शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १५ वर्षांच्या संघर्षाला मिळतेय यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST

नांदेड- महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांसाठी वरदान ठरणाऱ्या संयुक्त लेंडी प्रकल्पाचे काम मागील ३६ वर्षांपासून कासव गतीने सुरू ...

नांदेड- महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांसाठी वरदान ठरणाऱ्या संयुक्त लेंडी प्रकल्पाचे काम मागील ३६ वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे. प्रारंभी मावेजाचा आणि त्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला. यासाठीही केलेल्या पंधरा वर्षांच्या संघर्षाला आता यश मिळत आहे. राज्य शासनाने स्वेच्छा पुनर्वसनाच्या मागणीला तत्त्वत: मान्यता दिली आहे. याबरोबरच यामध्ये शेतकरी कुटुंब, बिगर शेतकरी कुटुंबासह वाढीव कुटुंबाचाही समावेश केला जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या संयुक्त लेंडी प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ ३६ वर्षांपूर्वी झाला. १९८६ मध्ये या प्रकल्पाची मूळ किंमत ५५ कोटी रुपये इतकी होती. मात्र, अनेक अडथळे येत राहिल्याने प्रकल्पाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू राहिले. आजवर या प्रकल्पावर १५०० कोटी रुपये खर्च झाले असून, या प्रकल्पाची किंमत आता अडीच हजार कोटींवर गेली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगाव व इडग्याळ येथे होत असलेल्या या प्रकल्पासाठी बारा गावच्या जमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पाचा ६२ टक्के खर्च महाराष्ट्र, तर ३८ टक्के खर्च तेलंगणा सरकार करणार आहे. मात्र, दरवर्षी या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून ५० ते १०० कोटींचा तुटपुंजा निधी उपलब्ध होत राहिला. दुसरीकडे प्रकल्पाची किंमत मात्र वाढत राहिल्याने ३६ वर्षांनंतरही प्रकल्प कार्यान्वित होऊ शकलेला नाही. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील १५७१ हेक्टर, तर तेलंगणातील ११४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, प्रकल्पामध्ये १४ हजार ५१५ दशलक्ष लिटर पाणी साठवण होणार आहे. मात्र, प्रकल्पच रेंगाळल्याने सिंचनाचे हे स्वप्नही लांबणीवर पडले होते. मात्र, आता प्रकल्पग्रस्तांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळण्याचे संकेत मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वेच्छा पुनर्वसनाच्या मागणीला तत्त्वत: मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी शासनाचा आदेश जारी होईल त्या तारखेपर्यंतच्या वाढीव कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी पात्र धरण्याची अशोक चव्हाण यांनी केलेली मागणी वडेट्टीवार यांनी मान्य केल्याने धरणाचे काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वेच्छा पुनर्वसनासाठी अंदाजे १६९.७७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

कोट....

लेंडी या आंतरराज्यीय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्या अनुषंगानेच प्रकल्पग्रस्त समितीसोबत चर्चा केली होती. त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. या विभागाने स्वेच्छा पुनर्वसनाची मागणी तत्त्वत: मान्य केल्याने प्रकल्पाला पुन्हा चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी, बिगर शेतकरी कुटुंबांसह वाढीव कुटुंबांचाही यामध्ये समावेश असणार आहे.

- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

प्रतिक्रिया

संघर्षानंतरच प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळाला आहे. त्यानंतर स्वेच्छा पुनर्वसनाची मागणी आम्ही शासन दरबारी लावून धरली होती. आता या मागणीलाही यश आले आहे. सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करायला हवी.

- बालाजी पसरगे, ग्रामपंचायत सदस्य

लेंडी प्रकल्पासाठी निम्मे आयुष्य संघर्ष करण्यात घालविले. आज मी ७५ वर्षांचा आहे. या प्रकल्पासाठी जमिनी, घरे गेली. मात्र, मावेजा पंधरा वर्षांच्या संघर्षानंतर पुढच्या पिढीला मिळाला. शासनाने आता तरी या प्रकल्पाच्या कामाला गती द्यायला हवी.

- सुभाषअप्पा बोधने, धरणग्रस्त

शासन, प्रशासनाने हा प्रकल्प गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच धरणग्रस्तांना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. मात्र, आता स्वेच्छा पुनर्वसनाची मागणी मान्य केली आहे. यासाठी मुक्रमाबाद ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सरकारने १३०० कुटुंबांना तातडीने न्याय द्यावा.

- अंजिता बोधने, सरपंच, मुक्रमाबाद

फोटो.....

धरणाचा फोटो नं. १०एनपीएचएमएवाय-०६

अशोक चव्हाण फोटो नं. १०एनपीएचएमएवाय-०८

बालाजी पसरगे फोटो नं. १०एनपीएचएमएवाय-०५

सुभाषअप्पा बोधने फोटो नं. १०एनपीएचएमएवाय-०३

अंजिता बोधने फोटो नं. १०एनपीएचएमएवाय-०२