शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:26 IST

बरडशेवाळा येथील कॅनाल फुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती़ यामागच्या कारणांची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़ टेलपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ४़६ क्यूसेस पाण्याचा प्रवाह असावा लागतो़ मात्र बरडशेवाळा शाखा संपताच ९़० क्यूसेस पाण्याचा प्रवाह करून सोडल्यानेच कॅनॉल फुटल्याची चर्चा शेतक-यांत सुरू आहे़

ठळक मुद्देसात हजार क्युसेस पाणी गेले वाहून : जबाबदारी घेणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा येथील कॅनाल फुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती़ यामागच्या कारणांची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़ टेलपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ४़६ क्यूसेस पाण्याचा प्रवाह असावा लागतो़ मात्र बरडशेवाळा शाखा संपताच ९़० क्यूसेस पाण्याचा प्रवाह करून सोडल्यानेच कॅनॉल फुटल्याची चर्चा शेतक-यांत सुरू आहे़कयाधू शाखा कॅनाल दाती सी़आऱ २ व पैनगंगा नदी या परिसरात असल्याने जमीन सुपीक व काळीची आहे़ यात जमिनीतून कालवा खोदण्यात आला़ ९० कि़मी़ लांबीचे काम झाले़ या दरम्यान उंदीर, घूस, बैलगाड्यांमुळे कॅनॉलचे नुकसान झाले़ दोन्ही बाजूच्या सिमेंटचे अस्तरही अनेक ठिकाणी गायब झाले़ शाखा कालव्याचा संकल्पित विसर्ग १२़२२ क्यूसेस असताना केवळ ९ क्यूसेस पाणी विसर्ग सोडता येतो़ सा. क्र ० ते ३८७२० मीटरपर्यंत ३ क्यूमेस पाणी नाश एच़पी़सी़ जलसेतू व नादुरुस्त अस्तरीकरणातील गळतीमध्ये होतो़ सा. क्र ३८७२० ते ६०२५० मीटरपर्यंतच्या भागात १़५ क्यूमेस पाणी नाश होतो़ त्यामुळे सा. क्र ६०२५० ते ९० हजार मीटरपर्यंतच्या भागात सिंचन चालू असताना कयाधू शाखा कालव्याचा मायनर क्रमांक १ ते ८६ पूर्णत: बंद ठेवावा लागतो़ त्यामुळे पुढील शेतक-यांना पाणीपाळी वेळेत मिळत नाही.कालवा दुरुस्ती झाली होती शनिवारीच !४पाणी कालव्यातून सोडताना शेवटपर्यंत (टेल) पोहोचण्यासाठी पाण्याचा प्रवाह ४ क्युसेस व ६ क्युमेसच असावा लागतो़ मात्र ३७ कि़मी़ अंतरानंतर पाण्याचा प्रवाह ९ क्युसेस केला जातो़ त्यामुळे कालवा फुटण्याचा धोका असतो़ कारण काळीची जमीन जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत ती पाणी शोषण्यासाठी तयारच होत नाही़ याशिवाय उंदीर, घुशींनी केलेली बिळं बुजवावी लागतात़ मात्र हे कोणी करत नाहीत़ ८ जानेवारी २०१७ रोजी कालवा फुटल्यानंतर या घटनेची माहिती शेतकºयांनी सायंकाळी अधिका-यांना फोनवरून दिली़ दुस-या दिवशी पाणी बंद करण्यात आले़ या दरम्यान ७ हजार क्युसेस पाणी वाया गेले़ विशेष म्हणजे, कालवा जिथे फुटला त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारीच झाले.वाळू, गिट्टीचाच वापर सिमेंटचा अभाव४रविवारी पाणी सुटले़ मात्र कामात वाळू व गिट्टीचाच वापर करण्यात आला़ सिमेंट वापरलेच नाही, अशी माहिती मजुरांनी दिली़ जिथे भगदाड पडले ते बंद करण्याऐवजी मजुरांनी दुसरीच छिद्रे बुजविल्याने कामाचा धोका वाढला़ १६ डिसेंबर रोजी या शाखेच्या अधिकाºयांनी वरिष्ठांना एक पत्र लिहिले होते़ त्यात कॅनॉलचे काम करावे लागते़ अन्यथा तो फुटू शकतो़ तो फुटल्यास आमची जबाबदारी राहणार नाही, असे त्यांनी त्यात नमूद केले होते़ त्यानंतर १ जानेवारीला काम सुरू करून ३ रोजी संपते़ ४ रोजी पाणी सोडले जाते आणि नंतरचा प्रकार घडतो़ याला काय म्हणावे़ मागील पाच महिन्यात संबंधितांनी काय केले? आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कामाची मागणी का केली नाही, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे़दुरुस्तीवर लाखोंचा खर्च,तरीही कालवा फुटला४ २०१६-१७ मध्ये कालवा दुरुस्ती कामावर अनुक्रमे १५ लाख, ८ लाख, ६ लाख, ५ लाख, ८ लाख रुपये रुपये खर्च दर्शविण्यात आला़ या कामाचा दर्जा कोणी तपासला? काम होवूनही कालवा फुटला कसा? की मुद्दाम फोडला? असा सवालही केला जात आहे़ यापूर्वी हा कालवा दोनदा फुटला होता़ या कालव्याच्या चिरेबंदी भिंतीलाच छिद्र करून पाण्याचा विसर्ग नाल्यातून रुई बंधारा भरण्यासाठी केला जातो़ एकूणच संबंधित शेतकरी व अधिकाºयांची यामागे मिलीभगत आहे़ काम बघण्यासाठी कोणीही राहत नाही़ कारण कालव्याच्या सुरुवातीपासूनच गळती होत असेल तर समोर पाणी जाणारच कसे,असा सवाल आहे़