शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

भाजपाची धोरणे केवळ श्रीमंतांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:39 IST

देशातील व राज्यातील भाजप सरकार मनुवादी विचारांचे व सामाजिक विषमता निर्माण करणारे आहे. या सरकारची धोरणे केवळ मोजक्या श्रीमंतांसाठी आहेत. त्यामुळे या भाजपा सरकारला खाली खेचा, काँग्रेसला सत्ता द्या.

ठळक मुद्देविविध घटकांशी अशोकराव चव्हाण यांनी साधला संवाद

नांदेड : देशातील व राज्यातील भाजप सरकार मनुवादी विचारांचे व सामाजिक विषमता निर्माण करणारे आहे. या सरकारची धोरणे केवळ मोजक्या श्रीमंतांसाठी आहेत. त्यामुळे या भाजपा सरकारला खाली खेचा, काँग्रेसला सत्ता द्या. आपल्या सर्व मागण्या पूर्ण करु, असे आश्वासन काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांनी दिले.मातंग समाज आणि अखिल भारतीय माळी महासंघाची बैठक जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात घेण्यात आली. तसेच धनेगाव येथे वाहन मालक - चालक संघटनेच्या बैठकीतही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी विचार मांडले.यावेळी आ. डी. पी. सावंत, गोविंद शिंदे नागेलीकर, नरेंद्र चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशात सामाजिक समतोल असणे महत्त्वाचे आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात सामाजिक विषमता निर्माण करण्यात आली आहे. घोषणांद्वारे केवळ कोपराला गुळ लावण्याचे काम भाजप करीत असल्याची टीकाही खा. चव्हाण यांनी केली. ते म्हणाले, माळी समाज व मातंग समाज हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार आहे. सत्तेचा वाटा सर्व समाजाला मिळाला पाहिजे. ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे. काँग्रेस सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने सामाजिक समतोलाची विचारसरणी जिल्हा पातळीपर्यंत रुजवली आहे.केवळ मताची विभागणी टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व समाजवादी पक्षाला मते देवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.गुरुद्वारा प्रबंधक समितीमध्ये लोकनियुक्तऐवजी शासननियुक्त अध्यक्ष करण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडला पाहिजे, असेही खा. चव्हाण यांनी सांगितले.या सभेत बोलताना आ. डी. पी. सावंत यांनी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचा आॅटोमोटिव्हचा व्यवसाय आहे. पण भाजपचे उमेदवार मात्र बेनामी दारु दुकाने इतरांच्या नावे करुन पैसे कमावतात.दारुमुळे कोणाला रोजगार मिळत नाही तर अनेकांचे संसार देशोधडीला लागतात. अशोक चव्हाण हे दारुचे डीलर नव्हे तर जनतेचे लीडर आहेत, असेही आ. सावंत यांनी सांगितले. मोदीची नांदेडमध्ये झालेली सभा म्हणजे जुनी कॅसेट आहे. या कॅसेटमध्ये त्यांना उमेदवाराचे नावही आठवले नाही. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा उल्लेखच पंतप्रधानांनी केला नसेल तर त्यांना जनतेने काय म्हणून मते द्यावी, असा सवालही आ. सावंत यांनी व्यक्त केला.यावेळी आनंद गुंडले, अ‍ॅड. सुरेंद्र घोडजकर, प्रदीप वाघमारे, रामेश्वर भालेराव, सुखविंदरसिंघ हुंदल, सखाराम शितळे, प्रल्हाद सोळंके, गणपतराव उमरे, गणेश तादलापूरकर, भीमराव जेठे, शेख फारुख, भागिंदरसिंघ घडीसाज आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा