शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मराठवाड्यात तक्रारी जास्त,कारण लोकांना कामधंदे नाहीत;तहसीलदारांचे मंत्र्यासमोर वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 16:49 IST

''मराठवाड्यात परिस्थिती थोडी बिकट आहे. इथे लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करण्याची संख्या फार वाढली आहे''.

नांदेड: मराठवाड्यातील लोकांना काम नसल्याने ते जास्त तक्रारी करतात, त्यामुळे येथे अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे प्रमाण जास्त असल्याचा अजब दावा नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तहसीलदार अंबेकर यांनी हा दावा थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्यासमोर केला आहे. या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर असून भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन समारंभात तहसीलदार किरण अंबेकर यांनी हे वक्तव्य केल. गेल्या अनेक वर्षांपासून अंबेकर नांदेडमध्येच कार्यरत असून तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष आहेत. तहसीलदार अंबेकर यांचे भर सभेतील हे वादग्रस्त वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे. सभेत हसत हसत ते म्हणाले, साहेबांनी मला विचारलं की मराठवाड्यात विभागीय चौकशांचे प्रमाण फार जास्त आहे. ते कशामुळे जास्त आहे. तर मी सांगितलं, मराठवाड्यात परिस्थिती थोडी बिकट आहे. इथे लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करण्याची संख्या मराठवाड्यात फार वाढली आहे. त्यामुळे या तक्रारी होत आहेत. यात कोणत्याही पद्धतीचे आरोप केले जातात, तसेच यातले काही आरोप सत्यही असतात, अशी कबुलीही अंबेकर यांनी यावेळी दिली. 

जास्त अभ्यास केल्यानंतर कुणाला दोषी पकडायचं असेल आणि जबाबदार धरायचं असेल तर विभागाच्या जीआरमध्ये तहसिलदाराचे नाव हे शंभर टक्के टाकलं जातंय. यामुळे महसूल विभागावर ताण पडतो. याबाबत यापूर्वीही मागणी केली आहे की, साहेब आपल्या परवानगीशिवाय इतर विभागांनी असे  जीआर काढू नये, असेही महसूल मंत्री थोरातांना उद्देशून ते म्हणाले. मात्र, बोलण्याच्या ओघात मराठवाड्यातील लोकांना काम नसतं, म्हणून तक्रारी करता, असे वक्तव्य अंबेकर यांनी केल्याने नवा वाद सुरु झाला आहे. सोशल मिडीयावर काहींनी याचा निषेध करत महसूल अधिकाऱ्यांवरील तक्रारी, त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे याचा पाढा वाचला आहे. 

टॅग्स :NandedनांदेडRevenue Departmentमहसूल विभागDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय