शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

माहूर तालुक्यात स्वच्छता अभियानाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:49 IST

शासनाने ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी विविध योजना राबविल्या़ शौचालय बांधकामास अनुदान दिले़ शौचालयांची संख्याही वाढली़ मात्र, उघड्यावर शौचास बसणे हा प्रकार ग्रामीण भागात आजही सर्रास नजरेस पडत आहे़

ठळक मुद्देशौचालयाची संख्या वाढली : नागरिक अजूनही बसतात उघड्यावरच

श्रीक्षेत्र माहूर : शासनाने ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी विविध योजना राबविल्या़ शौचालय बांधकामास अनुदान दिले़ शौचालयांची संख्याही वाढली़ मात्र, उघड्यावर शौचास बसणे हा प्रकार ग्रामीण भागात आजही सर्रास नजरेस पडत आहे़ यामुळे शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीनंतरही शौचालयाची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येते.सकाळच्या सुमारास ग्रामीण भागात ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे़ शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून शासनाने प्रोत्साहन अनुदानात वेळोवेळी वाढ केली़ त्यामुळे गावागावांत शौचालयाची संख्या वाढली़ मात्र, माहूर तालुक्यातील ग्रामीण भागतील अनेक कुटुंबियांचा शौचालयाचा वापर नाममात्र होत असल्याचे दिसते़ आजही ग्रामीण भागात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंब उघड्यावर शौचास बसतात, ही वस्तुस्थिती आहे.निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामसाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. त्यामुळेच २००८ मध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम करण्यात आले़ परिणामी ग्रामीण भागात हागणदारी काही प्रमाणात कमी झाली होती़ मात्र आता स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे़ या योजनेतंर्गत शौचालय बांधकाम करणाऱ्या कुटुंबियांना अनुदान दिले जात आहे़ पण ग्रामीण भागात शौचालयाचा वापर पाहिजे तशा प्रमाणात होत नसल्याने माहूर तालुक्यातील वानोळा, पाचोंदा, इवळेश्वर, लखमापूर, गुंडवळ , दिगडी कु., वाई बाजार परिसरातील अनेक गावांच्या स्थितीवरून असे दिसते. घरी शौचालय असताना बहुतांश नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याने परिस्थिती पाहिजे तशा प्रमाणात बदललेली नसल्याचे चित्र आजही माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत नाही.माहूर तालुक्यातील अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट करण्यात आली असून संबंधित लाभार्थी मात्र कंत्राटदारांच्या नावाने कामे अर्धवट केल्याने ओरडत आहे.

  • महाराष्ट्र शासनाकडून सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते़ ग्रामीण भागात सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने सन २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले़ या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. योजनेच्या यशानंतर केंद्र सरकारने सन २००५ मध्ये शौचालय बांधकाम करणाºया कुटुंबास प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येऊ लागले.
टॅग्स :NandedनांदेडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान