शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

खरिपात सोयाबीनचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:09 IST

तालुक्यातील लागवड क्षेत्र ४५ हजार ८८९ क्षेत्रापैकी तब्बल २२ हजार ४४१ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे़ खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकालाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे या हंगामात सोयाबीनचाच बोलबाला दिसून आला़ तालुक्यात बहुतांश महसूल क्षेत्रांतर्गत सोयाबीनचा पेरा सरासरी ५० टक्के आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १७ जुलैअखेर ५१ मि़मी़ पाऊस जास्त झाल्याने पिकांची स्थिती सध्यातरी भरभक्कम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : तालुक्यातील लागवड क्षेत्र ४५ हजार ८८९ क्षेत्रापैकी तब्बल २२ हजार ४४१ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे़ खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकालाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे या हंगामात सोयाबीनचाच बोलबाला दिसून आला़ तालुक्यात बहुतांश महसूल क्षेत्रांतर्गत सोयाबीनचा पेरा सरासरी ५० टक्के आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १७ जुलैअखेर ५१ मि़मी़ पाऊस जास्त झाल्याने पिकांची स्थिती सध्यातरी भरभक्कम आहे़कापूस पिकाला गतवर्षी बोंडअळीने ग्रासले असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले़ राज्य शासनाने एकरी अनुदान मंजूर केले होते; पण या अनुदानामुळे कापूस लागवडीचा खर्चदेखील भागला नाही़ कापूस विक्रीला बाजारात भाव नाही तर कापूस वेचणीला शेतमजूर मिळत नाहीत, ही मुख्य अडचण आता शेतकºयांसमोर आहे़ शेतमजुरांच्या विश्वासावर शेती करणे आता सोपे नाही़ त्यामुळे अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर सुरू झाला़ ट्रॅक्टरद्वारेच शेतीची सर्व कामे केली जात असून ९० टक्के पेरण्या ट्रॅक्टरनेच करण्यात आल्याचे पुढे आले आहे़ खरीप हंगामाच्या काळात कोरडवाहू व ओलिताखाली असलेल्या शेतीमध्ये जवळपास १० वेगवेगळी पिके घेतली जातात़ तर पशुपालक शेतकरी दुग्धव्यवसायासाठी चारा या पिकांची लागवड करतात़ यावर्षी जवळपास दीडशे हेक्टरमध्ये तालुक्यात चारा लागवड केलेली आहे़सन २०१७-१८ च्या तुलनेत तालुक्यात तीन हजार हेक्टरमध्ये कापसाचा पेरा घटला आहे़ बोंडअळीचा परिणाम झाल्याने कापसाचा पेरा कमी झाल्याचे चित्र आहे़ तूर पिकाचा पेरादेखील पाचशे हेक्टरमध्ये घटला आहे़ गतवर्षी दोन्ही पिकांना आर्थिक फटका बसला होता़ तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शासनाकडून खरेदी झाली़मूग-उडदाचीही दीड हजार हेक्टरमध्ये घट झाली आहे़ यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीचा संयुक्त कृषी-महसूल-पंचायतने अहवाल तयार केला असून सोयाबीन पिकांचा पेरा धमाकेदार आहे़ गतवर्षीदेखील सोयाबीनचा उतारा वाढला होता़ पेरणी, काढणी आदी कामे तेलंगणा, पंजाब राज्यातील यंत्रसामग्रीद्वारे केली जात होती़ त्यामुळे शेतमजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकºयांनी भाड्याने एकरी दराप्रमाणे पेरणी केल्याचे चित्र पुढे आले आहे़सोयाबीनची खरेदीदेखील गावपातळीवर करण्यात आल्याने सोयीचे झाले होते़---तालुक्यात पाच महसूल मंडळातंर्गत ५७ हजार ८२१ भौगोलिक क्षेत्र आहे़ सन २०१८ खरीप हंगामअंतर्गत ४५ हजार ८८९ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे़ ५८ हजार क्षेत्र असले तरी ४८ हजार क्षेत्र लागवडलायक आहे़ यापूर्वी कापूस या पिकाला शेतकºयांची पहिली पसंती राहत होती; पण गतवर्षीपासून सोयाबीन पिकांनाच महत्त्व दिले जात आहे़---तालुक्यात पाच महसूल मंडळांतर्गत बिलोली परिसरातील ५ हजार ३०० हेक्टरमध्ये सर्वाधिक सोयाबीनचा पेरा आहे़ त्याखालोखाल सगरोळी ४ हजार ८००, कुंडलवाडी ४ हजार ४०० हेक्टर, लोहगाव क्षेत्रात ४ हजार ६००, आदमपूर साडेतीन हजार हेक्टरमध्ये पेरा झाला़ यावर्षी तालुक्यात केवळ साडेआठ हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली़मूग, उडीद ही दोन पिकेदेखील साडेआठ हजार हेक्टरमध्येच आहेत़ गतवर्षीची तूर वेळेवर विक्री झाली नाही़ अजूनही शासनाकडून नाफेडवर झालेली खरेदीची देयके मिळाली नाहीत़ त्यामुळे या हंगामात तूर केवळ ५ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रात आहे़ खरीप ज्वारीपेक्षा भात (साळी) लागवड जास्त असून भात पीक ४२५ हेक्टर तर ज्वारी केवळ १२५ हेक्टरवर पेरा झाला़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी