शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

पुरी समितीचा अहवाल थंडबस्त्यात;खासगी कृषी महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी आणखी एक समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 12:17 IST

राज्यात अकाेला, राहुरी (जि. अहमदनगर), परभणी व दापाेली (जि. रत्नागिरी) अशी चार कृषी विद्यापीठे आहेत.

नांदेड : राज्यातील खासगी कृषी महाविद्यालयांची स्थिती सांगणारा अहवाल कारवाईसाठी शासन दरबारी सादर असताना त्याची दाेन वर्षांपासून अंमलबजावणी न करता शासनाने दि. ३ फेब्रुवारी राेजी या महाविद्यालयांच्या पुनर्तपासणीसाठी आणखी एक समिती गठीत केली आहे. त्यामुळे ‘ड’ श्रेणीतील ५२ महाविद्यालयांवर शासनाला खराेखरच कारवाई करायची आहे की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

राज्यात अकाेला, राहुरी (जि. अहमदनगर), परभणी व दापाेली (जि. रत्नागिरी) अशी चार कृषी विद्यापीठे आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत प्रत्येक पाच वर्षांनी या विद्यापीठांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले जाते. २०१३-१४ ला या परिषदेने मूल्यांकन करून रिक्त पदे, केंद्राचा माॅडेल ॲक्ट राज्याने न स्वीकारणे आणि कृषी महाविद्यालयांची कामे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी करणे हे तीन आक्षेप नाेंदविले हाेते. मात्र, पाच वर्षांत त्यात काेणताही बदल झाला नाही. त्यामुळे २०१९ ला अनुसंधान परिषदेने हे मूल्यांकनच नाकारले. दरम्यान, चार कृषी विद्यापीठांतर्गत चालविल्या जाणाऱ्या १५२ खासगी कृषी महाविद्यालयांच्या तपासणीसाठी राज्य शासनाने राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने आपला धक्कादायक अहवाल २०१९ मध्ये शासनाला सादर केला. त्यानुसार काेणत्याही महाविद्यालयावर अद्याप कारवाई झालेली नाही. असे असताना १६ नाेव्हेंबर २०२१ राेजी राज्यपालांच्या बैठकीनंतर दि. ३ फेब्रुवारी राेजी शासनाने ‘ड’ श्रेणीतील महाविद्यालयांच्या तपासणीसाठी आणखी एक समिती गठीत केली.

डेप्युटी सीइओ, एसएओ समितीतप्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. संबंधित कृषी विद्यापीठाचे कुलगुरूंनी नेमलेले सहयाेगी अधिष्ठाता समितीचे सदस्य सचिव तथा समन्वयक आहेत. या समितीत अप्पर जिल्हाधिकारी किंवा डेप्युटी सीईओ, एसएओ व इतर कृषी विद्यापीठाचे एक सहयाेगी अधिष्ठाता हे सदस्य आहेत.

कारवाई की टाईमपास?पुन्हा पुन्हा समिती स्थापन करण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. ‘ड’ श्रेणीतील त्या महाविद्यालयांवर कारवाई करायची आहे की त्यांना वाचवायचे आहे, हे काेडेच असल्याचे कृषी विद्यापीठातील यंत्रणेतून बाेलले जाते.

५२ महाविद्यालये ‘ड’ श्रेणीत१५२ पैकी ५० ते ५२ खासगी कृषी महाविद्यालये ‘ड’ श्रेणीमध्ये आढळून आली. या महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नाहीत, १०० एकर जमीन नाही, प्रयाेगशाळा नाही, गुणवत्ता नाही, असे आक्षेप पुरी समितीने नाेंदविले. एवढेच नव्हे तर, हे काॅलेज बंद करून त्याला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली. मात्र, गेल्या दाेन वर्षांपासून पुरी समितीचा हा अहवाल कार्यवाही व अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :agricultureशेतीNandedनांदेडcollegeमहाविद्यालय