शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:26 IST

बरडशेवाळा येथील कॅनाल फुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती़ यामागच्या कारणांची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़ टेलपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ४़६ क्यूसेस पाण्याचा प्रवाह असावा लागतो़ मात्र बरडशेवाळा शाखा संपताच ९़० क्यूसेस पाण्याचा प्रवाह करून सोडल्यानेच कॅनॉल फुटल्याची चर्चा शेतक-यांत सुरू आहे़

ठळक मुद्देसात हजार क्युसेस पाणी गेले वाहून : जबाबदारी घेणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा येथील कॅनाल फुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती़ यामागच्या कारणांची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़ टेलपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ४़६ क्यूसेस पाण्याचा प्रवाह असावा लागतो़ मात्र बरडशेवाळा शाखा संपताच ९़० क्यूसेस पाण्याचा प्रवाह करून सोडल्यानेच कॅनॉल फुटल्याची चर्चा शेतक-यांत सुरू आहे़कयाधू शाखा कॅनाल दाती सी़आऱ २ व पैनगंगा नदी या परिसरात असल्याने जमीन सुपीक व काळीची आहे़ यात जमिनीतून कालवा खोदण्यात आला़ ९० कि़मी़ लांबीचे काम झाले़ या दरम्यान उंदीर, घूस, बैलगाड्यांमुळे कॅनॉलचे नुकसान झाले़ दोन्ही बाजूच्या सिमेंटचे अस्तरही अनेक ठिकाणी गायब झाले़ शाखा कालव्याचा संकल्पित विसर्ग १२़२२ क्यूसेस असताना केवळ ९ क्यूसेस पाणी विसर्ग सोडता येतो़ सा. क्र ० ते ३८७२० मीटरपर्यंत ३ क्यूमेस पाणी नाश एच़पी़सी़ जलसेतू व नादुरुस्त अस्तरीकरणातील गळतीमध्ये होतो़ सा. क्र ३८७२० ते ६०२५० मीटरपर्यंतच्या भागात १़५ क्यूमेस पाणी नाश होतो़ त्यामुळे सा. क्र ६०२५० ते ९० हजार मीटरपर्यंतच्या भागात सिंचन चालू असताना कयाधू शाखा कालव्याचा मायनर क्रमांक १ ते ८६ पूर्णत: बंद ठेवावा लागतो़ त्यामुळे पुढील शेतक-यांना पाणीपाळी वेळेत मिळत नाही.कालवा दुरुस्ती झाली होती शनिवारीच !४पाणी कालव्यातून सोडताना शेवटपर्यंत (टेल) पोहोचण्यासाठी पाण्याचा प्रवाह ४ क्युसेस व ६ क्युमेसच असावा लागतो़ मात्र ३७ कि़मी़ अंतरानंतर पाण्याचा प्रवाह ९ क्युसेस केला जातो़ त्यामुळे कालवा फुटण्याचा धोका असतो़ कारण काळीची जमीन जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत ती पाणी शोषण्यासाठी तयारच होत नाही़ याशिवाय उंदीर, घुशींनी केलेली बिळं बुजवावी लागतात़ मात्र हे कोणी करत नाहीत़ ८ जानेवारी २०१७ रोजी कालवा फुटल्यानंतर या घटनेची माहिती शेतकºयांनी सायंकाळी अधिका-यांना फोनवरून दिली़ दुस-या दिवशी पाणी बंद करण्यात आले़ या दरम्यान ७ हजार क्युसेस पाणी वाया गेले़ विशेष म्हणजे, कालवा जिथे फुटला त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारीच झाले.वाळू, गिट्टीचाच वापर सिमेंटचा अभाव४रविवारी पाणी सुटले़ मात्र कामात वाळू व गिट्टीचाच वापर करण्यात आला़ सिमेंट वापरलेच नाही, अशी माहिती मजुरांनी दिली़ जिथे भगदाड पडले ते बंद करण्याऐवजी मजुरांनी दुसरीच छिद्रे बुजविल्याने कामाचा धोका वाढला़ १६ डिसेंबर रोजी या शाखेच्या अधिकाºयांनी वरिष्ठांना एक पत्र लिहिले होते़ त्यात कॅनॉलचे काम करावे लागते़ अन्यथा तो फुटू शकतो़ तो फुटल्यास आमची जबाबदारी राहणार नाही, असे त्यांनी त्यात नमूद केले होते़ त्यानंतर १ जानेवारीला काम सुरू करून ३ रोजी संपते़ ४ रोजी पाणी सोडले जाते आणि नंतरचा प्रकार घडतो़ याला काय म्हणावे़ मागील पाच महिन्यात संबंधितांनी काय केले? आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कामाची मागणी का केली नाही, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे़दुरुस्तीवर लाखोंचा खर्च,तरीही कालवा फुटला४ २०१६-१७ मध्ये कालवा दुरुस्ती कामावर अनुक्रमे १५ लाख, ८ लाख, ६ लाख, ५ लाख, ८ लाख रुपये रुपये खर्च दर्शविण्यात आला़ या कामाचा दर्जा कोणी तपासला? काम होवूनही कालवा फुटला कसा? की मुद्दाम फोडला? असा सवालही केला जात आहे़ यापूर्वी हा कालवा दोनदा फुटला होता़ या कालव्याच्या चिरेबंदी भिंतीलाच छिद्र करून पाण्याचा विसर्ग नाल्यातून रुई बंधारा भरण्यासाठी केला जातो़ एकूणच संबंधित शेतकरी व अधिकाºयांची यामागे मिलीभगत आहे़ काम बघण्यासाठी कोणीही राहत नाही़ कारण कालव्याच्या सुरुवातीपासूनच गळती होत असेल तर समोर पाणी जाणारच कसे,असा सवाल आहे़