शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणासाठी २७ गावांना निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:19 IST

मागील ७० वर्षांत मराठवाडा दुष्काळमुक्त झाला नाही. राज्यातील नागरिकांनी स्थलांतर केले त्यात मराठवाड्यातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे़ या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जलयुक्तचा नारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कलोहा : मागील ७० वर्षांत मराठवाडा दुष्काळमुक्त झाला नाही. राज्यातील नागरिकांनी स्थलांतर केले त्यात मराठवाड्यातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे़ या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जलयुक्तचा नारा दिला. प्रत्येक गावातील नागरिक झपाटून पाणी चळवळीत सहभागी झाले. या योजनेत सहभाग घेणाऱ्या त्या २७ गावांत शासनाच्या वतीने जलसंधारण कामासाठी पाच लक्ष रूपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा कामगारमंत्री व कौशल्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.लोहा शहरातील कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयाच्या मैदानावर शांतीदूत प्रतिष्ठाणच्या वतीने कै. व्यंकटराव मुकदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पाणीदार गावांचा व जलमित्रांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी निलंगेकर बोलत होते.अध्यक्षस्थानी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ. विनायक पाटील जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, बाबा अमरजितसिंग, प्रवीण पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे, चैतन्यबापू देशमुख, केरबा बिडवई, मिलिंद देशमुख, माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार आदींची उपस्थिती होती़यावेळी तालुक्यातील २७ गावांतील श्रमदात्यांचा तसेच जलमित्रांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वच्छतादूत राजीव तिडके, लोहा-कंधार तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व पानी फाऊंडेशनचे समन्वयक तसेच कलंबर (खु), रायवाडी, निळा तसेच इतर २७ गावातील श्रमदात्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमास दत्ता वाले, शरद पवार, सभापती सतीश उमरेकर, केशवराव मुकदम, सुभाष गायकवाड, करीम शेख, गजानन सूर्यवंशी, जफरोद्दीन बाहोद्दीन, छत्रपती धुतमल, गणेश सावळे, नरेंद्र गायकवाड, व्ही.जी. कदम, भास्कर पवार, प्रभाकर कदम, बंडू वडजेंसह बहुसंख्येची उपस्थिती होती.२४ हजारपैकी १६ हजार गावे टँकरमुक्तनिलंगेकर म्हणाले, जलयुक्त व पानी फाऊंडेशनमुळे २४ हजारांपैकी १६ हजार गावे टँकरमुक्त झाले. त्यातील सर्वाधिक गावे ही मराठवाड्यातील आहेत. पाणी आडविणे व जिरविणे हे महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याच्या खोºयात मुरले पाहिजे म्हणजे गावे पाणीदार होतील़ स्थलांतरित भागात पाणी व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मोदी सरकारमुळे लाभार्थी व प्रशासनात असलेली दलाल पद्धत बंद झाली. लाभार्थ्याच्या बँक खात्यात अनुदान जमा होत आहे. असल्याचेही निलंगेकर म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी