शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शीतलादेवी नवरात्र महोत्सवात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:25 IST

येथे जागृत देवस्थान (पौच्चम्मा देवी)-शीतलादेवी म्हणून संबोधले जाणाऱ्या देवीच्या नवरात्र महोत्सावास १० आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून संस्थांनच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येथे जागृत देवस्थान (पौच्चम्मा देवी)-शीतलादेवी म्हणून संबोधले जाणाऱ्या देवीच्या नवरात्र महोत्सावास १० आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून संस्थांनच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत़शीतलादेवी मातेचा मोठ्या संख्येने भक्तवर्ग असून आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतून भक्तमंडळी येत असल्याने मंदिरात अलोट गर्दी होत आहे. नवरात्र निमित्ताने मंदिर परिसरात देवैज्ञ सोनार समाज संघटनेच्या वतीने परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला़ संस्थांनच्या वतीने मंदिरात साफस्वच्छता करण्यात आली असून रंगरंगोटी व रोषणाईने झगमग करण्यात आली आहे.शीतलामाता देवी मंदिराचा इतिहास हा पुरातन असून देवीचे उगमस्थान मंदिराच्या शेजारील जुनी बारव विहिरीतून झाल्याची आख्यायिका आहे. मंदिर परिसरात अंदाजे पाचशे वर्षे जुना असलेले वटवृक्षाच्या पारंब्याखाली देवीचे वास्तव्य आहे. देवीस पोचम्मा या नावानेही संबोधले जाते. नऊ दिवस चालणाºया नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रम येथे भक्तिमय वातावरणात चालतात.नवरात्रात पहिल्या दीवशी देवीची घटस्थापना केली जाते. देवी पूजा कुंकवाचे मळवट भरुन अंलकार परिधान करण्यात येतात. देवीस हळद-कुंकू, नारळ, हिरवा शालू वस्त्रात ओटी भरण्यात येते़ येथे नित्यनेमाने सकाळी गजर आरती, दुपारी मध्यान आरती व मातेस पोळीचा नैवेद्य दाखवला जातो़ सायंकाळी शेजारती, तीनवेळा नगारा वाद्यांच्या गजरात आरती नित्यनेमाने करण्यात येते. यावेळी देवीचा सभामंडप केळीखांब ऊस, आंब्याच्या पानांनी हिरवागार सजावट केली जाते़ पूर्ण मंदिरात फुलांची सजावट केली जाते.विशेष म्हणजे, या ठिकाणी देवीदर्शनासाठी सर्वधर्मीय भक्त येतात़ नवसाला कौल देणारी देवी आहे, असे भक्त सांगतात़ नवस फेडण्यासाठी भक्त येतात़ नवरात्रात नऊ दिवस, पाच दिवस येथे देवीजवळ धरणे धरुन नवसाची परतफेड मोठ्या श्रद्धेने करताना दिसतात. अष्टमीच्या दिवशी येथे महाप्रसाद, तांबोळ प्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती विश्वस्त विजय कुलकर्णी यांनी दिली आहे.तीर्थक्षेत्रासाठी गावकºयांकडून पाठपुरावा केला होता़ त्यानंतर माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून बारडला तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला़ त्यातून या ठिकाणच्या मंदिर परिसराचा कायापालट झाला असून रस्त्यांसह अनेक कामे मार्गी लागली़ याठिकाणी बाहेरराज्यांतून भक्ताची संख्या मोठ्या प्रमाणात असते़ तसेच दिवसेंदिवस भक्ताची श्रद्धा वाढल्याने देवी दर्शनासाठी गर्दी वाढतच आहे. त्यासाठी भक्तनिवासाची सोय होणे गरजेचे आहे.

टॅग्स :NandedनांदेडNavratriनवरात्री