शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

शिक्षणानंतर रोजगार नाही, मजुरी करावी लागते; राहुल गांधींकडे बेरोजगारांनी मांडल्या व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 18:16 IST

केंद्र शासन देशातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण करीत आहेत. त्यामुळे समस्या कमी होण्या ऐवजी वाढल्या आहेत.

- शब्बीर शेख/रत्नाकर जाधवदेगलूर/बिलोली :  या देशात शिक्षण होऊ शकते; परंतू रोजगार मिळू शकत नाही. मजुरीच करावी लागते. अशा समस्या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर मांडल्या. देशातील हे वास्तव बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठीच ही पदयात्रा आपल्यापर्यंत पोहोचली, असे खासदार राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

मंगळवारी भारत जोडो पदयात्रा बिलोली तालुक्यातील भोपाळा येथे पोहोचली. या ठिकाणी राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधला. या सभेला महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, नसीम खान, डी.पी. सावंत,  विश्वजीत कदम आदींची उपस्थिती होती. राहुल गांधी म्हणाले, काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने देशात नोट बंदी लागू केली. परदेशातील काळे धन आणण्याचे सांगत ही नोट बंदी लागू केली. काळे धन आणण्यासाठी नोटबंदी नव्हती तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर ती आफत होती. नोट बंदीने देशातील रोजगार देणाऱ्या सर्वांना नष्ट केले. जीएसटी आणि नोट बंदी, दुसरीकडे खासगीकरणामुळे सर्व समस्या वाढल्या आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. नरेंद्र मोदींनी छोटे व्यापारी संपविले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पद यात्रेत मिळालेला प्रतिसाद पाहुन राहुल गांधींनी नागरिकांचे आभारही मानले. ते म्हणाले, यात्रा सुरु होऊन ६० दिवस पूर्ण झाले आहेत. पण लोकांचा उत्साह पाहून आताच यात्रा सुरु झाली असे वाटते. दररोज २५ कि.मी. चालत आहे. परंतू थकवा येत नाही. कारण ही जनसामान्यांची शक्ती आहे आणि ही शक्तीच आपल्या यात्रेला बळ देत आहे. त्यामुळे ही यात्रा आता थांबणार नाही. श्रीनगरपर्यंत नेणारच, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका केली. 

काश्मिरमध्ये तिरंगा फडकविणारभारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांमध्ये एकता आणि बंधुत्वता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अखंड भारतासाठी कन्याकुमारी येथून ही पद यात्रा सुरु झाली असून काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे या यात्रेच्या माध्यमातून तिरंगा फडकविणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासगीकरण हेच समस्यांचे मूळकेंद्र शासन देशातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण करीत आहेत. त्यामुळे समस्या कमी होण्या ऐवजी वाढल्या आहेत. काही मोजक्या लोकांच्या हाता अर्थकारण जात आहे. त्यामुळे गरीब गरीबच राहत असून मोजकेच श्रीमंत होत आहेत.

देशात भीतीचे वातावरण सध्या भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. या भितीमधूनच द्वेष निर्माण केला जातो. भीती नसती तर द्वेष निर्माण झाला नसता. देशात पसरविला जाणारा हा द्वेष आणि द्वेष भावना घालविण्यासाठीच आम्ही ही पदयात्रा सुरु केली आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेड