येणार आहे़ परंतु उशी आणि अंथरुण मात्र सरसकट देण्यात येणार आहे़ वातानुकूलित डब्यातील तापमान देखील २३ ते २५ अंशांपर्यंत ठेवण्यात येणार  आहे़ महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकडून वापरण्यात येणाऱ्या भागांचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे़ 

येत्या १५ एप्रिलपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत़ रेल्वेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ फलाट आणि इतर आसन व्यवस्थेचीही स्वच्छता करण्यात येत आहे़ त्यादृष्टीने रेल्वेचे कर्मचारी कामाला लागले असून वरिष्ठ अधिकारीही परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्या