शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

दिलासादायक ! नांदेडचा कोरोना मृत्युदर ७.२ टक्क्यांवरून आला ३.५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:25 IST

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज शतकपारच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ३ हजारापेक्षा अधिक आतापर्यंत १ हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्ततर आतापर्यंत एकूण १२० मृत्यू झाले आहेत

नांदेड : नांदेडचा कोरोना मृत्युदर मे महिन्यात  ७.२ टक्क्यांवर पोहोचला होता. तो ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात घसरून ३.५ टक्क्यांवर पोहचला असल्याने दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मृत्युदर जूनमध्ये ३.४ टक्के इतका होता. कोरोना रुग्णांची संख्या जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज शतकपारच आहे. ३ ऑगस्टला हा आकडा २०३ वरही पोहचला होता. जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३ हजारापेक्षा अधिक झाली आहे. त्याचवेळी मध्यंतरी वाढलेला मृत्युदर ही चिंतेची बाब होती. एकाच दिवशी ११ बळीही नांदेडमध्ये गेले होते. त्यानंतर हा मृत्युदर कमी करण्यासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात विविध उपाययोजना करण्यात आल्या. या उपाययोजनांना काहीअंशी यशही आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ देशमुख यांच्या प्रयत्नातून हा मृत्युदर कमी करण्यात यश येत आहे.  मे महिन्यामध्ये तर नांदेड जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा ७.२ टक्के इतका होता. जूनमध्ये तो ३.४ टक्क्यांवर आला. जुलैमध्ये या मृत्युदरात वाढ होऊन ४.४ टक्क्यांवर मृत्युदर पोहचला होता. ऑगस्टमध्ये आता तो घसरून ३.५ टक्के इतका झाला आहे.

जिल्ह्यातील १ हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यात एकूण ३ हजार २९७ रुग्णसंख्या जिल्ह्यात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतपर्यंत १ हजार ६३२ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी दिली आहे. तर आतापर्यंत एकूण १२० मृत्यू झाले आहेत. ९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २१७ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. यात सर्वाधिक रुग्ण हे नांदेडमधील पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील होते. त्यापाठोपाठ मुखेडमध्ये २८, हदगाव-२७, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, किनवट- १०, उमरी-१४, मुदखेड कोविड केअर सेंटरमधून १० रुग्णांना सुट्टी देण्यात आली होती.

मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भरजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात शंभराहून अधिक येत आहे. ही रुग्णसंख्या वाढण्याचे कारण म्हणजे जिल्ह्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. अ‍ॅन्टीजन तपासण्यासह आरटीपीसीआर चाचण्याही केल्या जात आहेत. जिल्ह्यात आजघडीला प्रतिदिन ३ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यातून १०० ते १५० रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या वाढती असली तरीही त्यांना शोधून योग्य उपचार दिले जात आहेत. मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड