शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

नांदेड राष्ट्रवादीच्या बैठकीत दलबदलूंवर संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:45 IST

पक्ष सोडून जाणाऱ्यांनी आपल्या बॅगा भरल्या असतील

ठळक मुद्देयावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या तक्रारी केल्या़

नांदेड : ज्या पक्षाने आपल्याला सर्वकाही दिले आहे़ त्या पक्षाबद्दल प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकाऱ्याने निष्ठा बाळगायला हवी़ पक्षामधून कोणी जात असेल तर, त्यांचे खुशाल स्वागत आहे. परंतु, नव्या व जुन्या पक्षाच्या निष्ठावंतांनी दलबदलूंना महत्त्व देवू नका, असे आवाहन माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़ या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी दलबदलूंवर संताप व्यक्त केला़

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्ता व पदाधिकारी यांची बैठक शुक्रवारी भाग्यनगर येथे घेण्यात आली. यावेळी कदम बोलत होते. ते म्हणाले, जे कोणी पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत़ त्याबद्दल आपले काही म्हणणे नसून कदाचित त्यांनी बॅगा भरून घेतल्या असतील. जे जात आहेत त्यांचे स्वागत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या ४० वर्षांच्या काळामध्ये अनेक जणांना मोठे केले. त्याग आणि त्यांची निष्ठा आम्ही कदापि विसरू शकत नाही. पवार यांना कोणीही संपवू शकत नाही. कॉंग्रेससोबत विधानसभेसाठीे आघाडी आहे. कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्षावर निष्ठा ठेवावी.  जे कोणी पक्षावर निष्ठा ठेवत नाही इतर पक्षामध्ये जावून पक्षांतराची भाषा करतात़ अशा दलबदलूंच्या विचारांना स्थान देवू नका. त्यांच्याकडे इतर पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात आले़ या बैठकीमध्ये पक्षाचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण असावा यासंदर्भात चर्चा झाली. जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी सांभाळावी असा ठराव संतोष देशमुख यांनी मांडला. या ठरावाला माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, आ. प्रदीप नाईक यांनी अनुमोदन  दिले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या तक्रारी केल्या़

माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे. कमलबाबू यांनी जिल्ह्याची धुरा सांभाळावी मी त्यांच्या पाठीशी आहे. -गंगाधरराव कुंटूरकर, माजी मंत्री

मला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फारसा सहभाग यापूर्वी काही जणांनी घेवू दिला नाही. मी केवळ माझ्या विधानसभा मतदारसंघापुरता विचार करत होतो. आता जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण अधिक सक्रिय होणार आहे. अण्णा भाऊ साठे कर्ज प्रकरणात कुठलाही घोटाळा झाला नाही.माझ्याविरुद्ध हे षड्यंत्र आहे़  - आ़प्रदीप नाईक

गोरठेकर यांनी पक्ष सोडला हे बरे झाले. आता जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील़  -शंकर धोंडगे, माजी आमदार

मी महायुतीचा जिल्हा बँकेमध्ये संचालक आहे.   मला बँकेचे अध्यक्षपद त्यांच्यामुळे मिळाले. जिल्हा बँकेचा अध्यक्ष असल्यामुळे चिखली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आहे. मी पक्षातच राहणार आहे़ - डॉ़सुनील कदम,  शहर जिल्हाध्यक्ष 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNandedनांदेडPoliticsराजकारण