शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

नांदेडात पायी चालणा-या दोघांना भरधाव कारने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:03 IST

भरधाव कारच्या जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या दोन २२ वर्षीय तरूणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील जवाहरनगर, तुप्पा (ता.नांदेड) येथील चढावर घडली. या अपघातामुळे पुन्हा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देतुप्पा येथे अपघात : दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : भरधाव कारच्या जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या दोन २२ वर्षीय तरूणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील जवाहरनगर, तुप्पा (ता.नांदेड) येथील चढावर घडली. या अपघातामुळे पुन्हा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंटूर (ता.नायगाव बाजार जि. नांदेड) येथील दत्ता विठ्ठल गिरी व रामेश्वर गुरूलिंग मठपती (स्वामी) हे दोन तरूण शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जवाहरनगर, तुप्पा परिसरातून गावाकडे पायी जात होते.दरम्यान, याचवेळी भरधाव वेगाने जाणाºया कार (क्रमांक एमएच- २६, एस- ०६०३) ने पायी जात असलेल्या या दोन्ही तरुणांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत गिरी व स्वामी या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच रामेश्वर मठपती-स्वामी व दत्ता गिरी (रा.कुंटूर) या दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे पोलीस ठाणे अंमलदार रमेश राठोड व मदतनीस पो. कॉ. विशाल वाघमारे यांनी सांगितले.याप्रकरणी नामदेव गोविंदराव गिरी (रा.कुंटूर) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी उपरोल्लेखित कारचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पो.नि. एस. एस. आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राजेश जाधव व नाईक पो. कॉ. दिलीप चक्रधर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी कारचालक हा कारसह पसार झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हे दोन्ही तरुण रोजंदारीचे काम करुन कुटुंबाला हातभार लावत होते. अपघातामुळे कुटुंबाचा आधार हरवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पसार कारचालकाचा तातडीने शोध घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुंटूर ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

भरधाव वाहनधारकांवर कारवाईची मागणीमागील काही दिवसांत जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या घटना नादुरुस्त रस्ते तसेच भरधाव वाहनांमुळे घडल्याचे पुढे आले आहे.नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यातच वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत.अशा वाहनचालकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.