शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नांदेड जिल्ह्यातील ७० जिल्हा परिषद शाळा सोमवारपासून उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 17:02 IST

मार्च  २०२० पासून कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देखबरदारी आवश्यक: शिक्षक, पालकांनी समन्वय राखावा

नांदेड : जिल्ह्यात कोरोना संकटानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यासाठी हालचाली होत आहेत. राज्य शासनाच्या सुचनेनंतर इयता नववी व दहावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. जिल्ह्यात ७० जिल्हा परिषदेच्या शाळा उघडणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले.

मार्च  २०२० पासून कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा उघडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचवेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीही हाती घेण्यात आली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांची संमतीही घेतली जाणार आहे. त्यामुळे या कोरोनाच्या संकटात किती पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी संमती देतील? याकडेही लक्ष लागले आहे. कोरोनाचे मोठे संकट आहे. दुसऱ्या लाटेचीही भीती आहेच. या  पार्श्वभूमीवर पालकांनी योग्य खबरदारी घेवून मुलांना शाळेत पाठवावे. शाळेतील शिक्षकांशी समन्वय राखावा. यातूृन कोरोना रोखण्यासाठी मदत होईल, असे शिक्षणाधिकारी दिग्रसकर म्हणाले.

निर्जंतुकीकरण, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालनजिल्ह्यात इयता नववी व दहावीच्या शाळा सुरू होणार आहेत. या शाळा सुरू झाल्यानंतर निर्जंतुकीकरण आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे पालन होईल.  कोरोना संशयितांनाही वेळीच उपचार दिले जातील, असे स्पष्ट करण्यात आले.

शिक्षण विभागाकडून ७० शाळांचा आढावाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या शाळा संदर्भात जिल्ह्यातील सर्व  ७० शाळांचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे.  यावेळी कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. 

कोरोना संकटामुळे संपूर्ण जग हतबल झाले होते.  शाळाच नव्हे तर संपूर्ण जग थांबले होते.  शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन प्रणाली वापरली जात आहे. दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे धोकादायकच आहे. पाल्यांचा जीव धोक्यात टाकण्याचा विचार पालक करु शकणार नाही. - रवींद्र जोशी, पालक

कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र यातून विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण प्राप्त होत नाही. त्यामुळे आवश्यक ती सर्व खबरदारी घेत मुलांना शाळेत पाठवणे योग्य राहील. शाळा प्रशासनालाही कोरोनाच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करणे बंधनकारक आहेच. पण पालक म्हणून काळजी आहेच. - अंशुमन नांदेडकर, पालक

टॅग्स :SchoolशाळाNandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्या