शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मराठवाड्यात बुलेट ट्रेन आणण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:14 IST

नांदेड : मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अहमदाबाद बुलेट ट्रेनला आमचा विरोध कायम आहे. परंतु अधिक वेगाने प्रवास करण्यासाठी जर ही ...

नांदेड : मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अहमदाबाद बुलेट ट्रेनला आमचा विरोध कायम आहे. परंतु अधिक वेगाने प्रवास करण्यासाठी जर ही बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या इतर भागांतून जात असेल तर ती मराठवाड्यातूनसुद्धा गेली पाहिजे. ही बुलेट ट्रेन मराठवाड्यात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.

येथील कै. रामगोपाल गुप्ता को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेटच्या इमारत भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आ. मोहन हंबर्डे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, महापौर मोहिनीताई येवनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर मसूद खान, मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सतीश सामते, उपाध्यक्ष नवल गुप्ता आदींची उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या काही भागातून बुलेट ट्रेनचे जाळे विणले जावे यासाठीचे प्रस्ताव पुढे येत आहेत. मुंबईहून सोलापूरमार्गे हैदराबाद व मुंबईहून नागपूर या बुलेट ट्रेनसाठी चाचपणी सुरू असताना बुलेट ट्रेन मुंबईहून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे हैदराबाद व्हावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, केंद्र सरकारमधील संबंधित यंत्रणेलाही भेटणार आहे. परंतु हे काम एकट्या-दुकट्याचे नाही, तर त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. समाजात काम करणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था, प्रसार माध्यमे व नागरिकांनी यासाठी जर लोकचळवळ निर्माण केली तर बुलेट ट्रेन हे मराठवाड्यासाठी स्वप्न नव्हे, तर वास्तव होऊ शकते, असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला.

मराठवाड्यातील रेल्वेचा विस्तार करण्यासाठी, ब्रॉडगेजसाठी व रेल्वेच्या विभागीय कार्यालयासाठी आपण संघर्ष केला. त्यामुळे यातील अनेक बाबी साध्य झाल्या. त्याच पद्धतीने बुलेट ट्रेनसाठीसुद्धा प्रयत्न करावेत. बुलेट ट्रेनच्या निर्मितीसाठी वेगळ्या भूसंपादनाची गरज नसून समृद्धी महामार्गाने अधिगृहीत केलेल्या जमिनीवरूनच या बुलेट ट्रेनचा मार्ग टाकला जाऊ शकतो, असे मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे. सुरुवात तर मी केली आहे, आता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

औद्योगिक वसाहतीतील विविध समस्या सोडविण्यासाठी आपण पूर्वीपासूनच कामाला लागलो असून, या वसाहतीच्या सभोवतालचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

या वेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, संस्थेचे अध्यक्ष सतीश सामते यांची समयोचित भाषणे झाली. या वेळी काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, संपादक शंतनू डोईफोडे, प्रवक्ते संतोष पांडागळे, किशोर स्वामी, नागनाथ गड्डम, मंगेश कदम, किशोर भवरे, अ‍ॅड. नीलेश पावडे, राजेश पावडे, रवी कडगे, नितीन आगळे, जयदत्त तक्तापुरे उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले. आभार नारायण क्षीरसागर यांनी मानले.