शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

महाजनादेश यात्रेतील मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये अहंकार आणि हुकूमशाही मानसिकतेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:33 IST

भाजपाची महाजनादेश यात्रा म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा आरोप

नांदेड : जनतेच्या दर्शनासाठी ही महाजनादेश यात्रा होती की जनतेला दर्शन देण्यासाठी ? असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. या यात्रेतील मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये अहंकाराचा दर्प आणि हुकूमशाही मानसिकता दर्शविणारी होती. यात्रेच्या माध्यमातून केवळ घोषणाबाजी झाली. ही यात्रा म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची केलेली निव्वळ धूळफेक असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनंतर सोमवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन यात्रेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. यात्रा लोकांसाठी असती तर मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद        साधला असता. त्यांची निवेदने स्वीकारली असती. मात्र जनतेचे म्हणणे ऐकून न घेता मुख्यमंत्र्यांनी यात्रेच्या माध्यमातून खोटे पण  रेटून बोलण्याचा धडाका लावला होता, असे ते म्हणाले. यात्रा येण्यापूर्वीच अनेक कार्यकर्त्यांची धडपकड करण्यात आली. काहींना नजरकैदेत ठेवण्यात आले. पोलिसांनीही याबाबत तारतम्य बाळगले नाही. धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नीला नजरकैदेत ठेवून महिलांप्रति असलेला सरकारचा दृष्टिकोनही दाखवून                              दिला. असाच लाजीरवाणा प्रकार राज्यभरात घडला. या दडपशाहीचा काँग्रेसच्या वतीने मी निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रमात एकाही महत्त्वाच्या मुद्यावर, सार्वजनिक प्रश्नावर ठोस आश्वासन दिले नाही.  नांदेडकरांचे पाणी पळविण्याचा  प्रयत्न झाला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केले नाही. आता इसापूरचे पाणी नांदेड शहराला देण्याचे सुतोवाच करुन नांदेड शहर विरुद्ध ग्रामीण असा नवा वाद निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कसलीही माहिती न घेता याबाबत मुख्यमंत्री बोलले. इसापूरचे पाणी नांदेडला देणार असाल तर शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नही चव्हाण यांनी केला. शासनाच्या या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील ६४ हजार हेक्टर सिंचनक्षेत्र कमी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नांदेड शहर आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेडमध्ये काही घोषणा केल्या. मात्र, या घोषणा पाहिल्यानंतर मला कल्याण, डोंबिवली आणि नाशिक महापालिकेची आठवण झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधीचा निधी कल्याण, डोंबिवलीला देण्याची घोषणा याच मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र डोंबिवलीकरांना काहीही मिळाले नाही. तीच बाब नाशिकची. नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री त्यानंतर         नाशिककडे फिरकलेही नाहीत.  त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर किती विश्वास ठेवायचा? असा  सवाल चव्हाण यांनी केला. पक्षांतरावर बोलताना चव्हाण          म्हणाले की, खऱ्या अर्थाने नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची उत्तम वेळ आली आहे.

अतिरेकी रिंधापुढे पोलीस हतबलअतिरेकी असलेला रिंधा नांदेडमध्ये डॉक्टर्स, क्लासेसचालकांसह नगरसेवकांकडेही खंडणीची सर्रास मागणी करीत आहे. अशाप्रकारच्या सहा ते सात घटना मागील काही दिवसांत पुढे आल्या आहेत. कोकूलवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या मुलालाही खंडणीसाठी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या गंभीर प्रकारानंतरही पोलीस यंत्रणा सुस्त असल्याचे दिसते. पोलिसांची भीती उरलेली नसल्यानेच रिंधासारख्या प्रवृत्ती वाढत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्रा