शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

आंबेडकरी चळवळीने राजकीय गुलामी झुगारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:30 IST

कसलीही यंत्रणा हाती नसताना अन्याय-अत्याचाराविरुद्ध दलित पँथरचे कार्यकर्ते तुटून पडायचे. विद्यापीठ नामांतरासह इतर आंदोलनावेळी या चळवळीपुढे सरकारही नतमस्तक झालेले आपण पाहिले आहे. मात्र आताच्या

ठळक मुद्देमाजी मंत्री गंगाधर गाडे यांचे प्रतिपादनशहीद गौतम वाघमारे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सोहळा

नांदेड : कसलीही यंत्रणा हाती नसताना अन्याय-अत्याचाराविरुद्ध दलित पँथरचे कार्यकर्ते तुटून पडायचे. विद्यापीठ नामांतरासह इतर आंदोलनावेळी या चळवळीपुढे सरकारही नतमस्तक झालेले आपण पाहिले आहे. मात्र आताच्या चळवळीत ही ताकद उरलेली नाही. हा आवाज पुन्हा बुलंद करण्यासाठी आंबेडकरी चळवळीने राजकीय गुलामी झुगारण्याची आवश्यकता असल्याचे माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी सांगितले.नामांतर लढ्यातील शहीद गौतम वाघमारे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीने आयोजित अभिवादन सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. प्रतिभा अहिरे यांची उपस्थिती होती. आंबेडकरी चळवळीने या देशातील प्रतिगामी विचारसरणीचा बीमोड करुन पुरोगामी विचार पेरले. ‘नाही रे’ वर्गाला न्याय मिळवून देताना आपली स्वतंत्र प्रतिमा, प्रतिभा जपली. या चळवळीच्या बळावरच देशाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे या चळवळीच्या ताकदीची आठवण प्रत्येकाने ठेवून तिला अधिक बळकट करण्यासाठी काम करावे, असेही गंगाधर गाडे यावेळी म्हणाले.डॉ. प्रतिभा अहिरे यांनी यावेळी ‘स्त्रियांवरील अत्याचार व वर्तमान’ या विषयावर मार्गदर्शन केले. राज्याची सध्याची परिस्थिती भयानक असल्याचे सांगत सरकारला अच्छे दिन आले. परंतु, स्त्रियांना बुरे दिवस सोसावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. ती परिस्थिती बदलण्यासाठी अन्यायकारक बदलावे लागेल, असे त्यांनी सांगितले.प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीची वाटचाल तथा दशा आणि दिशा’ या विषयावर मार्गदर्शन केले. चळवळीच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्याची गरज व्यक्त करीत बाबासाहेबांनी उभारलेली चळवळ आपण कोणत्या दिशेने घेवून जात आहोत, याचा विचार करण्यासाठी वेळ आल्याचे ते म्हणाले. सुरेश गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप केला.विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी १७ वर्षे लढा दिला. जगाच्या इतिहासात नामांतरासाठी लढला गेलेला हा सर्वाधिक मोठा लढा, मात्र त्याचाही आजच्या पिढीला विसर पडत असल्याबाबत खेद व्यक्त करीत नामांतराची अस्मिता आम्ही विसरत आहोत, ही बाब चळवळीसाठी घातक असल्याचे म्हणाले. आज पुन्हा आंबेडकरी चळवळ नेटाने पुढे घेवून जाण्याची गरज व्यक्त करत आहेत. यासाठी विचारवंतांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी सांगितले.यावेळी सूर्यकांता गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाऊराव भदरगे तर जिल्हाध्यक्ष रुपेश बहादरगे यांनी आभार मानले. मंचावर सुखदेव चिखलीकर, शशिकांत वाघमारे, विलास सोनपारखे, सुभाष काटकांबळे, देवानंद सरोदे, सचिन कांबळे, नितीन मोरे, दिगंबर वाघासार, के.पी. शिरसाठ, प्रा. विजय सोनुले, शाहीद आनंद कीर्तने आदी उपस्थित होते़

टॅग्स :NandedनांदेडGangadhar Gadeगंगाधर गाडेDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद