शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

साडेआठ कोटींचे पर्यटनयात्री संकुल अडकले बाभूळबनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:48 IST

भाविकांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारच्या निधीतून साडेआठ कोटी रुपये खर्च करून माहूर तीर्थक्षेत्रावर उभारलेले पर्यटनयात्री संकुल पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उद्घाटनाअभावी ही देखणी इमारत बाभूळबनात अडकली असून, इमारतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे.

ठळक मुद्देउद्घाटनाची प्रतीक्षा यात्राकाळात खासगी लॉजिंगकडून भाविकांची आर्थिक लूट

नितेश बनसोडे।श्रीक्षेत्र माहूर : भाविकांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारच्या निधीतून साडेआठ कोटी रुपये खर्च करून माहूर तीर्थक्षेत्रावर उभारलेले पर्यटनयात्री संकुल पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उद्घाटनाअभावी ही देखणी इमारत बाभूळबनात अडकली असून, इमारतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे. दुसरीकडे, मोकाट गुराढोरांचा येथे वावर वाढला असून अवैध व्यावसायिकसुद्धा या केंद्रावरून ‘रात्रीस खेळ चाले’ चा प्रयोग अवलंबत असल्याची चर्चा आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी शिखर संस्थानची साडेआठ एकर जमीन हस्तगत करून केंद्र सरकारच्या निधीतून पर्यटन संकुलाची भव्य वास्तू उभारली गेली. मातृतीर्थ परिसराकडे जाणाऱ्या निसर्गरम्य जागेत सदरील पर्यटक निवास बांधले आहे. या ठिकाणी अद्ययावत मिनी बसस्थानक, भव्य वाहनतळ, सुसज्ज उपाहारगृह, भव्य दरबार हॉल व यात्रीनिवास बांधण्यात आले आहे. मात्र लोकार्पणाअभावी हा कोट्यवधीचा निधी वाया जात असल्याचे दिसून येते.शहरातील काही मंदिर विश्वस्तांच्या स्वत:च्या मालकीचे खासगी लॉज तसेच यात्रीनिवास आहेत. यात्राकाळात माहूरला भाविकांची मोठी गर्दी होते़ यावेळी निवासासाठी थांबणाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतानाही सरकारी निधीतून उभारलेले हे निवास सुरु करण्यात प्रशासन का टाळाटाळ त आहे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. साडेआठ कोटींच्या पर्यटनयात्री संकुलाचे पालकत्व स्वीकारून भाविकांना सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे़पाचोंद्याचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समोवश व्हावामौजे पाचोंदा हे पुरातन तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्राचा रामायणातसुद्धा उल्लेख आहे. मात्र त्यानंतरही प्रचार-प्रसाराअभावी हे तीर्थक्षेत्र विकासापासून कोसोदूर आहे. माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणात या तीर्थक्षेत्राचा समावेश करून विकास केल्यास निसर्गरम्य वनराईने नटलेला हा परिसर तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा नावारूपास येऊ शकतो. येथील तीर्थक्षेत्र हे उनकेश्वर ता.किनवट येथील शाखेची उपशाखा असून प्रभू श्री रामचंद्र माहूर येथील अनसूया मातेच्या दर्शनाला आले असता ते पाचोंदा या तीर्थक्षेत्रावरसुद्धा आल्याचा इतिहासात उल्लेख आहे. या क्षेत्राचे नाव पांचाळेश्वर असे होते. तेव्हापासून या तीर्थक्षेत्रावर प्रभू श्री रामाचे मंदिर आहे. ज्यांना हा इतिहास माहीत आहे. ते माहूरगडावर आल्यानंतर पाचोंदा येथे येतात. माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणअंतर्गत विकास आराखड्यत समावेश असलेले वझरा (शे.फ.) या गावापासून हे क्षेत्र केवळ ४ कि.मी अंतरावर आहे़ हे तीर्थक्षेत्र निसर्गरम्य वनराईने नटलेले असून या तलावाचा विकास झाल्यास इको टुरिझम येथे यशस्वी होऊ शकते.त्यासाठी प्रशासनाने या पुरातन तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

शासनाने द्यावे लक्षपाचोंदा हे क्षेत्र अतिदुर्गम जंगल भागात असल्याने वनविभागामार्फत विकास करता येईल यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांना भेटून विकास योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - अ‍ॅड़ रमण जायभायेपाचोंदा तीर्थक्षेत्र उनकेश्वर ता.किनवटची उपशाखा असून उनकेश्वरला येणारे भाविक पाचोंदा येथे हमखास येतात़ या तीर्थ्२ाक्षेत्राचा विकास करुन या तीर्थक्षेत्राला जुने वैभव मिळवून देण्याची गरज आहे़ यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा़- गौतम महामुने, उपसरपंच, पाचोंदा

टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळेGovernmentसरकार