शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

'डॉक्टरांना बोलवा हो'; खाट न मिळाल्याने टाहो फोडत रुग्णवाहिकेतच सोडला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:24 IST

एकाही रुग्णालयाने कोरोना नसतानाही त्यांना दाखल करुन घेतले नाही़ शेवटी रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली़

ठळक मुद्देखाटासाठी बारा तास झिजविले रुग्णालयाचे उंबरठेरुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला़

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या  अकरा हजारांच्या पुढे गेली आहे़ त्यामुळे सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून रुग्णांना बेड मिळविण्यासाठी आटापिटा करावा लागत आहेत़ त्यातच नॉन कोविड  रुग्णाला तब्बल बारा तास फिरुनही खाट न मिळाल्याने रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेतच आपला जीव सोडावा लागला़ हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडला़

कोरोनाचा जिल्ह्यात संसर्ग वाढतच आहे़ दररोज तीनशेहून अधिक बाधित रुग्ण आढळत आहेत़ त्यातच सर्व शासकीय रुग्णालये आणि खाजगीत खाट मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे़ यात कोरोना रुग्णांबरोबर इतर आजारांच्या रुग्णांचीही ससेहोलपट होत आहे़ रविवारी रात्रीही असाच  संतापजनक प्रकार घडला़ कंधार तालुक्यातील दिग्रस बु़ येथील बालाजी वसंतराव चिद्रावार (वय ६८) यांची अँटीजेन तपासणी करण्यात आली होती़ त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला़

परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी दुपारी दीड वाजता नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना नांदेडला आणले होते़ शहरातील प्रत्येक रुग्णालयात ते गेले़ परंतु सर्वांनी एकही खाट शिल्लक नसल्याचे सांगितले़ शेवटी विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेले़ परंतु या ठिकाणीही खाट मिळाली नाही़ दुपारपासून रुग्णवाहिकेत असलेले बालाजीराव वेदनेने विव्हळत होते़ परंतु, कोरोनाचा संसर्ग झालेली माणुसकीच व्हेंटिलेटरवर गेल्याने त्यांची निराशा झाली़ शेवटी  बालाजी चिद्रावार यांनी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेतच शेवटचा श्वास घेतला़ यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला़  

डॉक्टरांना बोलवा होदुपारी दीड वाजेपासून रुग्णवाहिकेत असलेल्या बालाजीराव यांची प्रकृती तासागणिक ढासळत चालली होती़ आपल्याला एकही रुग्णालय दाखल करुन घेत नसल्यामुळे त्यांच्या मनाला जबर धक्का बसला होता़ त्यातच डॉक्टरला बोलवा हो़़़मला उपचाराची गरज आहे, असा टाहो ते फोडत होते़ परंतु नातेवाईकही हतबल होते़ अश्रू गाळण्याशिवाय त्यांच्याकडेही पर्याय नव्हता़ शेवटी रुग्णवाहिकेतच बालाजीराव यांना जीव सोडावा लागला़

डॉक्टरांनी येवून पाहिले नाहीमाझ्या वडिलांना दुपारी दीड वाजता उपचारासाठी नांदेडात आणले होते़ रुग्णवाहिकेतून ते स्वत: उतरत होते़ शहरातील सर्व रुग्णालयात आम्ही गेलो़ आमदारांचे शिफारसपत्रही आणले होते़ एकाही ठिकाणी डॉक्टरने येवून त्यांची तपासणीही केली नाही़ परंतु, एकाही रुग्णालयाने कोरोना नसतानाही त्यांना दाखल करुन घेतले नाही़ शेवटी रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली़ असा कसा हा कारभार? माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? असा संतप्त सवाल स्वाती संगनवार व साईनाथ चिद्रावार यांनी केला आहे़

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूdoctorडॉक्टर