शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

नांदेडमधील आयुर्वेद रुग्णालयात एक रुपयात शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:08 IST

वजिराबाद भागातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना एक रुपयात शुद्ध पाणी मिळणार आहे़ त्यासाठी पाचशे एलपीएच क्षमतेचे सयंत्र या ठिकाणी बसविण्यात आले आहे़ तर डॉक्टर व इतर कर्मचा-यांना पाण्यासाठी एटीएम कार्ड देण्यात आले आहे़

ठळक मुद्देडॉक्टरांसाठी पाण्याचे कार्ड

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वजिराबाद भागातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना एक रुपयात शुद्ध पाणी मिळणार आहे़ त्यासाठी पाचशे एलपीएच क्षमतेचे सयंत्र या ठिकाणी बसविण्यात आले आहे़ तर डॉक्टर व इतर कर्मचा-यांना पाण्यासाठी एटीएम कार्ड देण्यात आले आहे़शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण येतात़ त्यांच्यासाठी या ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे रुग्णालयाबाहेर असलेल्या हॉटेलवरुन रुग्णांच्या नातेवाईकांना विकत पाणी आणावे लागते़ ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना दररोज पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडणारे नसते़ त्यामुळे गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यात आले आहे़ या जलशुद्धीकरण सयंत्राद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना केवळ एक रुपयात १ लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे़ तर २ रुपयांत एक लिटर थंड पाणी मिळेल़पाण्यासाठी या ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आली आहे़ या मशीनमध्ये एक रुपयाचा क्वॉईन टाकल्यानंतर लगेच एक लिटर शुद्ध पाणी मिळेल़ तर महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचा-यांना पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे़ तर १० रुपयात थंड पाणी मिळेल़ यासाठी विद्यार्थी व कर्मचा-यांना एटीएम कार्ड देण्यात येणार आहे़ दर महिन्याला दीडशे रुपयांचे रिजार्च केल्यानंतर सदरील कार्डाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध केले जाणार आहे़ ही सेवा २४ तास सुरु राहणार आहे़सोमवारी अधिष्ठाता डॉ़ बी़ एच़ श्यामकुंवर यांच्या हस्ते संयत्रांचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी डॉ़अन्नापुरे, डॉ़संत, डॉ़ उकळकर, चंचलवार, तबलेवाले, डॉ़ अमिलकंठवार, विठ्ठल पंजोल, प्रशांत दळवी, ए़ डी़ डोणगावे, सुमंगला इंटरप्रायजेसचे चैतन्य कोंडावार यांची उपस्थिती होती़रुग्णालयात जलशुद्धीकरण सयंत्र बसविल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आता शुद्ध पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार नाहीत़

विष्णूपुरी येथे साईप्रसादने घेतला पुढाकारविष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साईप्रसादच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून कॅनद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर आता साईप्रसादने या परिसरात दोन अमृतकुंड बांधले आहेत़ त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो़ अमृतकुंडाबरोबरच साईप्रसादने रुग्णालय परिसरात उद्यानही विकसित केले आहे़ त्यासाठी साईप्रसादचे दानशूर परिश्रम घेत आहेत़