शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात पायी चालणा-या दोघांना भरधाव कारने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:03 IST

भरधाव कारच्या जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या दोन २२ वर्षीय तरूणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील जवाहरनगर, तुप्पा (ता.नांदेड) येथील चढावर घडली. या अपघातामुळे पुन्हा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देतुप्पा येथे अपघात : दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : भरधाव कारच्या जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या दोन २२ वर्षीय तरूणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील जवाहरनगर, तुप्पा (ता.नांदेड) येथील चढावर घडली. या अपघातामुळे पुन्हा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंटूर (ता.नायगाव बाजार जि. नांदेड) येथील दत्ता विठ्ठल गिरी व रामेश्वर गुरूलिंग मठपती (स्वामी) हे दोन तरूण शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जवाहरनगर, तुप्पा परिसरातून गावाकडे पायी जात होते.दरम्यान, याचवेळी भरधाव वेगाने जाणाºया कार (क्रमांक एमएच- २६, एस- ०६०३) ने पायी जात असलेल्या या दोन्ही तरुणांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत गिरी व स्वामी या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच रामेश्वर मठपती-स्वामी व दत्ता गिरी (रा.कुंटूर) या दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे पोलीस ठाणे अंमलदार रमेश राठोड व मदतनीस पो. कॉ. विशाल वाघमारे यांनी सांगितले.याप्रकरणी नामदेव गोविंदराव गिरी (रा.कुंटूर) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी उपरोल्लेखित कारचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पो.नि. एस. एस. आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राजेश जाधव व नाईक पो. कॉ. दिलीप चक्रधर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी कारचालक हा कारसह पसार झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हे दोन्ही तरुण रोजंदारीचे काम करुन कुटुंबाला हातभार लावत होते. अपघातामुळे कुटुंबाचा आधार हरवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पसार कारचालकाचा तातडीने शोध घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुंटूर ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

भरधाव वाहनधारकांवर कारवाईची मागणीमागील काही दिवसांत जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या घटना नादुरुस्त रस्ते तसेच भरधाव वाहनांमुळे घडल्याचे पुढे आले आहे.नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यातच वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत.अशा वाहनचालकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.