शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील पेठवडजमध्ये ‘बाटली’ उभीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:01 IST

नांदेड: कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दारुची बाटली आडवी का उभी? यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदार यादीतून ऐनवेळी वगळलेली नावे, तारखेत अनेकवेळा केलेला बदल अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात सापडली आहे़ प्रशासनाने मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचा दाखला देत उभ्या बाटलीचे समर्थन केले आहे़

ठळक मुद्देअनेक महिलांची नावे गायब, तारखेतही अनेकवेळा बदल मतदान प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दारुची बाटली आडवी का उभी? यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदार यादीतून ऐनवेळी वगळलेली नावे, तारखेत अनेकवेळा केलेला बदल अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात सापडली आहे़ प्रशासनाने मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचा दाखला देत उभ्या बाटलीचे समर्थन केले आहे़जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेले कंधार तालुक्यातील पेठवडज हे गाव बाजारपेठेसाठी प्रसिद्ध़ परंतु वीटभट्टी आणि ऊसतोडीसाठी गावातील अनेक कुटुंब दरवर्षी स्थलांतर करतात़ त्यामुळे दारुबंदीसाठी दिवाळीपूर्वी मतदान घ्यावे, अशी मागणी गेल्या सात वर्षांपासून दारु विक्रीच्या विरोधात असलेल्या शिक्षिका जनाबाई भालेराव यांनी केली होती़, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले़ २० मे रोजी ग्रामसभेत ठराव झाला होता़ १५२९ महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन त्यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले़ त्यानंतर २३ जुलै रोजी मतदान घ्यावे असे पत्र काढण्यात आले़ उत्पादन शुल्कच्या नियमानुसार यावर एक महिन्यात कार्यवाही करणे अपेक्षित होते़परंतु मतदान घेण्याच्या सात दिवसांपूर्वी तशी नोटीस काढणेही आवश्यक आहे़ परंतु प्रशासनाने २१ नोव्हेंबरला पत्र काढले अन् २३ नोव्हेंबरला मतदान घेण्याचे ठरले, परंतु प्रशासकीय अडचण होण्याची चिन्हे दिसताच ९ डिसेंबरला मतदान घेण्याचे निश्चित करण्यात आले़ तत्पूर्वी स्वाक्षºयांची पडताळणी करण्यात आली़ पडताळणीला ६२९ महिला उपस्थित होत्या़ त्यामध्ये चुडाजी वाडीच्या महिलाही होत्या़ परंतु मतदानाच्या दिवशी मात्र मतदार यादीत त्यांची नावे नसल्याची बाब पुढे आली़ प्रशासनाने २४२० महिला मतदान करतील असे जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात या यादीतून मयत, लग्न होवून माहेरी गेलेल्या, स्थलांतरित या महिलांची नावे समाविष्ट होती़ प्रशासनाने सर्वेक्षण करुन मतदान यादीतून ही नावे गाळण्याची गरज होती, परंतु ती नावे तशीच ठेवून पात्र असलेल्या चुडाजी वाडीच्या महिलांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले़आजघडीला गावात सर्वेक्षण केल्यास १२०० पेक्षा अधिक महिला नसतील असा दावाही शिक्षिका भालेराव यांनी केला आहे़त्यामुळे मतदार यादीतील हा गोंधळ शेवटपर्यंत सुरुच होता़ मतदानाच्या वेळी काही मद्यपींनी गोंधळ घातल्यानंतर मतदान न करताच अनेक महिलांना माघारी पाठविण्यात आले़ असा आरोपही भालेराव यांनी केला आहे़ एकूणच बाटलीसाठी झालेली ही मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली आहे, परंतु त्यामध्ये दारुबंदीसाठी लढणाºया महिलांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे़ दारुबंदी होईपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार महिलांनी केला़लढा सुरुच राहणारदारुबंदीच्या विरोधात पेठवडजमध्ये २०११ पासून महिलांचा लढा सुरु आहे़ दारुमुळे आजपर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत़ दारुबंदीसाठी महिला पुढे आल्या़ परंतु प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही़ मतदार याद्यामध्ये गोंधळ होता़ मतदानाच्या तारखाही बदलण्यात आल्या़ त्यामुळे गोंधळात भरच पडली़ परंतु त्यामुळे खचून न जाता दारुबंदीचा हा लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार शिक्षिका भालेराव यांनी केला़