शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

'डॉक्टरांना बोलवा हो'; खाट न मिळाल्याने टाहो फोडत रुग्णवाहिकेतच सोडला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:24 IST

एकाही रुग्णालयाने कोरोना नसतानाही त्यांना दाखल करुन घेतले नाही़ शेवटी रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली़

ठळक मुद्देखाटासाठी बारा तास झिजविले रुग्णालयाचे उंबरठेरुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला़

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या  अकरा हजारांच्या पुढे गेली आहे़ त्यामुळे सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून रुग्णांना बेड मिळविण्यासाठी आटापिटा करावा लागत आहेत़ त्यातच नॉन कोविड  रुग्णाला तब्बल बारा तास फिरुनही खाट न मिळाल्याने रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेतच आपला जीव सोडावा लागला़ हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडला़

कोरोनाचा जिल्ह्यात संसर्ग वाढतच आहे़ दररोज तीनशेहून अधिक बाधित रुग्ण आढळत आहेत़ त्यातच सर्व शासकीय रुग्णालये आणि खाजगीत खाट मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे़ यात कोरोना रुग्णांबरोबर इतर आजारांच्या रुग्णांचीही ससेहोलपट होत आहे़ रविवारी रात्रीही असाच  संतापजनक प्रकार घडला़ कंधार तालुक्यातील दिग्रस बु़ येथील बालाजी वसंतराव चिद्रावार (वय ६८) यांची अँटीजेन तपासणी करण्यात आली होती़ त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला़

परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी दुपारी दीड वाजता नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना नांदेडला आणले होते़ शहरातील प्रत्येक रुग्णालयात ते गेले़ परंतु सर्वांनी एकही खाट शिल्लक नसल्याचे सांगितले़ शेवटी विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेले़ परंतु या ठिकाणीही खाट मिळाली नाही़ दुपारपासून रुग्णवाहिकेत असलेले बालाजीराव वेदनेने विव्हळत होते़ परंतु, कोरोनाचा संसर्ग झालेली माणुसकीच व्हेंटिलेटरवर गेल्याने त्यांची निराशा झाली़ शेवटी  बालाजी चिद्रावार यांनी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेतच शेवटचा श्वास घेतला़ यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला़  

डॉक्टरांना बोलवा होदुपारी दीड वाजेपासून रुग्णवाहिकेत असलेल्या बालाजीराव यांची प्रकृती तासागणिक ढासळत चालली होती़ आपल्याला एकही रुग्णालय दाखल करुन घेत नसल्यामुळे त्यांच्या मनाला जबर धक्का बसला होता़ त्यातच डॉक्टरला बोलवा हो़़़मला उपचाराची गरज आहे, असा टाहो ते फोडत होते़ परंतु नातेवाईकही हतबल होते़ अश्रू गाळण्याशिवाय त्यांच्याकडेही पर्याय नव्हता़ शेवटी रुग्णवाहिकेतच बालाजीराव यांना जीव सोडावा लागला़

डॉक्टरांनी येवून पाहिले नाहीमाझ्या वडिलांना दुपारी दीड वाजता उपचारासाठी नांदेडात आणले होते़ रुग्णवाहिकेतून ते स्वत: उतरत होते़ शहरातील सर्व रुग्णालयात आम्ही गेलो़ आमदारांचे शिफारसपत्रही आणले होते़ एकाही ठिकाणी डॉक्टरने येवून त्यांची तपासणीही केली नाही़ परंतु, एकाही रुग्णालयाने कोरोना नसतानाही त्यांना दाखल करुन घेतले नाही़ शेवटी रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली़ असा कसा हा कारभार? माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? असा संतप्त सवाल स्वाती संगनवार व साईनाथ चिद्रावार यांनी केला आहे़

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूdoctorडॉक्टर