शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

काँग्रेसचा मतांचा टक्का यंदा पहिल्यांदाच घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:20 IST

गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरली आहे़ यंदा झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाला असताना वंचितने मुसंडी मारल्यामुळे त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आहे़ नवमतदारही भाजपाकडेच वळल्याचे दिसून आले़

शिवराज बिचेवार।नांदेड : गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरली आहे़ यंदा झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाला असताना वंचितने मुसंडी मारल्यामुळे त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आहे़ नवमतदारही भाजपाकडेच वळल्याचे दिसून आले़दरवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारामध्ये केवळ चार ते पाच टक्के मतांचा फरक राहत होता़ ही पाच टक्के मतेच दरवेळी निवडणुकीत काँग्रेसच्या पारड्यात विजय टाकत होता़ यापूर्वी मकबुल सलीम, डॉ़व्यंकटेश काब्दे, गुणवंत हंगरगेकर, सुरेश गायकवाड असे सक्षम उमेदवार रिंगणात असताना त्यांना मिळालेली टक्केवारी ही निर्णायक ठरली नव्हती़ परंतु यावेळी बहुजन वंचित आघाडीने १४़७२ टक्के एवढी मते घेतली़ त्याचा मोठा फटका काँग्रेसलाच बसला़ २००९ मध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर यांना ४७़८१ टक्के तर भाजपाचे डॉ़धनाजीराव देशमुख यांना ४१़११ टक्के मते मिळाली होती़ १९९९ मध्ये काँग्रेसचे खतगावकर यांना ४४़६९ तर भाजपाचे धनाजीराव देशमुख यांना ४०़२४ टक्के मते होती़ यावेळी दोघांमध्ये केवळ चार टक्के मतांचा फरक होता़ २००४ मध्ये मात्र अचानक भाजपाची टक्केवारी वाढली होती़ भाजपाचे डी़ बी़ पाटील यांना ४५़१५ तर भास्करराव खतगावकर यांना ४२़११ टक्के मते होती़ २००९ मध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपात तब्बल १० टक्क्यांचा फरक होता़ भास्करराव खतगावकर यांना ४६़५२ तर संभाजी पवार यांना ३६़५० टक्के मते होती़ तर २०१४ मध्ये अशोकराव चव्हाण यांना ४८़६७ टक्के मते मिळविली होती़ त्या तुलनेत डी़बी़पाटील यांना ४०़६३ टक्के एवढी मते मिळाली होती़ या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसची टक्केवारी ४० पेक्षा कमी भरली़ अशोकराव चव्हाण यांना ३९़५५ टक्के तर भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना ४३़६१ टक्के मते मिळाली़ भाजपाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसली तरी, काँग्रेसच्या टक्केवारीवर मतांच्या धु्रवीकरणाचा मोठा परिणाम झाला़ वंचित आघाडीचे यशपाल भिंगे यांनी तब्बल १४़७२ टक्के मिळविली़ यापूर्वी काँग्रेस-भाजपा व्यतिरिक्त तिसरा तगडा उमेदवार रिंगणात असताना त्यांनाही एवढी मते मिळाली नव्हती़

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnanded-pcनांदेडElectionनिवडणूक