शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना न्यायालयाचा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 18:41 IST

जमावबंदीचे आदेश धुडकावल्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह १६ जणांवर धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

धर्माबाद (नांदेड ) : बहुचर्चित बाभळी बंधारा प्रकरणात जमावबंदीचे आदेश धुडकावल्यामुळे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांच्यासह  १६ जणांवर धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात दोषारोप सिद्ध होईपर्यंत नायडू यांना धर्माबाद न्यायालयात हजर राहण्याची गरज नसल्याचे न्या़ एन. आर.गजभिये यांनी आज स्पष्ट केले़ यामुळे नायडू यांना दिलासा मिळाला आहे़

येथील बहुचर्चित बाभळी बंधारा प्रकरणावरून आंध्रपरदेश व महाराष्ट्र यांच्यात पाणी प्रश्नावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळेस मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांनी बॉम्ब टाकून  बाभळी बंधारा उडवून देण्याचे चिथावणी दिल्यामुळे बाभळी बंधारा परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. परंतु नायडू यांनी जमावबंदीचे आदेश धुडकावून बाभळी बंधाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला़ त्याचबरोबर यावेळी पोलिसांसोबत धक्काबुक्कीचा प्रकारही घडला होता़ यावरून नायडूसह पंधरा जणांवर धर्माबाद पोलिसात गुन्हे दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदरील प्रकरणात सर्वांना ३० वेळा समन्स सोडूनही न्यायालयात हजर झाले नसल्याने नायडू यांच्यासह पंधरा जणांना कुठल्याही क्षणी कुठेही अटक करण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. 

यातील चार जणांनी न्यायालयात हजर होऊन जामीन करून घेतले व प्रत्येकी  ५ हजार रुपये दंड भरला़ १५ आॅक्टोबर रोजी सर्वांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. याच पार्श्वभूमीवर चंद्राबाबु नायडू यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयातील अ‍ॅड.सिद्धार्थ लथुर व हैदराबाद येथील अ‍ॅड़ सुब्बाराव  यांनी आज येथील न्यायालयात हजर राहून चंद्राबाबु नायडू यांचे अटक वॉरंट रद्द करण्यासाठी वकील पत्र दाखल केले. सदरील प्रकरणात दोषारोप सिद्ध होईपर्यंत नायडू यांना न्यायालयात हजर राहण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने नमूद केले

तसेच सदरील प्रकरणात इतरांना प्रत्येकी  ५ हजार रू. दंड व जामीन मंजूर करण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये जमानतीसाठी भरावे लागले. परंतु न्यायालयाने विचार करून नायडू यांना दंड न लावता तालुका विधी सेवा समितीकडे १५ हजार रुपये  भरण्याचे आदेश दिले. सदरील  १५ हजार रुपये भरण्यात आले असून न्यायालयाने दोषारोप सिद्ध होईपर्यंत चंद्राबाबु नायडू यांना हजर राहण्याची गरज नाही. परंतु इतर सर्वांना १५ आॅक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार असल्याचे अ‍ॅड़ सिद्धार्थ लुथरा यांनी सांगितले आहे. 

यावेळी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. पोलिस उपअधीक्षक नूरूल हसन, पोलिस निरीक्षक भागवत जायभाये, पोलिस उपनिरीक्षक अनिल सनगल्ले, सरकारी वकील ए़ए़शिखरे, वकील उदय बिलोलीकर, सुधीर चिंतावार, विनायकराव पवार, वसंतराव खानापूरकर यांच्यासह मोठा  पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूCourtन्यायालयNandedनांदेड