शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

दिलासादायक ! नांदेडचा कोरोना मृत्युदर ७.२ टक्क्यांवरून आला ३.५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:25 IST

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज शतकपारच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ३ हजारापेक्षा अधिक आतापर्यंत १ हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्ततर आतापर्यंत एकूण १२० मृत्यू झाले आहेत

नांदेड : नांदेडचा कोरोना मृत्युदर मे महिन्यात  ७.२ टक्क्यांवर पोहोचला होता. तो ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात घसरून ३.५ टक्क्यांवर पोहचला असल्याने दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मृत्युदर जूनमध्ये ३.४ टक्के इतका होता. कोरोना रुग्णांची संख्या जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज शतकपारच आहे. ३ ऑगस्टला हा आकडा २०३ वरही पोहचला होता. जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३ हजारापेक्षा अधिक झाली आहे. त्याचवेळी मध्यंतरी वाढलेला मृत्युदर ही चिंतेची बाब होती. एकाच दिवशी ११ बळीही नांदेडमध्ये गेले होते. त्यानंतर हा मृत्युदर कमी करण्यासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात विविध उपाययोजना करण्यात आल्या. या उपाययोजनांना काहीअंशी यशही आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ देशमुख यांच्या प्रयत्नातून हा मृत्युदर कमी करण्यात यश येत आहे.  मे महिन्यामध्ये तर नांदेड जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा ७.२ टक्के इतका होता. जूनमध्ये तो ३.४ टक्क्यांवर आला. जुलैमध्ये या मृत्युदरात वाढ होऊन ४.४ टक्क्यांवर मृत्युदर पोहचला होता. ऑगस्टमध्ये आता तो घसरून ३.५ टक्के इतका झाला आहे.

जिल्ह्यातील १ हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यात एकूण ३ हजार २९७ रुग्णसंख्या जिल्ह्यात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतपर्यंत १ हजार ६३२ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी दिली आहे. तर आतापर्यंत एकूण १२० मृत्यू झाले आहेत. ९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २१७ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. यात सर्वाधिक रुग्ण हे नांदेडमधील पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील होते. त्यापाठोपाठ मुखेडमध्ये २८, हदगाव-२७, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, किनवट- १०, उमरी-१४, मुदखेड कोविड केअर सेंटरमधून १० रुग्णांना सुट्टी देण्यात आली होती.

मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भरजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात शंभराहून अधिक येत आहे. ही रुग्णसंख्या वाढण्याचे कारण म्हणजे जिल्ह्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. अ‍ॅन्टीजन तपासण्यासह आरटीपीसीआर चाचण्याही केल्या जात आहेत. जिल्ह्यात आजघडीला प्रतिदिन ३ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यातून १०० ते १५० रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या वाढती असली तरीही त्यांना शोधून योग्य उपचार दिले जात आहेत. मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड