शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

वीजबिलाचा बोजा उतरला;नांदेड परिमंडळातील ३ हजार ६३९ शेतकरी संपूर्ण थकबाकी मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 13:42 IST

नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषीपंपाची थकबाकी ४२०२ कोटींच्या घरात होती.

नांदेड : कृषीपंपाची वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलाच्या थकबाकीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ४९ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ५० टक्के माफीची मुदत संपणार असून, एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. दरम्यान नांदेड परिमंडळातील ३ हजार ६३९ शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकी भरली.

नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषीपंपाची थकबाकी ४२०२ कोटींच्या घरात होती. दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून १७१२ कोटी ७७ लाख माफ झाले. तर सुधारित थकबाकीतही ५० टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना ५० टक्के हिश्श्यापोटी १२४८ कोटी ५५ लाख अधिक सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल ६५३ कोटी ६२ लाख असे मिळून १९०२ कोटी १७ लाख रूपये भरायचे आहेत. या देय रकमेपोटी आतापर्यंत ९४ कोटी ६९ लाखांचा भरणा वर्षभरात झाला. वसुलीचे हे प्रमाण केवळ ४.९८ टक्के इतकेच आहे. नांदेड परिमंडळातील केवळ ३ हजार ६३९ शेतकऱ्यांनीच कृषीधोरणाचा फायदा घेत १०० टक्के थकबाकीमुक्त झालेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे.योजनेसाठी पात्र असलेल्या ३ लाख ५ हजार ४५३ शेतकऱ्यांपैकी १ लाख ३३ हजार ९६९ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे.

यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ५६ हजार ४१४ शेतकऱ्यांनी सहभागी होत ४५ कोटी ०२ लाख रुपयांचा भरणा केला. परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९० शेतकऱ्यांनी सहभागी होत २५ कोटी १७ लाख तसेच हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ४६५ शेतकऱ्यांनी २४ कोटी ४९ लाख रुपयांचा भरणा केला आहे. वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामांत वापरली जात असल्याने पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज समस्यांतून मुक्तता होत आहे. वसुलीमुळे उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून नांदेड परिमंडळात आतापर्यंत १ हजार ६३९ कृषीपंप वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे.

टॅग्स :electricityवीजNandedनांदेड