शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महामानवांची वाटणी परवडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:54 IST

वर्तमानकाळातील समाज हा जात, धर्म आणि परस्पर द्वेषाने पछाडलेला आहे. जाती-जातीच्या महासंघांनी आपापल्या जातीश्रेष्ठत्वाचे अजेंडे पुढे रेटत आहेत. महामानवांची वाटणी होत आहे.

ठळक मुद्दे श्रीपाल सबनीस

कुंटूर : वर्तमानकाळातील समाज हा जात, धर्म आणि परस्पर द्वेषाने पछाडलेला आहे. जाती-जातीच्या महासंघांनी आपापल्या जातीश्रेष्ठत्वाचे अजेंडे पुढे रेटत आहेत. महामानवांची वाटणी होत आहे. आपल्या महामानवाचे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी दुसऱ्या महामानवाला कमी लेखले जात आहे. हे समाजासाठी, माणसांसाठी घातक आहे. कोणत्याही जातींच्या संघटना या त्या त्या जातीसाठी कितीही हितकरी भासत असल्यातरी त्या विनाशकारी आहेत. महामानवाची वाटणी तर परवडणारी नाहीच, असे प्रतिपादन अ.भा.साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष तथा विचारवंत लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.ते कुंटूर येथे पू. साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, प्रतिष्ठान कुंटूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६ व्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून बोलत होते.ते म्हणाले की, ग्रामीण साहित्यिकांनी ग्रामीण भागातील समस्यांना उजागर करणारे, ग्रामीण अर्थशास्त्राची पुनर्मांडणी करण्यासाठीची मानसिकता ग्रामीण माणसात निर्माण करणारे लेखन केले पाहिजे. ही मानसिकता निर्माण करण्यासाठी हे संमेलन आणि कुंटूरचे युवक धडपडत आहेत, हे पाहून मला समाधान वाटते आहे, अशी नोंद केली.यावेळी संमेलनाचे अध्यक्ष कवी इंद्रजित भालेराव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लेखकाचे प्रामाणिक लेखन हीच एक आंदोलनात्मक कृती असते, त्यामुळे लेखक कृतिशील आंदोलनात उतरत नाहीत म्हणून तक्रार करण्यात काही तथ्य नाही असे ते म्हणाले. पुढे बोलताना ग्रामीण भागात अभिरुची संपन्न वाचक घडवण्यासाठी गंभीर स्वरुपाची शिबिरे घेण्याचे आवाहन केले.यावेळी सर्वधर्मसमभाव विचारपीठावर राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश देशमुख कुंटूरकर, शिक्षणतज्ज्ञ, डॉ. सुरेश सावंत, सूर्यकांत पा. कदम, शिवाजी पा. होळकर, बाबूराव आडकिने, सूर्याजी चाडकर, बालाजीराव पवार, रुपेश कुंटूरकर, सौ़सबनीस आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या समारंभात वाचनालयाचे पुरस्कार संदीप ठाकरे, दत्ता डांगे, वसंत सुगावे, संजयसिंह राजपूत, दा.मा. बेंडे, डॉ. अनंता सूर यांना प्रदान करण्यात आले.स्वागताध्यक्ष मारोतराव कदम यांनी सर्वांचे स्वागत केले. तर या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. बाळू दुगडूमवार यांनी केले तर विनोद झुंजारे यांनी व्यक्त आभार मानले. संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडी व भाषावारीने झाली. दुपारी परिसंवादात शिवाजी आंबुलगेकर यांनी संत साहित्यातील बोली या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.त्यानंतर विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली अनिता यलमाटे, बालाजी पेठेकर यांचे बहारदार कथाकथन झाले. सायंकाळी डॉ. केशव खटिंग यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर कवींचे कविसंमेलन झाले. यात पन्नास कवींनी आपल्या रचना सादर केल्या़

टॅग्स :Nandedनांदेडliteratureसाहित्यShripal Sabnisश्रीपाल सबनीस