शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खरिपात सोयाबीनचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:09 IST

तालुक्यातील लागवड क्षेत्र ४५ हजार ८८९ क्षेत्रापैकी तब्बल २२ हजार ४४१ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे़ खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकालाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे या हंगामात सोयाबीनचाच बोलबाला दिसून आला़ तालुक्यात बहुतांश महसूल क्षेत्रांतर्गत सोयाबीनचा पेरा सरासरी ५० टक्के आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १७ जुलैअखेर ५१ मि़मी़ पाऊस जास्त झाल्याने पिकांची स्थिती सध्यातरी भरभक्कम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : तालुक्यातील लागवड क्षेत्र ४५ हजार ८८९ क्षेत्रापैकी तब्बल २२ हजार ४४१ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे़ खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकालाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे या हंगामात सोयाबीनचाच बोलबाला दिसून आला़ तालुक्यात बहुतांश महसूल क्षेत्रांतर्गत सोयाबीनचा पेरा सरासरी ५० टक्के आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १७ जुलैअखेर ५१ मि़मी़ पाऊस जास्त झाल्याने पिकांची स्थिती सध्यातरी भरभक्कम आहे़कापूस पिकाला गतवर्षी बोंडअळीने ग्रासले असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले़ राज्य शासनाने एकरी अनुदान मंजूर केले होते; पण या अनुदानामुळे कापूस लागवडीचा खर्चदेखील भागला नाही़ कापूस विक्रीला बाजारात भाव नाही तर कापूस वेचणीला शेतमजूर मिळत नाहीत, ही मुख्य अडचण आता शेतकºयांसमोर आहे़ शेतमजुरांच्या विश्वासावर शेती करणे आता सोपे नाही़ त्यामुळे अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर सुरू झाला़ ट्रॅक्टरद्वारेच शेतीची सर्व कामे केली जात असून ९० टक्के पेरण्या ट्रॅक्टरनेच करण्यात आल्याचे पुढे आले आहे़ खरीप हंगामाच्या काळात कोरडवाहू व ओलिताखाली असलेल्या शेतीमध्ये जवळपास १० वेगवेगळी पिके घेतली जातात़ तर पशुपालक शेतकरी दुग्धव्यवसायासाठी चारा या पिकांची लागवड करतात़ यावर्षी जवळपास दीडशे हेक्टरमध्ये तालुक्यात चारा लागवड केलेली आहे़सन २०१७-१८ च्या तुलनेत तालुक्यात तीन हजार हेक्टरमध्ये कापसाचा पेरा घटला आहे़ बोंडअळीचा परिणाम झाल्याने कापसाचा पेरा कमी झाल्याचे चित्र आहे़ तूर पिकाचा पेरादेखील पाचशे हेक्टरमध्ये घटला आहे़ गतवर्षी दोन्ही पिकांना आर्थिक फटका बसला होता़ तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शासनाकडून खरेदी झाली़मूग-उडदाचीही दीड हजार हेक्टरमध्ये घट झाली आहे़ यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीचा संयुक्त कृषी-महसूल-पंचायतने अहवाल तयार केला असून सोयाबीन पिकांचा पेरा धमाकेदार आहे़ गतवर्षीदेखील सोयाबीनचा उतारा वाढला होता़ पेरणी, काढणी आदी कामे तेलंगणा, पंजाब राज्यातील यंत्रसामग्रीद्वारे केली जात होती़ त्यामुळे शेतमजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकºयांनी भाड्याने एकरी दराप्रमाणे पेरणी केल्याचे चित्र पुढे आले आहे़सोयाबीनची खरेदीदेखील गावपातळीवर करण्यात आल्याने सोयीचे झाले होते़---तालुक्यात पाच महसूल मंडळातंर्गत ५७ हजार ८२१ भौगोलिक क्षेत्र आहे़ सन २०१८ खरीप हंगामअंतर्गत ४५ हजार ८८९ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे़ ५८ हजार क्षेत्र असले तरी ४८ हजार क्षेत्र लागवडलायक आहे़ यापूर्वी कापूस या पिकाला शेतकºयांची पहिली पसंती राहत होती; पण गतवर्षीपासून सोयाबीन पिकांनाच महत्त्व दिले जात आहे़---तालुक्यात पाच महसूल मंडळांतर्गत बिलोली परिसरातील ५ हजार ३०० हेक्टरमध्ये सर्वाधिक सोयाबीनचा पेरा आहे़ त्याखालोखाल सगरोळी ४ हजार ८००, कुंडलवाडी ४ हजार ४०० हेक्टर, लोहगाव क्षेत्रात ४ हजार ६००, आदमपूर साडेतीन हजार हेक्टरमध्ये पेरा झाला़ यावर्षी तालुक्यात केवळ साडेआठ हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली़मूग, उडीद ही दोन पिकेदेखील साडेआठ हजार हेक्टरमध्येच आहेत़ गतवर्षीची तूर वेळेवर विक्री झाली नाही़ अजूनही शासनाकडून नाफेडवर झालेली खरेदीची देयके मिळाली नाहीत़ त्यामुळे या हंगामात तूर केवळ ५ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रात आहे़ खरीप ज्वारीपेक्षा भात (साळी) लागवड जास्त असून भात पीक ४२५ हेक्टर तर ज्वारी केवळ १२५ हेक्टरवर पेरा झाला़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी