शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

‘सौभाग्य’ योजनेद्वारे नांदेड जिल्ह्यातील साडेपाच हजार कुटुंबांना मिळणार वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:20 IST

‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत वीज न पोहोचलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबाना वीजजोडणी देवून त्यांचे जीवनमान प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे.

नांदेड : ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत वीज न पोहोचलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबाना वीजजोडणी देवून त्यांचे जीवनमान प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे.

नागरिकांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात 'सौभाग्य' योजना सुरू केली. योजनेंतर्गत डिसेंबर-२०१८ पर्यंत सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे अभियान सुरू करण्यात आले असून त्या अनुषंगाने महावितरणने कामे करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात वीज जोडणीपासून अद्यापपर्यंत वंचीत असलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यासाठी ५१ कोटी १३ लाख रूपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये भोकर विभागातील २ हजार १२४ कुटुंबाचा तर नांदेड शहर विभागातील ३२३ आणि नांदेड ग्रामीण विभागातील ३ हजार ७८ कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व कुटुंबांना वीजपुरवठा देण्यासाठी २१४ किलोमिटरची उच्चदाब वाहिनी तसेच ५४८ कि.मी.ची लघूदाब वाहिनींचा समावेश असून तब्बल १ हजार २५५ रोहित्रांची उभारणी योजनेंतर्गत केली जाणार आहे. 

सदर योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना (दारिद्र्य रेषेखालील) कुटुंबांना मोफत वीज जोडणीसोबतच ९ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिनपॉईंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना ५०० रुपयांमध्ये वीजपुरवठा दिला जाणार असून हे शुल्कही नियमित वीजबिलांसोबत १० सामान हप्त्यांत भरावयाचे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेड