शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी २८२ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:51 IST

नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्दे शासनाने नुकसानीपोटी ६ हजार रुपये प्रतिहेक्टर ऐवजी १० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतला.जिल्ह्याची एकूण मागणी आता ५६५कोटी १३ लाख ३६हजार ३५० रुपये इतकी झाली आहे.

नांदेड : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण नुकसान पाहता २८२ कोटी ५६ लाख ६९ हजार ३५० रुपयांची गरज आहे. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूरपरिस्थिती यामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत दिली जाईल असे शासनाने घोषित केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात जिरायत पिकांचे ५ लाख ६३ हजार ४०९ हेक्टर क्षेत्रातील, बागायत ७०० हेक्टर आणि फळ पिकांचे ४०९.४५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते. सर्वाधिक फटका हा हदगाव तालुक्याला बसला होता. हदगाव तालुक्यात ६५ हजार ६२१ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली होती. त्या खालोखाल लोहा तालुक्यात ५२ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रात, किनवट तालुक्यात ४८हजार ४७२, देगलूर तालुक्यात ४४ हजार ८२९, मुखेड तालुक्यात ४८ हजार ७९५ हेक्टर तसेच इतर तालुक्यात एकूण ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते. 

या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहे. यामध्ये नांदेड तालुक्याला १० कोटी ३३ लाख ४४ हजार रुपये, अर्धापूर ८ कोटी ५१ लाख ४ हजार रुपये, कंधार २० कोटी ७६ लाख ७९ हजार रुपये, लोहा २६ कोटी ३६ लाख १७ हजार रुपये, बिलोली १६ कोटी २० लाख ८९ हजार रुपये, नायगाव १९ कोटी १९लाख ६४ हजार रुपये, देगलूर २२ कोटी ४१ लाख ४४हजार रुपये, मुखेड २४ कोटी ४० लाख ६४ हजार रुपये, भोकर १९ कोटी ५७ लाख ६७ हजार रुपये, मुदखेड ७ कोटी २९ लाख ८४ हजार रुपये, धर्माबाद १० कोटी २३ लाख ५९ हजार रुपये, उमरी १४ कोटी ३७ लाख ६७ हजार रुपये, हदगाव ३२ कोटी ८१ लाख ४ हजार रुपये, हिमायतनगर १५ कोटी ९९लाख२९हजार रुपये, किनवट २४ कोटी २३ लाख ६३ हजार रुपये आणि माहूर तालुक्याला ९ कोटी ८३ लाख ७७ हजार रुपये मदतीपोटी पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आता बँकेकडे लागल्या आहेत. पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे.

१८० कोटींची मागणी वाढलीजिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मदतीसाठी प्रचलित शासन निर्णयानुसार शासनाकडे ३८४ कोटी ८० लाख १२ हजार रुपयांची मागणी केली होती. शासनाने नुकसानीपोटी ६ हजार रुपये प्रतिहेक्टर ऐवजी १० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतला. बागायत व फळपिकांसाठीही मदत वाढवून देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याची मागणी आता १८०कोटींनी वाढली आहे. पहिल्या टप्प्यात ५०टक्के रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. जिल्ह्याची एकूण मागणी आता ५६५कोटी १३ लाख ३६हजार ३५० रुपये इतकी झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडagricultureशेती