शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

काँग्रेसचे नांदेडमध्ये शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:13 IST

जिल्ह्यातील सहकार क्षेत्र बुडीत काढण्याचे पाप भाजप सरकारने केल्याचा आरोप करीत भाजपवाले म्हणजे शॉट झालेले बल्ब असल्याचे धोंडगे यावेळी म्हणाले.

ठळक मुद्देरॅलीला प्रतिसाद : अशोकराव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड : कै. शंकरराव चव्हाण यांची पुण्याई व नांदेड जिल्ह्यातील जनतेची साथ हेच काँग्रेसच्या यशाचे गमक असल्याचे सांगत पाच पक्ष बदलणारा भाजपाचा उमेदवार माझ्यासाठी अदखलपात्र आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी अधिक भाष्य करणार नाही. मात्र, राज्यात सर्वाधिक मताने जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत यासाठीची जबाबदारी आता कार्यकर्ते, मतदारांनी घ्यावी, असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने खा. चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मोंढा येथून रॅली काढण्यात आली. महावीर चौक, एस.पी. आॅफिस, शिवाजीनगर, ज्योती टॉकीज मार्गे इंदिरा गांधी मैदानावर रॅलीची सांगता झाली. येथेच जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आ. डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, आ. अमिता चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, बेळगावच्या आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, महापौर शीलाताई भवरे, फारुख अली खान, माजी आ. माधवराव जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ. सनील कदम, श्रीजया चव्हाण, सुजया चव्हाण, माजी महापौर अब्दुल सत्तार, कविता कळसकर, अनुजा तेहरा, गंगाधर सोंडारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने ७३ जागा जिंकून नांदेडमध्ये इतिहास घडविला. आता त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला लोकसभा निवडणुकीत करावयाची असल्याचे ते म्हणाले. या सभेत खा. चव्हाण यांनी भाजपावर चौफेर हल्ला चढविला. हा देश घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु अशा देशभक्तांनी घडविला आहे. मात्र नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजपा पक्ष या देशाच्या घटनात्मक चौकटीला तडे देत असल्याचे सांगत राफेल विमान खरेदीत कोट्यवधीचा गैरव्यवहार करणाऱ्या पंतप्रधान मोदींना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असल्याचे खा. चव्हाण म्हणाले.भाजपा सरकारने सर्वसामान्यांचा पैसा जाहिराती करण्यावर उधळला आहे. याचा जाब मतदारांनी आता विचारावा, असे सांगत चौकीदारानेच देशाला लुटण्याचे काम केले आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी अगोदर चहावर मत मागितले. आता चौकीदार म्हणून मत मागत आहेत. परंतु, हा चौकीदार चोर आहे, त्यांनी स्वत:ला चौकीदार म्हणून देशातील समस्त चौकीदारांची बदनामी केल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. सभेचे प्रास्ताविक आ. डी. पी. सावंत, सूत्रसंचालन आ. अमरनाथ राजूरकर तर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी आभार मानले. रॅलीमुळे शहरातील ट्रॅफिक बराचवेळ विस्कळीत झाली होती.शिवसेना-भाजप झालेत उपऱ्यांचे पक्षशिवसेना आणि भाजप हे पक्ष आता उपऱ्यांचे पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. या पक्षातील या बदलामुळे निष्ठावंतांमध्ये मोठी खदखद आहे. भाजपवाल्यांनी कारखाने आणि सहकारी संस्था बंद पाडल्या. तर नव्याने दारुचे दुकान मात्र सुरू केले. हे दुकान सुरू करणारा नांदेड जिल्ह्याचा छोटा चौकीदार असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली. माझ्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. आता खरी लढाई सुरू झाल्याचे सांगत भाजपा उमेदवारांनी कंधार-लोह्यात काय दिवे लावले? हे माझ्यापेक्षा अधिक ईश्वरराव भोसीकर, अरविंद नळगे आणि शंकरअण्णा धोंडगे सांगू शकतात, असेही ते म्हणाले.भाजपवाले म्हणजे शॉट झालेले बल्बशंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या भाषणात भाजपावर खरमरीत टीका केली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र बुडीत काढण्याचे पाप भाजप सरकारने केल्याचा आरोप करीत भाजपवाले म्हणजे शॉट झालेले बल्ब असल्याचे धोंडगे यावेळी म्हणाले. ईश्वरराव भोसीकर यांनी भाजपा उमेदवार चिखलीकर यांच्यावर टीकेचा प्रहार करीत अशोक चव्हाण यांना विक्रमी मताने विजयी करण्याची ग्वाही दिली. तर बापूराव गजभारे यांनी चव्हाण यांना विक्रमी मताने विजयी करण्याचे आपले मिशन असल्याचे सांगितले. अरविंद नळगे यांनी भाजपाचा सर्व खेळ पैशावर सुरू आहे. मात्र त्यांचा येथे टिकाव लागणार नसल्याचे सांगत हे पैसे असेच ठेवून पुन्हा विधानसभेसाठी ते वापरणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक