शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

कोरोना संकटातही भाजपाचे गलिच्छ राजकारण; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी डागली तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:17 IST

राजभवनाचे उंबरठे झिजवून ही मंडळी गलिच्छ राजकारण करीत आहेत. सरकार अस्थिर करण्याच्या या कारस्थानाची कीव येते असेही त्या म्हणाल्या.  

ठळक मुद्देसुर्यकांता पाटील यांनी सोशल मिडीयाद्वारे राजकारणातून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करीत आहेत.

नांदेड : कोरोना संकटाने जगभर थैमान घातले आहे. राज्यातही अनेक मृत्यू झाले आहेत. प्रत्येकाच्या दारात मृत्यू उभा आहे. अशा या परिस्थितीत सर्वांनी एकत्रित येवून या संकटाचा सामना करणे अपेक्षित असताना भाजपाचे काही नेते सत्तेसाठी राजभवनाचे उंबरठे  झिजवत आहेत. हे खेदजनक तसेच संतापजनक असल्याची टिका करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. जे काही घडते आहे ते वेदनादायी असल्याचे सांगत हा सर्व प्रकार पाहूनच राजकारणात रहावे की नाही? असा प्रश्न पडतो. असे सांगत आपण आपली भूमिका लवकरच जाहीर करु, असेही त्या म्हणाल्या

सुर्यकांता पाटील यांनी सोशल मिडीयावर संदेश टाकून आपण राजकारणातून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमिवर त्यांच्याशी संपर्क साधला असता,  राज्यात कोरोनाचे संकट गंभीर  आहे. या परिस्थितीत सरकारच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी काही मंडळी सत्तेसाठी राजभवनाचे उंबरठे झिजवून गलिच्छ राजकारण करीत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यात महाविकास आघाडीला अपयश आल्याचा कांगावा करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात आणीबाणी लागू करावी, अशी मागणी करत राजभवनाला खेटे घातल्याचे सांगत, भाजपाच्या राजकारणावर त्यांनी घणाघात टिका केली.  

राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या जीवाची चिंता लागली आहे. मरण दारात उभे आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करीत आहेत.  राज्यात मोठ्या प्रमाणावर सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ते प्रयत्नशिल असताना ज्यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगले, ज्यांना अनुभव आहे अशा मंडळींनी आपल्या अनुभवाचा फायदा सरकारला करुन देणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाचे उंबरठे झिजवून ही मंडळी गलिच्छ राजकारण करीत आहेत. सरकार अस्थिर करण्याच्या या कारस्थानाची कीव येते असेही त्या म्हणाल्या.  

टॅग्स :BJPभाजपाNandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्या