शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:32 IST

कृष्णूर येथील मेगा इंडीया अ‍ॅग्रो अनाज कंपनी धान्य घोटाळा प्रकरणात नायगाव न्यायालयात ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल केले नाही म्हणून अजय बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा यांनी मागितलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

ठळक मुद्देधान्य घोटाळा : नायगांव न्यायालयाचा निर्णय

नायगांव : कृष्णूर येथील मेगा इंडीया अ‍ॅग्रो अनाज कंपनी धान्य घोटाळा प्रकरणात नायगाव न्यायालयात ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल केले नाही म्हणून अजय बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा यांनी मागितलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला.न्या़सय्यद वहाब यांनी या प्रकरणात ९० दिवसांपर्यंत दोषारोपपत्र दाखल करता येते अशी नोंद केली आहे़ या प्रकरणात या चौघांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असून त्यावर १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात दहा ट्रक चालकांना पकडण्यात आले होते़ त्यानंतर हा तपास पोलिसांकडून सीआयडीकडे देण्यात आला़ मध्यंतरी न्यायालयाने सीआयडीच्या तपासावर सुनविले होते़ त्यानंतर लगेच या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे़ त्यात इंडिया मेगा अ?ॅग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडीया, सरकारी धान्याचे वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा या चौघांना १० मे २०१९ रोजी अटक केली होती. सध्या हे चारही जण आणि सोबत महसूल विभागाचे चार कर्मचारी हर्सूल कारागृहात आहेत.दोन दिवसापूर्वी नायगाव न्यायालयात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल केले नाही म्हणून जामीन मिळावा असा अर्ज करण्यात आला. या दरम्यान उच्च न्यायालयात सुध्दा या चौघांच्या वतीने नियमित जामीन मिळावा असा अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी ९ जुलै रोजी होती आता ती १८ जुलै २०१९ रोजी होणार आहे.सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड.भोसले यांनी १३ वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे सादर करुन या प्रकरणातील दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा अवधी आहे, हा मुद्दा मांडला होता़ त्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळला़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCourtन्यायालय