शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

नांदेड जिल्ह्यात बैलजोडीस सोन्याचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:23 IST

शेती म्हटली की बैल आलाच, असे समीकरण असताना आज यंत्रामध्ये शेती व्यवसाय गुरफटला गेला आहे. बैलजोडी सांभाळून शेती करणे ...

शेती म्हटली की बैल आलाच, असे समीकरण असताना आज यंत्रामध्ये शेती व्यवसाय गुरफटला गेला आहे. बैलजोडी सांभाळून शेती करणे आज जिकिरीचे काम झाले आहे. येत्या काळात बैल अथवा दुधाची जनावरे सांभाळणाऱ्यांची संख्या गावपातळीवर बोटावर मोजण्याएवढीच राहील, असे आजचे चित्र आहे. परंतु, काही शेतकरी आजही पारंपरिक शेती करण्यावर भर देत आहेत. परंतु, जमिनीचे तुकडे झाल्याने बैल सांभाळणे परवडणारे नाही. एका बैलाची जोडी जवळपास एक लाख ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत असल्याचे पाहायला मिळते. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड, जांब, हळी-हंडरगुळी, उमरी, किनवट, बिलोली, अर्धापूर, माहूर, धर्माबाद आदी गावात बैलबाजार भरतो. त्यात कंधार तालुक्यातील बैलबाजार हे कंधारी बैलजोडीसाठी प्रसिद्ध आहेत. सदर बैलांची किंमत दीड ते साडेतीन लाख रुपये किमती आहेत. परंतु, कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी बैलजोडी विकून दुधाची जनावरे घेणे पसंत केले. दरम्यान, चारा महागल्याने कोणतेही जनावर सांभाळायचे म्हटले तर महिनाकाठी अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो. त्यात दुधाळ जनावरे सांभाळण्यासाठी हिरवा चारा तसेच ढेप, सरकी, खल्ली आदीची गरज असते. बरेच जण शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या किमतीत वाढ झाली आहे.