शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

पंचनामे तत्काळ करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी पंचनाम्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना, विमा कंपनीस शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडे अर्ज सादर केले आहेत. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या साडेचार लाखांच्या घरात असून, आजपर्यंत म्हणजेच मागील दहा दिवसांत केवळ सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले आहेत. या संदर्भात रविवारी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत संबंधितांना पंचनामे वेळेत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात काही ठिकाणी पीक पंचनामे करण्यास अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी विमा प्रतिनिधी यांना त्रास देत दमदाटी होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्याअनुषंगाने असा प्रकार करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी दिले आहेत.

अर्जाची संख्या पाहता पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या प्रतिनिधीबाबत काही तक्रार असल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना रीतसर माहिती द्यावी. जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे वेळेत व विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व शेतकरी व नागरिकांनी विमा कंपनी प्रतिनिधी यांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.