शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

नांदेडात पायी चालणा-या दोघांना भरधाव कारने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:03 IST

भरधाव कारच्या जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या दोन २२ वर्षीय तरूणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील जवाहरनगर, तुप्पा (ता.नांदेड) येथील चढावर घडली. या अपघातामुळे पुन्हा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देतुप्पा येथे अपघात : दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : भरधाव कारच्या जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या दोन २२ वर्षीय तरूणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील जवाहरनगर, तुप्पा (ता.नांदेड) येथील चढावर घडली. या अपघातामुळे पुन्हा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंटूर (ता.नायगाव बाजार जि. नांदेड) येथील दत्ता विठ्ठल गिरी व रामेश्वर गुरूलिंग मठपती (स्वामी) हे दोन तरूण शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जवाहरनगर, तुप्पा परिसरातून गावाकडे पायी जात होते.दरम्यान, याचवेळी भरधाव वेगाने जाणाºया कार (क्रमांक एमएच- २६, एस- ०६०३) ने पायी जात असलेल्या या दोन्ही तरुणांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत गिरी व स्वामी या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच रामेश्वर मठपती-स्वामी व दत्ता गिरी (रा.कुंटूर) या दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे पोलीस ठाणे अंमलदार रमेश राठोड व मदतनीस पो. कॉ. विशाल वाघमारे यांनी सांगितले.याप्रकरणी नामदेव गोविंदराव गिरी (रा.कुंटूर) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी उपरोल्लेखित कारचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पो.नि. एस. एस. आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राजेश जाधव व नाईक पो. कॉ. दिलीप चक्रधर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी कारचालक हा कारसह पसार झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हे दोन्ही तरुण रोजंदारीचे काम करुन कुटुंबाला हातभार लावत होते. अपघातामुळे कुटुंबाचा आधार हरवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पसार कारचालकाचा तातडीने शोध घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुंटूर ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

भरधाव वाहनधारकांवर कारवाईची मागणीमागील काही दिवसांत जिल्ह्यात घडलेल्या अपघातांच्या घटना नादुरुस्त रस्ते तसेच भरधाव वाहनांमुळे घडल्याचे पुढे आले आहे.नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यातच वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत.अशा वाहनचालकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.