शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

वर्षभरात ३४ आरोपी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:00 IST

जिल्ह्यात सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणाºया ३४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे़ तर ८१२ गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे़ गेल्या वर्र्षभरात दोषसिद्धीचे प्रमाण वाढून ३४ टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणाºया ३४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे़ तर ८१२ गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे़ गेल्या वर्र्षभरात दोषसिद्धीचे प्रमाण वाढून ३४ टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली़पोलीस अधीक्षक मीना म्हणाले, जिल्ह्यात पाहिजे, फरारी असलेल्या ५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल यासारख्या गुन्ह्यांतही मोठी घट झाली आहे़ दारुबंदीच्या विरोधातील कारवाई तब्बल ८२ टक्क्यांनी वाढली आहे़शहर वाहतुकीच्या समस्येवर पोलीस अधीक्षक म्हणाले, शहर वाहतुकीचा सर्व ताण एकाच रस्त्यावर येतो़ या रस्त्याला जोडणारे चार ओव्हरब्रीज करण्यात आले़, परंतु शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेण्यात आली नाही़ सुरुवातीपासूनच शहरातील रस्त्यांचा आराखडा चुकीच्या पद्धतीने करण्यात आला़ हजारो वाहने एकाच रस्त्यावर धावतात़ त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांमध्ये वाढ करुन हा प्रश्न सुटणार नाही़ त्यासाठी मोठ्या व कायमस्वरुपी शस्त्रक्रियेची गरज आहे़शहरातील सर्व शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्याची गरज आहे़ रस्त्याच्या कडेला असलेला सायकल ट्रॅक काढून रस्त्यांची रुंदी वाढविल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल़ गुरु-त्ता-गद्दीच्या वेळचा १०० कोटी रुपयांचा निधी आता येणार आहे़ त्या निधीतून शहरातील विविध भागांत मल्टीलेवल पार्कींग करण्याची गरज आहे़ रस्त्यावर भरणाºया बाजारामुळेही वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे़ शहरातील विविध भागात रस्त्यावरच बाजार भरतात़ दिवसेंदिवस ते फोफावत चालले आहेत़ सध्या शहर वाहतूक शाखेला अतिरिक्त २५ कर्मचारी आणि चार अधिकारी देण्यात आले आहेत, परंतु कर्मचाºयांची संख्या वाढवून हा प्रश्न सुटणारच नसल्याचेही ते म्हणाले़ शिवाजीनगर उड्डाणपुलावरुन जाणाºया मोर्चांचा मार्ग बदलणे आणि रस्त्यावर भरणारे बाजार याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, असेही मीना म्हणाले़ वाहतुकीच्या खोळंब्यामुळे आरोपी पकडण्यास मात्र मदत झाल्याचे ते म्हणाले़ न्यायालयात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ३४ टक्के राहिले आहे़ संघटित गुन्हेगार, दादागिरी, धोकादायक व्यक्तींच्या विरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे़ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत ३४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे़ शहरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़, परंतु त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीमुळे अनेकवेळा ते बंदच राहतात़ काही दिवसांपूर्वीच महापालिकेने कॅमेºयांची दुरुस्ती केली होती़, परंतु त्यातील अनेक कॅमेरे पुन्हा बंद पडले़ आता नियोजन समितीमध्ये पोलीस दलासाठी १० टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे़ या निधीतून सीसीटीव्ही कॅमेºयासह इतर विषयांसाठी पोलिसांना निधी मिळणार आहे़ हदगाव तालुक्यातील आष्टी येथे घडलेल्या घटनेत शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नाही़ तो अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे़या घटनेत दोषी कुणीही असो त्याच्यावर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़ यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश श्ािंदे, अविनाश बारगळ, पोनि़ संदीप गुरमे यांची उपस्थिती होती़आॅनलाईन तक्रारीबाबत जनजागृतीडिसेंबर महिन्यात केवळ १७ आॅनलाईन तक्रारी आल्या आहेत़ त्यातील ९ तक्रारींमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ या तक्रारींची अगोदर चौकशी करण्यात येते़ आॅनलाईन तक्रारींच्या संदर्भाने जनजागृती करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक मीना म्हणाले़तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरजआज जगात भारत हा सर्वात जास्त तरुणांची संख्या असलेला देश आहे़ या तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे़ तरुणांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा रोजगाराच्या संधी शोधण्याकडे वळावे़ पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन माध्यमांकडून केले जाते़ त्यामुळे माध्यमांनीही निष्पक्षपणे काम करावे, असेही मीना म्हणाले़