शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वीजबिलाचा बोजा उतरला;नांदेड परिमंडळातील ३ हजार ६३९ शेतकरी संपूर्ण थकबाकी मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 13:42 IST

नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषीपंपाची थकबाकी ४२०२ कोटींच्या घरात होती.

नांदेड : कृषीपंपाची वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलाच्या थकबाकीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ४९ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ५० टक्के माफीची मुदत संपणार असून, एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. दरम्यान नांदेड परिमंडळातील ३ हजार ६३९ शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकी भरली.

नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषीपंपाची थकबाकी ४२०२ कोटींच्या घरात होती. दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून १७१२ कोटी ७७ लाख माफ झाले. तर सुधारित थकबाकीतही ५० टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना ५० टक्के हिश्श्यापोटी १२४८ कोटी ५५ लाख अधिक सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल ६५३ कोटी ६२ लाख असे मिळून १९०२ कोटी १७ लाख रूपये भरायचे आहेत. या देय रकमेपोटी आतापर्यंत ९४ कोटी ६९ लाखांचा भरणा वर्षभरात झाला. वसुलीचे हे प्रमाण केवळ ४.९८ टक्के इतकेच आहे. नांदेड परिमंडळातील केवळ ३ हजार ६३९ शेतकऱ्यांनीच कृषीधोरणाचा फायदा घेत १०० टक्के थकबाकीमुक्त झालेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे.योजनेसाठी पात्र असलेल्या ३ लाख ५ हजार ४५३ शेतकऱ्यांपैकी १ लाख ३३ हजार ९६९ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे.

यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ५६ हजार ४१४ शेतकऱ्यांनी सहभागी होत ४५ कोटी ०२ लाख रुपयांचा भरणा केला. परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९० शेतकऱ्यांनी सहभागी होत २५ कोटी १७ लाख तसेच हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ४६५ शेतकऱ्यांनी २४ कोटी ४९ लाख रुपयांचा भरणा केला आहे. वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामांत वापरली जात असल्याने पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज समस्यांतून मुक्तता होत आहे. वसुलीमुळे उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून नांदेड परिमंडळात आतापर्यंत १ हजार ६३९ कृषीपंप वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे.

टॅग्स :electricityवीजNandedनांदेड