शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पुरी समितीचा अहवाल थंडबस्त्यात;खासगी कृषी महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी आणखी एक समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 12:17 IST

राज्यात अकाेला, राहुरी (जि. अहमदनगर), परभणी व दापाेली (जि. रत्नागिरी) अशी चार कृषी विद्यापीठे आहेत.

नांदेड : राज्यातील खासगी कृषी महाविद्यालयांची स्थिती सांगणारा अहवाल कारवाईसाठी शासन दरबारी सादर असताना त्याची दाेन वर्षांपासून अंमलबजावणी न करता शासनाने दि. ३ फेब्रुवारी राेजी या महाविद्यालयांच्या पुनर्तपासणीसाठी आणखी एक समिती गठीत केली आहे. त्यामुळे ‘ड’ श्रेणीतील ५२ महाविद्यालयांवर शासनाला खराेखरच कारवाई करायची आहे की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

राज्यात अकाेला, राहुरी (जि. अहमदनगर), परभणी व दापाेली (जि. रत्नागिरी) अशी चार कृषी विद्यापीठे आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत प्रत्येक पाच वर्षांनी या विद्यापीठांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले जाते. २०१३-१४ ला या परिषदेने मूल्यांकन करून रिक्त पदे, केंद्राचा माॅडेल ॲक्ट राज्याने न स्वीकारणे आणि कृषी महाविद्यालयांची कामे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी करणे हे तीन आक्षेप नाेंदविले हाेते. मात्र, पाच वर्षांत त्यात काेणताही बदल झाला नाही. त्यामुळे २०१९ ला अनुसंधान परिषदेने हे मूल्यांकनच नाकारले. दरम्यान, चार कृषी विद्यापीठांतर्गत चालविल्या जाणाऱ्या १५२ खासगी कृषी महाविद्यालयांच्या तपासणीसाठी राज्य शासनाने राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने आपला धक्कादायक अहवाल २०१९ मध्ये शासनाला सादर केला. त्यानुसार काेणत्याही महाविद्यालयावर अद्याप कारवाई झालेली नाही. असे असताना १६ नाेव्हेंबर २०२१ राेजी राज्यपालांच्या बैठकीनंतर दि. ३ फेब्रुवारी राेजी शासनाने ‘ड’ श्रेणीतील महाविद्यालयांच्या तपासणीसाठी आणखी एक समिती गठीत केली.

डेप्युटी सीइओ, एसएओ समितीतप्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. संबंधित कृषी विद्यापीठाचे कुलगुरूंनी नेमलेले सहयाेगी अधिष्ठाता समितीचे सदस्य सचिव तथा समन्वयक आहेत. या समितीत अप्पर जिल्हाधिकारी किंवा डेप्युटी सीईओ, एसएओ व इतर कृषी विद्यापीठाचे एक सहयाेगी अधिष्ठाता हे सदस्य आहेत.

कारवाई की टाईमपास?पुन्हा पुन्हा समिती स्थापन करण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. ‘ड’ श्रेणीतील त्या महाविद्यालयांवर कारवाई करायची आहे की त्यांना वाचवायचे आहे, हे काेडेच असल्याचे कृषी विद्यापीठातील यंत्रणेतून बाेलले जाते.

५२ महाविद्यालये ‘ड’ श्रेणीत१५२ पैकी ५० ते ५२ खासगी कृषी महाविद्यालये ‘ड’ श्रेणीमध्ये आढळून आली. या महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नाहीत, १०० एकर जमीन नाही, प्रयाेगशाळा नाही, गुणवत्ता नाही, असे आक्षेप पुरी समितीने नाेंदविले. एवढेच नव्हे तर, हे काॅलेज बंद करून त्याला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली. मात्र, गेल्या दाेन वर्षांपासून पुरी समितीचा हा अहवाल कार्यवाही व अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :agricultureशेतीNandedनांदेडcollegeमहाविद्यालय