शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

२६ साखर कारखान्यांकडून ९४ लाख २८ हजार टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ...

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यात १८ खासगी तर आठ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. विभागाचा गाळप हंगाम ता. ३० ऑक्टोबरपासून परभणी जिल्ह्यातील रेणुका शुगर या कारखान्यापासून झाला, तर हंगामाचा शेवट ता. चार एप्रिल रोजी परभणी जिल्ह्यातीलच बळीराजा साखर कारखान्याचा पट्टा पडून झाला.

विभागातील २६ कारखान्यांनी ९४ लाख २८ हजार १८५ टन उसाचे गाळप तर ९३ लाख ९९ हजार २६३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्राने दिली.

गाळप, उताऱ्यात ‘बळीराजा’ अव्वल, नांदेड विभागात सर्वाधिक गाळप व साखर उताऱ्यात परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानडखेड (ता. पूर्णा) हा खासगी कारखाना अव्वल ठरला आहे. या कारखान्याने हंगाम अखेर सहा लाख ७९ हजार २४६ टन उसाचे गाळप करत सात लाख ७२ हजार ५०८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर, या कारखान्याचा साखर उतारा ११.३७ टक्के आला आहे. हा उतारा विभागात सर्वाधिक आहे. यासोबतच गंगाखेड शुगर कारखान्याने चार महिन्यांत सहा लाख २८ हजार ५५७ टन उसाचे गाळप करत साखरेचे उत्पादन सहा लाख ४८ हजार ९०० क्विंटल केले आहे.

कारखानानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन

(गाळप टनात साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा...कारखाने... ऊस गाळप... साखर उत्पादन

नांदेड...सहा... १९,२४,२८९... १८,५५,७७५

लातूर...नऊ... ३१,६७,८९७... ३०,४१,१९०

परभणी...सहा.. . २८,१८,०९५.. २८,८७,९३८

हिंगोली...पाच... १५,१७,९०३... १५,६१,३६०

एकूण...२६... ९४,२८,१८५... ९३,९९,२६३

विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के