शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बिलोलीतून वाळू उपशापोटी मिळाला ९ कोटींचा महसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:16 IST

मराठवाड्यात सर्वाधिक गौण खनिजचे महसूल मिळवून देणाऱ्या बिलोली तालुक्यातून यावर्षीच्या सहा महिन्यांत वाळू उपशापोटी तब्बल ९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत

ठळक मुद्दे निसर्गाची देण असलेल्या या दोन नदीपात्रात बिलोली तालुक्यात  २० शासकीय घाट आहेत़

- राजेश गंगमवार

बिलोली (नांदेड ) : मराठवाड्यात सर्वाधिक गौण खनिजचे महसूल मिळवून देणाऱ्या बिलोली तालुक्यातून यावर्षीच्या सहा महिन्यांत वाळू उपशापोटी तब्बल ९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत़ जानेवारी ते जून या कालावधीत कारवाईपोटी ४२ लाख रुपये दंड आकारणी झाली आहे़

तालुक्याला मांजरा व गोदावरी नदीचा वेढा आहे़ गोदावरी नदी पात्रातून काळ्या रंगाची तर मांजरा नदीपात्रातून लाल रंगाची वाळू मिळते़ निसर्गाची देण असलेल्या या दोन नदीपात्रात बिलोली तालुक्यात  २० शासकीय घाट आहेत़ कर्नाटक व तेलंगणा सीमेवरील मांजरा नदी पात्रात  त्या शासनाचे शासकीय वाळूघाट आहेत़ या दोन्ही राज्यांत वाळू उपशावर निर्बंध असल्याने बिलोली व देगलूर तालुक्यातील वाळू घाटांना महत्त्व आहे़

यावर्षी पहिल्यांदाच वाळू साठ्यानुसार एका घाटांचे दोन घाट निर्माण करून ई-लिलाव करण्यात आला़ परिणामी  महसूलमध्ये वाढ झाली़ जानेवारी ते जून हा वाळू उपशाचा हंगाम असतो़ पावसाळा सुरू झाला की वाळू उपसा मंदावतो़ पाऊस लांबला तर ठेकेदारांचे चांगभलं होते़ यावर्षी मान्सूनपूर्व व मृग नक्षत्रात मोठा पाऊस झाला़ जूनच्या १५ दिवसांत १६० मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ यावर्षीच्या हंगामात ९ वाळू घाटांचा लिलाव झाला़ प्रत्यक्षात सात  घाटांवरूनच उपसा झाला़ नियमबाह्य वाळू उपशामुळे गोदावरीचे दोन घाट दोन महिन्यांतच बंद झाले़  

२०१८-१९ अंतर्गत कार्ला वाळू घाट ५३ लाख, माचनूर ७७ लाख, सगरोळी ७० लाख, माचनूर वन- ५९ लाख, चिरली ५० लाख, कोळगाव ४८ लाख तर बोळेगाव सव्वाकोटीचा महसूल मिळाला़ सर्व वाळू घाटांतून पकडलेल्या अवैध व नियमबाह्य वाहतुकीवर बिलोली प्रशासनाने कार्यवाही केली़ ज्यामध्ये ४२ लाख रुपये दंड वसूल झाला़  जानेवारी ६० हजार, फेब्रुवारीत ५० हजार, मार्च १५ लाख, एप्रिलमध्ये ९ लाख, मे मध्ये ५ लाख, जूनमध्ये १२ लाख वसूल झाले़ अवैध वाळूसाठा जप्त करण्याची मोठी कार्यवाही कोळगाव शिवारात झाली़ त्या पाठोपाठ अन्य दहा ठिकाणी अशी कार्यवाही झाली़ ज्यामधून २ कोटी ४१ लाख रुपये बिलोली तहसीलला प्राप्त झाले आहेत़ गौण खनिजच्या माध्यमातून यावर्षी सर्वाधिक महसूल मिळाला आहे़

तेलंगणातून मिळणाऱ्या महसुलात घटयावर्षी प्रथमच तेलंगणा शासनाने परराज्यातील वाळू आयातीवर कडक निर्बंध आणले़ बॉर्डर चेकपोस्टवर कडक तपासणी सुरू झाली़ महाराष्ट्रातील वाळू तेलंगणात आल्यावर त्या राज्यातील रॉयल्टी, सेल टॅक्स आकारणी सुरू झाली़ परिणामी वाळू वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे बहुतांश कर्नाटक राज्यात वाळूची वाहतूक झाली़ तेलंगणातील वाळू वाहतुकीवर कडक       निर्बंध नसते तर अन्य शासकीय वाळू घाटांना ठेकेदार मिळाले असते.  सीमावर्ती भागात सगरोळी व माचनूर या घाटांवर तेलंगणा प्रशासनाने वाळू घाटात घुसखोरी केल्याच्या कारणावरून तीन वेळा पोलीस कार्यवाही केली़ मांजराच्या अथांग वाळूघाटात अजूनही मराठवाडा-तेलंगणाची निश्चित सीमा नाही़ वाळूच्या उपशावरून या भागात नेहमी राडा होत आहे़ तेलंगणा प्रशासन यावर्षी सीमावर्ती भागात नेहमीच जागरूक व लक्ष ठेवून होते़ दोन्ही राज्यातील मराठी व तेलगू भाषिकांत वाद झाले आहेत़ 

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड