शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

भाजप सरकार फसवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:05 AM

राज्यासह देशातील बेरोजगारी, असहिष्णुता, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पिण्याच्या पाण्याचे, उद्योग व शेतीच्या पाण्याचे भाव वाढविले. शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली, वीज कनेक्शन तोडणे, शेती सिंचनासाठी आवश्यक सामग्रीच्या किमतीत वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी हा राज्याच्या, देशाचा कणा आहे. मात्र हे सरकार कणाच मोडायला निघाले आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ठळक मुद्दे अजित पवार यांचा घणाघातलोहा येथे हल्लाबोल मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कलोहा: राज्यासह देशातील बेरोजगारी, असहिष्णुता, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पिण्याच्या पाण्याचे, उद्योग व शेतीच्या पाण्याचे भाव वाढविले. शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली, वीज कनेक्शन तोडणे, शेती सिंचनासाठी आवश्यक सामग्रीच्या किमतीत वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी हा राज्याच्या, देशाचा कणा आहे. मात्र हे सरकार कणाच मोडायला निघाले आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.लोहा येथील बैल बाजार मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी हल्लाबोल मेळावा घेण्यात आला़ याप्रसंगी अजित पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. शंकरअण्णा धोंडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्ष प्रवक्ते नवाब मलीक, चित्राताई वाघ, कमलकिशोर कदम, संग्राम कोते, आ.सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, कल्पना पाटील डोंगळीकर, प्रांजली रावणगावकर, बसवराज पाटील, वसंत सुगावे, हरिहर भोसीकर, जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, दिलीप धोंडगे, संजय क-हाळे, बाबूराव केंद्रे, आदींची उपस्थिती होती.अजित पवार म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात लोहा-कंधार मतदारसंघात विविध धरणे, बॅरेजेस, तलावाला कुठलाही भेदभाव न ठेवता भरभरुन देण्यात आले़ पाण्यामुळे मराठवाडा सुजलाम् सुफलाम् होईल, नदीकाठची गावे हिरवीगार होऊन शेतकरी सुखी होईल. परंतु आजचे सरकार शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडत आहे.शेतकºयांचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली तीही फसवी, साडेतीन वर्षांत एकाही बेरोजगाराला नोकरी दिली नाही. मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही. शाळा, महाविद्यालय बंद होत आहेत. मग गरिबांच्या मुलांनी शिक्षण कसे घ्यायचे? प्रारंभी शिवाजी चौक ते मेळावा मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी धनंजय मुंडे, चित्राताई वाघ, नवाब मलीक यांनी सरकारवर हल्लाबोल केला. माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या खास शैलीतून स्थानिक आमदारावर चांगलेच तोंडसूख घेतले. यशस्वीतेसाठी डॉ. सुनील धोंडगे, विलास पाटील घोरबांड, दत्ता पाटील तळणीकर, माधव पाटील मोरे, संतोष पाटील दगडगावकर, मनोज पा. मोरे आदींनी सहकार्य केले.संविधान बचाव रॅलीमुळेच तिरंगा रॅली४जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा आणि तो सोडविण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा अधिकार विरोधी पक्षाला असतो़ परंतु, विरोधी पक्षाने जाहीर केलेला कोणताही कार्यक्रम चिरडून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे़ येत्या २६ जानेवारीला सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून संविधान बचाव रॅली काढण्याचा निर्णय घेतला़ ही रॅली अयशस्वी करण्यासाठीच भाजपने तिरंगा रॅली काढण्याचे नियोजन केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला़ सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात समाजातील कोणता घटक समाधानी आहे? असा सवालही त्यांनी केला़वाघाचा कासव झाला४बाळासाहेबानंतर आता शिवसेनेचा वाघ राहिला नाही तर तो शेळी झाला आहे़ नंतर तो ससा झाला, अन् आता तर कासव झाला. शिवसेनेत पूर्वीसारखी धमक राहिली नाही. शेपूट खाली घालून पळतो अशी अवस्था सेनेची झाल्याचे सांगत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले़