शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

BharatJodoYatra: घाबरलेल्या भाजपकडून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न

By शिवराज बिचेवार | Updated: November 9, 2022 12:15 IST

ही चुनाव जितो यात्रा नाही, परंतू यात्रेमुळे काँग्रेसला संजीवनी

नांदेड- येणाऱ्या निवडणुकीत या यात्रेचे काय परिणाम होतील याचा आम्ही विचार करीत नाही. तो येणारा काळ ठरवेल. परंतु एवढे मात्र नक्की या यात्रेमुळे भाजप मात्र घाबरली आहे, त्यामुळेच दररोज टी शर्ट कोणते घातले?, काय जेवण केले? यावरून टीका करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला. 

भारत जोडो यात्रा नायगाव येथे पोहचल्यानंतर रमेश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोदी यांनी कोणताही विचार न करता नोटबंदी केली. त्यामुळे उद्योग, शेतकरी यासह सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत ही भारत जोडो यात्रा काढली आहे. निवडणुकीत या यात्रेचे काय परिणाम होतील याचा आम्ही विचार करीत नाही. तो येणारा काळ ठरवेल. परंतु एवढे मात्र नक्की या यात्रेमुळे भाजप मात्र घाबरली आहे, त्यामुळेच दररोज टी शर्ट घातले, काय जेवण केले यावरून टीका करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण पहिल्यांदाच काँग्रेस एवढ्या आक्रमक पणे राजकीय एजंडा घेऊन रस्त्यावर उतरली आहे. 

राहुल यांच्या ६५ दिवसांत ५ प्रेसया देशात 12 वर्ष राज्याचा आणि आठ वर्षे देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने अद्याप एकही प्रेस घेतली नाही, तर राहुल गांधी यांच्या गेल्या 65 दिवसात 5 प्रेस झाल्या आहेत. पुढची पत्रकार परिषद 17 तारखेला शेगाव येथे होणार आहे. असेही रमेश म्हणाले.

कॉंग्रेसला मिळाली संजीवनी राज्यात होत असलेल्या निवडणुका किंवा 2024 ची लोकसभा समोर ठेऊन आम्ही ही भारत जोडो यात्रा काढली नाही. त्यामुळे ही चुनाव जितो यात्रा नाही. परंतु या यात्रेमुळे काँग्रेस ला मात्र संजीवनी मिळाली असून ती पुनरुज्जीवत झाली आहे.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेड