शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नांदेड जिल्ह्यातील पेठवडजमध्ये ‘बाटली’ उभीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:01 IST

नांदेड: कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दारुची बाटली आडवी का उभी? यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदार यादीतून ऐनवेळी वगळलेली नावे, तारखेत अनेकवेळा केलेला बदल अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात सापडली आहे़ प्रशासनाने मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचा दाखला देत उभ्या बाटलीचे समर्थन केले आहे़

ठळक मुद्देअनेक महिलांची नावे गायब, तारखेतही अनेकवेळा बदल मतदान प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दारुची बाटली आडवी का उभी? यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदार यादीतून ऐनवेळी वगळलेली नावे, तारखेत अनेकवेळा केलेला बदल अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात सापडली आहे़ प्रशासनाने मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचा दाखला देत उभ्या बाटलीचे समर्थन केले आहे़जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेले कंधार तालुक्यातील पेठवडज हे गाव बाजारपेठेसाठी प्रसिद्ध़ परंतु वीटभट्टी आणि ऊसतोडीसाठी गावातील अनेक कुटुंब दरवर्षी स्थलांतर करतात़ त्यामुळे दारुबंदीसाठी दिवाळीपूर्वी मतदान घ्यावे, अशी मागणी गेल्या सात वर्षांपासून दारु विक्रीच्या विरोधात असलेल्या शिक्षिका जनाबाई भालेराव यांनी केली होती़, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले़ २० मे रोजी ग्रामसभेत ठराव झाला होता़ १५२९ महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन त्यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले़ त्यानंतर २३ जुलै रोजी मतदान घ्यावे असे पत्र काढण्यात आले़ उत्पादन शुल्कच्या नियमानुसार यावर एक महिन्यात कार्यवाही करणे अपेक्षित होते़परंतु मतदान घेण्याच्या सात दिवसांपूर्वी तशी नोटीस काढणेही आवश्यक आहे़ परंतु प्रशासनाने २१ नोव्हेंबरला पत्र काढले अन् २३ नोव्हेंबरला मतदान घेण्याचे ठरले, परंतु प्रशासकीय अडचण होण्याची चिन्हे दिसताच ९ डिसेंबरला मतदान घेण्याचे निश्चित करण्यात आले़ तत्पूर्वी स्वाक्षºयांची पडताळणी करण्यात आली़ पडताळणीला ६२९ महिला उपस्थित होत्या़ त्यामध्ये चुडाजी वाडीच्या महिलाही होत्या़ परंतु मतदानाच्या दिवशी मात्र मतदार यादीत त्यांची नावे नसल्याची बाब पुढे आली़ प्रशासनाने २४२० महिला मतदान करतील असे जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात या यादीतून मयत, लग्न होवून माहेरी गेलेल्या, स्थलांतरित या महिलांची नावे समाविष्ट होती़ प्रशासनाने सर्वेक्षण करुन मतदान यादीतून ही नावे गाळण्याची गरज होती, परंतु ती नावे तशीच ठेवून पात्र असलेल्या चुडाजी वाडीच्या महिलांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले़आजघडीला गावात सर्वेक्षण केल्यास १२०० पेक्षा अधिक महिला नसतील असा दावाही शिक्षिका भालेराव यांनी केला आहे़त्यामुळे मतदार यादीतील हा गोंधळ शेवटपर्यंत सुरुच होता़ मतदानाच्या वेळी काही मद्यपींनी गोंधळ घातल्यानंतर मतदान न करताच अनेक महिलांना माघारी पाठविण्यात आले़ असा आरोपही भालेराव यांनी केला आहे़ एकूणच बाटलीसाठी झालेली ही मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली आहे, परंतु त्यामध्ये दारुबंदीसाठी लढणाºया महिलांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे़ दारुबंदी होईपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार महिलांनी केला़लढा सुरुच राहणारदारुबंदीच्या विरोधात पेठवडजमध्ये २०११ पासून महिलांचा लढा सुरु आहे़ दारुमुळे आजपर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत़ दारुबंदीसाठी महिला पुढे आल्या़ परंतु प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही़ मतदार याद्यामध्ये गोंधळ होता़ मतदानाच्या तारखाही बदलण्यात आल्या़ त्यामुळे गोंधळात भरच पडली़ परंतु त्यामुळे खचून न जाता दारुबंदीचा हा लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार शिक्षिका भालेराव यांनी केला़