शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आईला परत नेण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या व्यापाऱ्याचा यूपीत अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 22:17 IST

वाराणसीतून आईला परत घेऊन येताना ट्रकने उडविले

नांदेड : येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा हॉटेल सेंट्रल पार्कचे मालक कृष्णा बालाप्रसाद लोकमनवार (वय ४५) यांचा उत्तर प्रदेश राज्यातील राष्ट्रीय महामार्ग १९ वरील चुनार येथे (जि. मिर्झापूर) झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास नांदेडकडे येत असताना घडली.

नांदेड येथील व्यापारी कृष्णा बालाप्रसाद लोकमनवार यांच्या मातोश्री चातुर्मासानिमित्त वाराणसी येथे होत्या. त्यांना नांदेडला घेऊन येण्यासाठी म्हणून कृष्णा लोकमनवार हे शनिवारी वाराणसी येथे खासगी वाहनाने गेले होते. दरम्यान, मातोश्री व त्यांच्या मावशी या दोघींना सोबत घेऊन ते रविवारी नांदेडकडे निघाले होते. वाराणसीपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग १९ वरील चुनार येथे (जि. मिर्झापूर) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते लघुशंकेसाठी म्हणून वाहनातून उतरले. यावेळी रस्ता ओलांडणार तोच पाठीमागून एका भरधाव वेगातील ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून त्यांचा मृतदेह वाराणसी येथून विमानाने हैदराबाद येथे आणण्यात आला. त्यानंतर हैदराबादहून नांदेडमध्ये वाहनाने त्यांचा मृतदेह नांदेडमध्ये आणला जाणार आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली, भावजय, पुतण्या असा परिवार आहे. जितेंद्र लोकमनवार यांचे ते बंधू होत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दि. २३ रोजी दुपारी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे नातेवाईक विजयकुमार लोकमनवार यांनी दिली.