शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

माहूर तालुक्यात स्वच्छता अभियानाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:49 IST

शासनाने ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी विविध योजना राबविल्या़ शौचालय बांधकामास अनुदान दिले़ शौचालयांची संख्याही वाढली़ मात्र, उघड्यावर शौचास बसणे हा प्रकार ग्रामीण भागात आजही सर्रास नजरेस पडत आहे़

ठळक मुद्देशौचालयाची संख्या वाढली : नागरिक अजूनही बसतात उघड्यावरच

श्रीक्षेत्र माहूर : शासनाने ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी विविध योजना राबविल्या़ शौचालय बांधकामास अनुदान दिले़ शौचालयांची संख्याही वाढली़ मात्र, उघड्यावर शौचास बसणे हा प्रकार ग्रामीण भागात आजही सर्रास नजरेस पडत आहे़ यामुळे शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीनंतरही शौचालयाची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येते.सकाळच्या सुमारास ग्रामीण भागात ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे़ शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून शासनाने प्रोत्साहन अनुदानात वेळोवेळी वाढ केली़ त्यामुळे गावागावांत शौचालयाची संख्या वाढली़ मात्र, माहूर तालुक्यातील ग्रामीण भागतील अनेक कुटुंबियांचा शौचालयाचा वापर नाममात्र होत असल्याचे दिसते़ आजही ग्रामीण भागात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंब उघड्यावर शौचास बसतात, ही वस्तुस्थिती आहे.निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामसाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. त्यामुळेच २००८ मध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम करण्यात आले़ परिणामी ग्रामीण भागात हागणदारी काही प्रमाणात कमी झाली होती़ मात्र आता स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे़ या योजनेतंर्गत शौचालय बांधकाम करणाऱ्या कुटुंबियांना अनुदान दिले जात आहे़ पण ग्रामीण भागात शौचालयाचा वापर पाहिजे तशा प्रमाणात होत नसल्याने माहूर तालुक्यातील वानोळा, पाचोंदा, इवळेश्वर, लखमापूर, गुंडवळ , दिगडी कु., वाई बाजार परिसरातील अनेक गावांच्या स्थितीवरून असे दिसते. घरी शौचालय असताना बहुतांश नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याने परिस्थिती पाहिजे तशा प्रमाणात बदललेली नसल्याचे चित्र आजही माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत नाही.माहूर तालुक्यातील अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट करण्यात आली असून संबंधित लाभार्थी मात्र कंत्राटदारांच्या नावाने कामे अर्धवट केल्याने ओरडत आहे.

  • महाराष्ट्र शासनाकडून सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते़ ग्रामीण भागात सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने सन २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले़ या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. योजनेच्या यशानंतर केंद्र सरकारने सन २००५ मध्ये शौचालय बांधकाम करणाºया कुटुंबास प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येऊ लागले.
टॅग्स :NandedनांदेडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान