शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोडतीद्वारे करावे लागले बियाणे वाटप; बियाणांच्या तुटवड्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 19:42 IST

बियाणांसाठी शेतकऱ्यांची रीघ

ठळक मुद्देकृषी विभागाचा ढिसाळ कारभारबारूळ येथे सोडतीद्वारे बियाणे वाटप 

बारुळ (जि. नांदेड) : खरीप हातचा गेल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता रबी हंगामावर आहेत. मात्र शेतकऱ्यांमागच्या अडचणी संपायला तयार नाहीत. कृषी विभागाच्या वतीने रबी हंगामासाठी बियाणे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शेकडो शेतकरी बारुळच्या कृषी मंडळ कार्यालयात जमा झाले. मात्र अवघ्या ३५ हरभरा बियाणाच्या बॅगा आल्याने अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

कृषी विभागाच्या वतीने कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जातो. याअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दरवर्षी हंगामनिहाय विविध उपक्रम हाती घेतले जातात. यंदा या अभियानाअंतर्गत रब्बी हंगामात कडधान्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बारूळ कृषी मंडळ कार्यालयातंर्गत ३३ गावे येतात. त्यापैकी तीन गावासाठी ३० हेक्टरसाठी पुरेल इतके हरभऱ्याचे बियाणे प्राप्त झाले होते. यातील बारूळ, भूकमारी व गुंडा या गावासाठी कृषी सहायकांच्या उपस्थितीत  बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बारूळ शिवारातील ३२० शेतकऱ्यांनी हरभरा बियाणाचे मागणीसंदर्भात नावे नोंदवली होती. परंतु प्राप्त झालेल्या बॅगा अवघ्या ३५ असल्याने या बॅगा नेमक्या द्यायच्या कुणाला असा प्रश्न उपस्थित झाला. या विषयावरुन काहीकाळ कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर लक्की ड्रॉ काढून या बॅगांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु बारूळ शिवारातील एका कुटुंबाच्या घरी एकच नाव नोंदणी करण्याची अट असल्याने अनेक शेतकऱ्यांना बियाणापासून वंचित रहावे लागले. यातून गदारोळ  वाढल्याने कृषी सहायक गोविंद तोटेवाड हे बियणांचे वाटप न करताच निघून गेले. 

नव्या नियमामुळे शेतकरी बियाणापासून वंचितकृषी विभागाकडून मागील काही वर्षे नियमानुसार १०० हेक्टर शेतीच्या बियाण्याचे वाटप केले जात होते. ते आता नव्या नियमानुसार १० हेक्टर शेतीसाठी वाटप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे अनेक गरजू शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही बियाणाचे वाटप करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने कृषी विभागाने बियाणे वाटपा संदर्भातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.  

२०० हेक्टरवर लागवड; १० हेक्टरपुरते बियाणेबारूळ शिवारात रबी हंगामात साधारण २०० हेक्टर हरभऱ्याची लागवड होते. परंतु कृषी विभागाच्या नवीन नियमानुसार या शिवारातील केवळ दहा हेक्टर साठी बियाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दहा हेक्टरसाठी बियाणाच्या अवघ्या ३५ बॅगा आल्याने बारूळ कृषी मंडळ कार्यालयातील ३३ गावातील शेकडो शेतकऱ्यांना याचे वाटप कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला.  या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र