शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नांदेडमधील आयुर्वेद रुग्णालयात एक रुपयात शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:08 IST

वजिराबाद भागातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना एक रुपयात शुद्ध पाणी मिळणार आहे़ त्यासाठी पाचशे एलपीएच क्षमतेचे सयंत्र या ठिकाणी बसविण्यात आले आहे़ तर डॉक्टर व इतर कर्मचा-यांना पाण्यासाठी एटीएम कार्ड देण्यात आले आहे़

ठळक मुद्देडॉक्टरांसाठी पाण्याचे कार्ड

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वजिराबाद भागातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना एक रुपयात शुद्ध पाणी मिळणार आहे़ त्यासाठी पाचशे एलपीएच क्षमतेचे सयंत्र या ठिकाणी बसविण्यात आले आहे़ तर डॉक्टर व इतर कर्मचा-यांना पाण्यासाठी एटीएम कार्ड देण्यात आले आहे़शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण येतात़ त्यांच्यासाठी या ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे रुग्णालयाबाहेर असलेल्या हॉटेलवरुन रुग्णांच्या नातेवाईकांना विकत पाणी आणावे लागते़ ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना दररोज पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडणारे नसते़ त्यामुळे गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यात आले आहे़ या जलशुद्धीकरण सयंत्राद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना केवळ एक रुपयात १ लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे़ तर २ रुपयांत एक लिटर थंड पाणी मिळेल़पाण्यासाठी या ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आली आहे़ या मशीनमध्ये एक रुपयाचा क्वॉईन टाकल्यानंतर लगेच एक लिटर शुद्ध पाणी मिळेल़ तर महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचा-यांना पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे़ तर १० रुपयात थंड पाणी मिळेल़ यासाठी विद्यार्थी व कर्मचा-यांना एटीएम कार्ड देण्यात येणार आहे़ दर महिन्याला दीडशे रुपयांचे रिजार्च केल्यानंतर सदरील कार्डाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध केले जाणार आहे़ ही सेवा २४ तास सुरु राहणार आहे़सोमवारी अधिष्ठाता डॉ़ बी़ एच़ श्यामकुंवर यांच्या हस्ते संयत्रांचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी डॉ़अन्नापुरे, डॉ़संत, डॉ़ उकळकर, चंचलवार, तबलेवाले, डॉ़ अमिलकंठवार, विठ्ठल पंजोल, प्रशांत दळवी, ए़ डी़ डोणगावे, सुमंगला इंटरप्रायजेसचे चैतन्य कोंडावार यांची उपस्थिती होती़रुग्णालयात जलशुद्धीकरण सयंत्र बसविल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आता शुद्ध पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार नाहीत़

विष्णूपुरी येथे साईप्रसादने घेतला पुढाकारविष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साईप्रसादच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून कॅनद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर आता साईप्रसादने या परिसरात दोन अमृतकुंड बांधले आहेत़ त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो़ अमृतकुंडाबरोबरच साईप्रसादने रुग्णालय परिसरात उद्यानही विकसित केले आहे़ त्यासाठी साईप्रसादचे दानशूर परिश्रम घेत आहेत़