शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शिक्षणानंतर रोजगार नाही, मजुरी करावी लागते; राहुल गांधींकडे बेरोजगारांनी मांडल्या व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 18:16 IST

केंद्र शासन देशातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण करीत आहेत. त्यामुळे समस्या कमी होण्या ऐवजी वाढल्या आहेत.

- शब्बीर शेख/रत्नाकर जाधवदेगलूर/बिलोली :  या देशात शिक्षण होऊ शकते; परंतू रोजगार मिळू शकत नाही. मजुरीच करावी लागते. अशा समस्या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर मांडल्या. देशातील हे वास्तव बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठीच ही पदयात्रा आपल्यापर्यंत पोहोचली, असे खासदार राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

मंगळवारी भारत जोडो पदयात्रा बिलोली तालुक्यातील भोपाळा येथे पोहोचली. या ठिकाणी राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधला. या सभेला महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, नसीम खान, डी.पी. सावंत,  विश्वजीत कदम आदींची उपस्थिती होती. राहुल गांधी म्हणाले, काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने देशात नोट बंदी लागू केली. परदेशातील काळे धन आणण्याचे सांगत ही नोट बंदी लागू केली. काळे धन आणण्यासाठी नोटबंदी नव्हती तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर ती आफत होती. नोट बंदीने देशातील रोजगार देणाऱ्या सर्वांना नष्ट केले. जीएसटी आणि नोट बंदी, दुसरीकडे खासगीकरणामुळे सर्व समस्या वाढल्या आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. नरेंद्र मोदींनी छोटे व्यापारी संपविले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पद यात्रेत मिळालेला प्रतिसाद पाहुन राहुल गांधींनी नागरिकांचे आभारही मानले. ते म्हणाले, यात्रा सुरु होऊन ६० दिवस पूर्ण झाले आहेत. पण लोकांचा उत्साह पाहून आताच यात्रा सुरु झाली असे वाटते. दररोज २५ कि.मी. चालत आहे. परंतू थकवा येत नाही. कारण ही जनसामान्यांची शक्ती आहे आणि ही शक्तीच आपल्या यात्रेला बळ देत आहे. त्यामुळे ही यात्रा आता थांबणार नाही. श्रीनगरपर्यंत नेणारच, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका केली. 

काश्मिरमध्ये तिरंगा फडकविणारभारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांमध्ये एकता आणि बंधुत्वता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अखंड भारतासाठी कन्याकुमारी येथून ही पद यात्रा सुरु झाली असून काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे या यात्रेच्या माध्यमातून तिरंगा फडकविणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासगीकरण हेच समस्यांचे मूळकेंद्र शासन देशातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण करीत आहेत. त्यामुळे समस्या कमी होण्या ऐवजी वाढल्या आहेत. काही मोजक्या लोकांच्या हाता अर्थकारण जात आहे. त्यामुळे गरीब गरीबच राहत असून मोजकेच श्रीमंत होत आहेत.

देशात भीतीचे वातावरण सध्या भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. या भितीमधूनच द्वेष निर्माण केला जातो. भीती नसती तर द्वेष निर्माण झाला नसता. देशात पसरविला जाणारा हा द्वेष आणि द्वेष भावना घालविण्यासाठीच आम्ही ही पदयात्रा सुरु केली आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेड