शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात भूजलपातळीत ३ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:31 IST

जिल्ह्यात यावर्षीच्या मोसमात सरासरीच्या ६० टक्के पर्जन्यवृष्टी झाली असली तरी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या जानेवारीअखेर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी चार तालुक्यांतील पाणीपातळीत २ ते ३ मीटरने घट झाल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे़ त्यामुळे यंदाचा उन्हाळा नांदेडकरांना जडच जाणार असल्याचे दिसून येत आहे़

गोविंद सरदेशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात यावर्षीच्या मोसमात सरासरीच्या ६० टक्के पर्जन्यवृष्टी झाली असली तरी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या जानेवारीअखेर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी चार तालुक्यांतील पाणीपातळीत २ ते ३ मीटरने घट झाल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे़ त्यामुळे यंदाचा उन्हाळा नांदेडकरांना जडच जाणार असल्याचे दिसून येत आहे़तर १० तालुक्यांतील पाणीपातळी १ ते २ मीटरने घटली असून दोन तालुक्यांच्या पाणीपातळीत अल्पशी घट झाली असल्याची माहिती जानेवारीअखेर केलेल्या सर्वेक्षण अहवालावरुन निदर्शनास आली आहे. वर्ष २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत सरासरी ५७०.२६ मि़मी. पर्जन्यमान झाले असून ते एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या ६० टक्के इतके आहे. दरम्यान, ज्या तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले. अशा तालुक्यांत आतापासूनच त्याचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे़जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये सप्टेंबरअखेर ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तर १० तालुक्यांमध्ये २० ते २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तसेच एका तालुक्यामध्ये पर्जन्यमानात १० ते २० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यातील फक्त मुदखेड तालुक्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.१३४ निरीक्षण विहिरींद्वारे भूजल पातळीची नोंदभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या वतीने १३४ निरीक्षण विहिरींद्वारे पाणलोटनिहाय भूजलपातळीची नोंद घेण्यात येते. त्या अनुषंगाने जानेवारीअखेरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे धक्कायदायक चित्र आहे.जिल्ह्यातील मुखेड, माहूर, देगलूर व धर्माबाद या चार तालुक्यांतील भूजल पातळीत सर्वात जास्त म्हणजे २ ते ३ मीटरने घट झाली आहे. तर नांदेड, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, लोहा, कंधार, बिलोली आणि मुदखेड तालुक्यातील पाणीपातळीत १ ते २ मीटरने घट झाली आहे. तर नायगाव व उमरी तालुक्यातील पाणीपातळीत अल्पशी घट झाली असल्याचे भूजल सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे़विशेष म्हणजे, किनवट व माहूर तालुक्यांत यावर्षीच्या मोसमात ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असल्यामुळे या दोन तालुक्यांतील वाडी-तांड्यावर जानेवारीपासूनच पाणीटंचाईसदृश्य स्थिती जाणवत आहे. उन्हाळा सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी, भूजल पातळीत झपाट्याने होत असलेली घट ही नक्कीच चिंताजनक आहे.येत्या काही दिवसांत भूजलपातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागात पुढील काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुढील दिवसांतील संभाव्य पाणीटंचाईचा धोका ओळखून उपाययोजना करणे गरजेचे आहे.यंदा विष्णूपुरीच्या वरच्या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे प्रकल्प तीन वेळेस शंभर टक्के भरला होता़ त्यामुळे दरवाजे उघडून अनेकवेळा पाणी सोडावे लागले़ यंदा शेतकºयांसाठीही पाणीपाळ्या सोडल्या़ उन्हाळ्यासाठी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे़