शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:26 IST

बरडशेवाळा येथील कॅनाल फुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती़ यामागच्या कारणांची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़ टेलपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ४़६ क्यूसेस पाण्याचा प्रवाह असावा लागतो़ मात्र बरडशेवाळा शाखा संपताच ९़० क्यूसेस पाण्याचा प्रवाह करून सोडल्यानेच कॅनॉल फुटल्याची चर्चा शेतक-यांत सुरू आहे़

ठळक मुद्देसात हजार क्युसेस पाणी गेले वाहून : जबाबदारी घेणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा येथील कॅनाल फुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती़ यामागच्या कारणांची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़ टेलपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ४़६ क्यूसेस पाण्याचा प्रवाह असावा लागतो़ मात्र बरडशेवाळा शाखा संपताच ९़० क्यूसेस पाण्याचा प्रवाह करून सोडल्यानेच कॅनॉल फुटल्याची चर्चा शेतक-यांत सुरू आहे़कयाधू शाखा कॅनाल दाती सी़आऱ २ व पैनगंगा नदी या परिसरात असल्याने जमीन सुपीक व काळीची आहे़ यात जमिनीतून कालवा खोदण्यात आला़ ९० कि़मी़ लांबीचे काम झाले़ या दरम्यान उंदीर, घूस, बैलगाड्यांमुळे कॅनॉलचे नुकसान झाले़ दोन्ही बाजूच्या सिमेंटचे अस्तरही अनेक ठिकाणी गायब झाले़ शाखा कालव्याचा संकल्पित विसर्ग १२़२२ क्यूसेस असताना केवळ ९ क्यूसेस पाणी विसर्ग सोडता येतो़ सा. क्र ० ते ३८७२० मीटरपर्यंत ३ क्यूमेस पाणी नाश एच़पी़सी़ जलसेतू व नादुरुस्त अस्तरीकरणातील गळतीमध्ये होतो़ सा. क्र ३८७२० ते ६०२५० मीटरपर्यंतच्या भागात १़५ क्यूमेस पाणी नाश होतो़ त्यामुळे सा. क्र ६०२५० ते ९० हजार मीटरपर्यंतच्या भागात सिंचन चालू असताना कयाधू शाखा कालव्याचा मायनर क्रमांक १ ते ८६ पूर्णत: बंद ठेवावा लागतो़ त्यामुळे पुढील शेतक-यांना पाणीपाळी वेळेत मिळत नाही.कालवा दुरुस्ती झाली होती शनिवारीच !४पाणी कालव्यातून सोडताना शेवटपर्यंत (टेल) पोहोचण्यासाठी पाण्याचा प्रवाह ४ क्युसेस व ६ क्युमेसच असावा लागतो़ मात्र ३७ कि़मी़ अंतरानंतर पाण्याचा प्रवाह ९ क्युसेस केला जातो़ त्यामुळे कालवा फुटण्याचा धोका असतो़ कारण काळीची जमीन जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत ती पाणी शोषण्यासाठी तयारच होत नाही़ याशिवाय उंदीर, घुशींनी केलेली बिळं बुजवावी लागतात़ मात्र हे कोणी करत नाहीत़ ८ जानेवारी २०१७ रोजी कालवा फुटल्यानंतर या घटनेची माहिती शेतकºयांनी सायंकाळी अधिका-यांना फोनवरून दिली़ दुस-या दिवशी पाणी बंद करण्यात आले़ या दरम्यान ७ हजार क्युसेस पाणी वाया गेले़ विशेष म्हणजे, कालवा जिथे फुटला त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारीच झाले.वाळू, गिट्टीचाच वापर सिमेंटचा अभाव४रविवारी पाणी सुटले़ मात्र कामात वाळू व गिट्टीचाच वापर करण्यात आला़ सिमेंट वापरलेच नाही, अशी माहिती मजुरांनी दिली़ जिथे भगदाड पडले ते बंद करण्याऐवजी मजुरांनी दुसरीच छिद्रे बुजविल्याने कामाचा धोका वाढला़ १६ डिसेंबर रोजी या शाखेच्या अधिकाºयांनी वरिष्ठांना एक पत्र लिहिले होते़ त्यात कॅनॉलचे काम करावे लागते़ अन्यथा तो फुटू शकतो़ तो फुटल्यास आमची जबाबदारी राहणार नाही, असे त्यांनी त्यात नमूद केले होते़ त्यानंतर १ जानेवारीला काम सुरू करून ३ रोजी संपते़ ४ रोजी पाणी सोडले जाते आणि नंतरचा प्रकार घडतो़ याला काय म्हणावे़ मागील पाच महिन्यात संबंधितांनी काय केले? आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कामाची मागणी का केली नाही, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे़दुरुस्तीवर लाखोंचा खर्च,तरीही कालवा फुटला४ २०१६-१७ मध्ये कालवा दुरुस्ती कामावर अनुक्रमे १५ लाख, ८ लाख, ६ लाख, ५ लाख, ८ लाख रुपये रुपये खर्च दर्शविण्यात आला़ या कामाचा दर्जा कोणी तपासला? काम होवूनही कालवा फुटला कसा? की मुद्दाम फोडला? असा सवालही केला जात आहे़ यापूर्वी हा कालवा दोनदा फुटला होता़ या कालव्याच्या चिरेबंदी भिंतीलाच छिद्र करून पाण्याचा विसर्ग नाल्यातून रुई बंधारा भरण्यासाठी केला जातो़ एकूणच संबंधित शेतकरी व अधिकाºयांची यामागे मिलीभगत आहे़ काम बघण्यासाठी कोणीही राहत नाही़ कारण कालव्याच्या सुरुवातीपासूनच गळती होत असेल तर समोर पाणी जाणारच कसे,असा सवाल आहे़