शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

१ जून रोजी खरेदी केंद्र बंद होणार; यंदा खरेदीविना कापूस पडून राहण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:53 IST

यावर्षी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये  खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र हे केंद्र विविध कारणामुळे तीन वेळा   बंद पडले. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळत गेली.

ठळक मुद्दे२४०० शेतकऱ्यांचा कापूस प्रतिक्षेत मागील तीन दिवसात ९५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी 

- गोकुळ भवरे

किनवट (जि. नांदेड) : किनवट तालुक्यातील चिखलीफाटा येथील कापूस खरेदी केंद्र  १ जून रोजी बंद होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील तीन दिवसात या केंद्रावर ९५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. अद्याप २ हजार ४०१ शेतकऱ्यांचा नोंदणी केलेला कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्यामुळे उरलेल्या दहा ते बारा दिवसात या कापसाची खरेदी प्रक्रिया कशी पार पडणार असा प्रश्न उपस्थित होत असून, यंदा मोठ्या प्रमाणात कापूस  तोलाईविना पडून राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

किनवट तालुक्यातील कापूस हे नगदी व मुख्य पीक असल्याने शेतकरी कापूस वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यावर्षी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये  खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र हे केंद्र विविध कारणामुळे तीन वेळा   बंद पडले. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळत गेली. सध्या तिसऱ्यांदा कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रावर मागील तीन दिवसात नोंदणी झालेल्या २ हजार ४९६ शेतकऱ्यांपैकी ९५ शेतकऱ्यांचा २ हजार ४५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.  सीसीआयने तिसऱ्यांदा कापूस खरेदी सुरू केली मात्र अधूनमधून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने खरेदी प्रक्रिया खोळंबत असल्याचे   कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवि तिरमनवार यांनी सांगितले.

तीन दिवसांत ९५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झालेला असल्याने उर्वरीत बारा दिवसात साधारणपणे पाचशे शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होऊ शकते. असे झाल्यास उर्वरीत साधारण १ हजार ९०० शेतकऱ्यांचा कापूस  घरातच पडून राहण्याची शक्यता  असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियातर्फे सुरु असलेली किनवट येथील कापूस खरेदी बंद झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कापूस एकतर तेलंगणातील आदीलाबाद येथे नेऊन विकावा लागेल. सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर कापूस पाठविणे अवघड आहे. त्यातच तेथे काय भाव मिळेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे स्थानिक खासगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने माल देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आढावू शकते.  या सर्व प्रकारामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

प्रति क्विंटल दोन हजार रुपये मदतीची मागणीपावसाळ्यात कापूस खरेदी होणार नसल्याने उर्वरीत हजारो क्विंटल कापूस यंदा खरेदीविना पडून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या पण कापूस खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने  प्रति क्विंटल दोन हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.

लॉकडाऊनमुळे मिळेनात कुशल मजूरएम. एच. कॉटेज जिनिंग प्रेसिंगमध्ये सध्या कापूस खरेदी सुरु आहे. मात्र लॉकडाऊनमुळे या ठिकाणी कुशल मजूर उपलब्ध झालेला नाही. पर्यायाने स्थानिक मजुरांकडून काम केले जात आहे. त्यामुळेही खरेदी प्रकिया संथपणे सुरु आहे.  तांत्रिक मजूर उपलब्ध नसल्याने चार दिवसांत चार मोटर जळाल्या असल्याचे जिनिंग प्रेसिंगचे व्यवस्थापक कल्हाळे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेड