शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात शौचालयांसाठी ८८ कोटींची गरज; सव्वा लाख लाभार्थी प्रतीक्षेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 18:50 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधकामासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून ग्रामीण भागात शौचालय बांधकामाची गती वाढली आहे़ मागील वर्षभरात १ लाख ३५ हजार ७२४ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले असून १ लाख २६ हजार ८५३ लाभार्थ्यांना बांधकामाची रक्कमच देण्यात आली नाही़ त्यासाठी ८८ कोटी ४७ लाखांचा निधी आवश्यक असून  जिल्हा परिषदेने शासनाकडे या निधीची मागणी केली आहे़ 

- भारत दाढेल नांदेड : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधकामासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून ग्रामीण भागात शौचालय बांधकामाची गती वाढली आहे़ मागील वर्षभरात १ लाख ३५ हजार ७२४ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले असून १ लाख २६ हजार ८५३ लाभार्थ्यांना बांधकामाची रक्कमच देण्यात आली नाही़ त्यासाठी ८८ कोटी ४७ लाखांचा निधी आवश्यक असून  जिल्हा परिषदेने शासनाकडे या निधीची मागणी केली आहे़ 

जिल्ह्यात २०१५- १६ या वर्षात ४७ ग्रामपंचायती पाणंदमुक्त झाल्या होत्या़ तर २०१६- १७ या वर्षात ६७ ग्रामपंचायती पाणंदमुक्त झाल्या़ आतापर्यंत एकूण ५०० ग्रामपंचायती पाणंदमुक्त झाल्या असून जिल्हा परिषदेने शौचालय बांधकामाला गती दिली आहे़ त्यासाठी मिशन १८१, फास्ट ट्रॅक ७५, फोर्स फिनिक्स व दस अश्वमेघ उपक्रम राबविण्यात आले़ या उपक्रमांद्वारे ३२४ ग्रामपंचायती पाणंदमुक्त करण्यात आल्या़ मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी या चळवळीला निधीमुळे ब्रेक मिळाल्याचे चित्र आहे़ शासनाकडून  निधी देण्यास विलंब होत असल्यामुळे लाभार्थ्यांचा उत्साह कमी झाला आहे़ एकूण १५२ कोटी २२ लाख रूपयांची गरज असली तरी सध्या ८८ कोटी ४७  लाख रूपये देणे आवश्यक आहे.

 अर्धापूर तालुका शंभर टक्के पाणंदमुक्त झाला असून मुदखेड, धर्माबाद, माहूर, नांदेड, हिमायतनगर, भोकर, हदगाव हे आठ तालुके पाणंदमुक्त करण्यासाठी निधीची गरज आहे़ आतापर्यंत ६३ कोटी ७५ लाख रूपये १२ हजार रूपये शौचालय बांधकामासाठी वितरीत करण्यात आले आहेत़ विविध योजनेतंर्गत ८ हजार ८७१ शौचालय बांधण्यात आले आहेत़ वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून १२ हजार देण्यात येते़ यामध्ये केंद्राचे ९ हजार तर राज्य शासनाचे ३ हजार रूपये  या पद्धतीने हा निधी दिला जातो़ दारिद्र्य रेषेवरील भूमिहीन शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, महिला प्रधान कुटुंब आणि अपंग कुटुंब यांचा या योजनेत समावेश केल्यामुळे शौचालय बांधकामाची गती वाढली आहे़

तालुकानिहाय आवश्यक असलेला निधीभोकर - ३ कोटी ९८ लाख, ८८ हजार, बिलोली- ७ कोटी १२ लाख ८ हजार, देगलूर -६ कोटी १० लाख ६८ हजार, धर्माबाद -३ कोटी ९९ लाख ८४ हजार, हदगाव - ८ कोटी ८३ लाख ३२ हजार, हिमायतनगर -५ कोटी ७ लाख २४ हजार, कंधार - ७ कोटी २६ लाख, किनवट -८ कोटी ७४ लाख ८० हजार, लोहा -७ कोटी ४६ लाख ४० हजार, माहूर - ४ कोटी ११ लाख १२ हजार, मुदखेड - २ कोटी ८८ लाख १२ हजार, मुखेड- ८ कोटी ५८ लाख ६० हजार, नायगाव -६ कोटी ७२ लाख ६० हजार, नांदेड -५ कोटी २४ लाख १६ हजार, उमरी-२ कोटी ३३ लाख ४० हजार एवढ्या निधीची सध्या आवश्यकता आहे़ 

शौचालयाच्या कामांना ग्रामीण भागात गती२०१४- १ हजार ८९५,२०१५-२२ हजार १४७, २०१६-३६ हजार ८३१,२०१७- ५६ हजार १०७