शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

माहूर तालुक्यात स्वच्छता अभियानाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:49 IST

शासनाने ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी विविध योजना राबविल्या़ शौचालय बांधकामास अनुदान दिले़ शौचालयांची संख्याही वाढली़ मात्र, उघड्यावर शौचास बसणे हा प्रकार ग्रामीण भागात आजही सर्रास नजरेस पडत आहे़

ठळक मुद्देशौचालयाची संख्या वाढली : नागरिक अजूनही बसतात उघड्यावरच

श्रीक्षेत्र माहूर : शासनाने ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी विविध योजना राबविल्या़ शौचालय बांधकामास अनुदान दिले़ शौचालयांची संख्याही वाढली़ मात्र, उघड्यावर शौचास बसणे हा प्रकार ग्रामीण भागात आजही सर्रास नजरेस पडत आहे़ यामुळे शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीनंतरही शौचालयाची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येते.सकाळच्या सुमारास ग्रामीण भागात ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे़ शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून शासनाने प्रोत्साहन अनुदानात वेळोवेळी वाढ केली़ त्यामुळे गावागावांत शौचालयाची संख्या वाढली़ मात्र, माहूर तालुक्यातील ग्रामीण भागतील अनेक कुटुंबियांचा शौचालयाचा वापर नाममात्र होत असल्याचे दिसते़ आजही ग्रामीण भागात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंब उघड्यावर शौचास बसतात, ही वस्तुस्थिती आहे.निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामसाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. त्यामुळेच २००८ मध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम करण्यात आले़ परिणामी ग्रामीण भागात हागणदारी काही प्रमाणात कमी झाली होती़ मात्र आता स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे़ या योजनेतंर्गत शौचालय बांधकाम करणाऱ्या कुटुंबियांना अनुदान दिले जात आहे़ पण ग्रामीण भागात शौचालयाचा वापर पाहिजे तशा प्रमाणात होत नसल्याने माहूर तालुक्यातील वानोळा, पाचोंदा, इवळेश्वर, लखमापूर, गुंडवळ , दिगडी कु., वाई बाजार परिसरातील अनेक गावांच्या स्थितीवरून असे दिसते. घरी शौचालय असताना बहुतांश नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याने परिस्थिती पाहिजे तशा प्रमाणात बदललेली नसल्याचे चित्र आजही माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत नाही.माहूर तालुक्यातील अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट करण्यात आली असून संबंधित लाभार्थी मात्र कंत्राटदारांच्या नावाने कामे अर्धवट केल्याने ओरडत आहे.

  • महाराष्ट्र शासनाकडून सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते़ ग्रामीण भागात सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने सन २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले़ या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. योजनेच्या यशानंतर केंद्र सरकारने सन २००५ मध्ये शौचालय बांधकाम करणाºया कुटुंबास प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येऊ लागले.
टॅग्स :NandedनांदेडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान